शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल ; औरंगाबाद जिल्हा पुन्हा लॉकडाऊनकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 19:26 IST

शासनाच्या आदेशानुसार शहर आणि जिल्हा तिसऱ्या स्तरात आले आहे, त्यामुळे कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटी टक्केवारी आणि ऑक्सिजन बेडवर किती रुग्ण आहेत, हा मुद्दा आता विचारात घेतला जाणार नाही.

ठळक मुद्दे७ जूनपासून कोरोनोच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू केलेले लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. १८ दिवसांत पुन्हा जिल्हा शासनाच्या आदेशासनुसार तिसऱ्या स्तरात गेला असून, आता आंतरजिल्हा प्रवासावर देखील निर्बंध येणार आहेत.

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणू संसर्गाची चाहूल लागल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुन्हा तिसऱ्या स्तरात आला आहे. याबाबत सोमवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. सर्व आस्थापनांना दुकाने उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा ठरवून दिल्या जातील. शनिवार, रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल. इतर दिवशी जमावबंदी असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. शासनाच्या आदेशानुसार शहर आणि जिल्हा तिसऱ्या स्तरात आले आहे, त्यामुळे कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटी टक्केवारी आणि ऑक्सिजन बेडवर किती रुग्ण आहेत, हा मुद्दा आता विचारात घेतला जाणार नाही. (  Aurangabad district again towards lockdown) 

दरम्यान डेल्टा प्लसची लागण झालेला रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळला असून जळगावकडून जिल्ह्याकडे येणाऱ्या सर्व सीमांवर वाहनांच्या कडक तपासणीच्या अनुषंगाने अ‍ँटिजन, आरटीपीसीआर करण्यास शुक्रवारपासूनच तयारी सुरू केली आहे. ७ जूनपासून कोरोनोच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू केलेले लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. शासनाच्या ५ जूनच्या वर्गवारीनुसार मनपा हद्द पहिल्या स्तरात आल्यामुळे शहराचा आर्थिक उलाढालीचा गाडा रुळावर आला. जमावबंदी आणि संचारबंदी मागे घेण्यात आल्यानंतर सगळे काही आलबेल सुरू झाले. त्यातच २१ जून रोजी जिल्ह्यातील निर्बंध मागे घेऊन ग्रामीण भागही तिसऱ्या स्तरातून पहिल्या स्तरात आणला. १८ दिवसांत पुन्हा जिल्हा शासनाच्या आदेशासनुसार तिसऱ्या स्तरात गेला असून, आता आंतरजिल्हा प्रवासावर देखील निर्बंध येणार आहेत.

तिसऱ्या स्तराचे नियम असे५ जून रोजी राज्य शासनाने अनलॉक करण्यासाठी पाच स्तर जाहीर केले होते. त्यानुसार औरंगाबाद शहर पहिल्या आणि जिल्हा तिसऱ्या स्तरात होता. तिसऱ्या स्तरात पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के असेल आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापलेले असतील तर या स्तरातील पूर्ण नियम संबंधित जिल्ह्याला लागू होतील, असे शासनाने स्पष्ट केले होते. सध्या शहराचा कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट ०.९४ टक्के आहे, तर ग्रामीण भागाचा २.३ टक्के आहे. ऑक्सिजन बेडवर २० टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण आहेत. त्यामुळे सोमवारी काय निर्णय होणार याकडे लक्ष असले तरी या टक्केवारीला आता काही फारसे महत्त्व राहणार नाही.

६ व २१ जून रोजी असलेली परिस्थिती अशीमहापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची पॉझिटिव्ह टक्केवारी २.२४ टक्के होती. ऑक्सिजन बेडवर २२.१९ टक्के रुग्णांची नोंद ६ जून रोजी होती. त्यामुळे शासन वर्गवारी नुसार शहर पहिल्या स्तरात आले. २१ जून पासून ग्रामीण भागातील रुग्णांची पॉझिटिव्हिटी २.९४ टक्के तर ऑक्सिजन बेडवर ६ टक्के असल्याने ग्रामीण भाग पहिल्या स्तरात आला होता. २८ जून पासून शहर व जिल्हा तिसऱ्या स्तरात येणार असल्याने व्यवहारास वेळेची बंधने येणार आहेत.

शहरात या घटकांना दिलेली आहे परवानगीतिसऱ्या टप्प्यात शहराचा समावेश सोमवारपासून होणार असल्याने वेळेची आणि गर्दीच्या कार्यक्रमांवर बंधने येणार आहेत. सध्या अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी दुकाने, इतर व्यवसाय व दुकाने, मॉल्स, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी केंद्र, सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बाग, सायकलिंग, मॉर्निंग वॉकिंगसाठी परवानगी आहे. खाजगी आस्थापना सर्व नियम पाळून १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यासह शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये नियमांसह १०० टक्के सुरू करण्यास परवागनी दिली आहे. क्रीडाप्रकार, चित्रीकरण, स्नेहसंमेलन, सामाजिक, सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रम, विवाह समांरभ, अंत्यविधी, सभा, निवडणुका, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्थांच्या आमसभांना सर्व नियम पाळून परवानगी दिलेली आहे. बांधकाम, कृषी संबंधित सर्व बाबी, ई-कॉमर्स सेवा, जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर नियमितपणे उघडण्यास परवानगी शहरात दिलेली आहे. पण सोमवारी कोणते निर्बंध लागू होतील, याकडे लक्ष आहे.                                    

ग्रामीण भागात तिसऱ्या स्तरातील नियम असे होते२१ जून पर्यंत जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा, व्यवसायाची दुकाने दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू होती. या व्यतिरिक्त दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत याच वेळेत सुरू होती. मॉल्स, चित्रपट, नाट्यगृहे पूर्णपणे बंद होते. रेस्टारंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन केंद्र सकाळी ७ ते सायं.४ या वेळेत ५० टक्के डायनिंग क्षमतेत सुरू होते. ४ वाजेनंतर पार्सल सेवा सुरू असेल, शनिवार, रविवार फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरीला मुभा देण्यात आली होती. सर्व उद्याने, मैदाने रोज पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत खुली करण्यात आली होती. खाजगी आस्थापना नियमित वेळेत सुरू राहण्यासह सर्व कार्यालयात (कोरोना फ्रंट वर्कर वगळून) ५० टक्के उपस्थितीत तर क्रीडा प्रकारांसाठी पहाटे ५ ते सकाळी ९ आणि सायं.६ ते ९ वेळेत मुभा दिली होती. विवाह सोहळ्यांना ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध होते. तर अंत्यविधीसाठी २० लोकांना परवानगी दिली होती. सोमवारपासून पूर्ण जिल्ह्यात असेच नियम लागू होतील, अशी शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद