शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

शिक्षणात भांडवलदारांची घुसखोरी

By admin | Updated: January 1, 2017 23:47 IST

लातूर : देशभरातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवलदारांनी व्यवसाय म्हणून घुसखोरी केल्यामुळे शिक्षणाचे मूल्य आणि दर्जा घसरत चालला आहे

लातूर : देशभरातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवलदारांनी व्यवसाय म्हणून घुसखोरी केल्यामुळे शिक्षणाचे मूल्य आणि दर्जा घसरत चालला आहे. देशभरातील शिक्षणात संधी, गुणवत्ता आणि समानता आणण्यासाठी आता जागरुक नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे मत गोवा येथील विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी लातुरात रविवारी व्यक्त केले. दयानंद सभागृहात झालेल्या दुसऱ्या विवेक जागर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. विचार मंचावर डॉ. सतीश यादव, डॉ. मा. मा. जाधव, डॉ. संजय वाघमारे, डॉ. कमलाकर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तेलतुंबडे म्हणाले, ज्यांचा शिक्षणाचा काडीचाही संबंध नाही, अशांनी आता शिक्षणक्षेत्रावर आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. शिक्षणक्षेत्र म्हणजे पैसा मिळविण्याचे साधन झाले आहे. सध्याच्या शिक्षणाचे धोरण भांडवलदार मंडळी ठरवू लागली आहेत. परिणामी, श्रमिक, दलित, शोषित, वंचित आणि पीडित वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. ‘ज्यांच्या खिशात पैसा त्यांचे शिक्षण’ ही नवी पध्दत आता रुढ झाली आहे. त्यामुळे शिक्षणातील समानता संपुष्टात आल्याने दर्जाही घसरला आहे. दुसऱ्या सत्रात ‘समकालीन भारतीय शिक्षण धोरण’ या विषयावर प्रा. डॉ. किशोर ठेकेदत्त, मुंबई तर ‘मुक्तीदायी शिक्षणाच्या दिशेने’ या विषयावर प्रा. डॉ. श्रीकांत काळोखे अहमदनगर यांनी पुष्प गुंफले. सूत्रसंचालन नागेश पाटील तर आभार प्रा. किशन कुकडे यांनी मानले.अहमदनगर येथील प्रा. डॉ. श्रीकांत काळेखे यांनी भांडवली शिक्षण व्यवस्थेवर हल्ला चढविला. ग्रामीण आणि आदिवासी भाषेला, संस्कृतीला अभ्यासक्रमात महत्व नाही. त्याला मान्यता नाही. त्यांच्या सोईची आणि कष्टकरी, पीडित अन् बहुजनांच्या विद्यार्थ्यांना नाउमेद करणारे शैक्षणिक धोरण बदलले पाहिजे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)