शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शिक्षणात भांडवलदारांची घुसखोरी

By admin | Updated: January 1, 2017 23:47 IST

लातूर : देशभरातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवलदारांनी व्यवसाय म्हणून घुसखोरी केल्यामुळे शिक्षणाचे मूल्य आणि दर्जा घसरत चालला आहे

लातूर : देशभरातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवलदारांनी व्यवसाय म्हणून घुसखोरी केल्यामुळे शिक्षणाचे मूल्य आणि दर्जा घसरत चालला आहे. देशभरातील शिक्षणात संधी, गुणवत्ता आणि समानता आणण्यासाठी आता जागरुक नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे मत गोवा येथील विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी लातुरात रविवारी व्यक्त केले. दयानंद सभागृहात झालेल्या दुसऱ्या विवेक जागर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. विचार मंचावर डॉ. सतीश यादव, डॉ. मा. मा. जाधव, डॉ. संजय वाघमारे, डॉ. कमलाकर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तेलतुंबडे म्हणाले, ज्यांचा शिक्षणाचा काडीचाही संबंध नाही, अशांनी आता शिक्षणक्षेत्रावर आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. शिक्षणक्षेत्र म्हणजे पैसा मिळविण्याचे साधन झाले आहे. सध्याच्या शिक्षणाचे धोरण भांडवलदार मंडळी ठरवू लागली आहेत. परिणामी, श्रमिक, दलित, शोषित, वंचित आणि पीडित वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. ‘ज्यांच्या खिशात पैसा त्यांचे शिक्षण’ ही नवी पध्दत आता रुढ झाली आहे. त्यामुळे शिक्षणातील समानता संपुष्टात आल्याने दर्जाही घसरला आहे. दुसऱ्या सत्रात ‘समकालीन भारतीय शिक्षण धोरण’ या विषयावर प्रा. डॉ. किशोर ठेकेदत्त, मुंबई तर ‘मुक्तीदायी शिक्षणाच्या दिशेने’ या विषयावर प्रा. डॉ. श्रीकांत काळोखे अहमदनगर यांनी पुष्प गुंफले. सूत्रसंचालन नागेश पाटील तर आभार प्रा. किशन कुकडे यांनी मानले.अहमदनगर येथील प्रा. डॉ. श्रीकांत काळेखे यांनी भांडवली शिक्षण व्यवस्थेवर हल्ला चढविला. ग्रामीण आणि आदिवासी भाषेला, संस्कृतीला अभ्यासक्रमात महत्व नाही. त्याला मान्यता नाही. त्यांच्या सोईची आणि कष्टकरी, पीडित अन् बहुजनांच्या विद्यार्थ्यांना नाउमेद करणारे शैक्षणिक धोरण बदलले पाहिजे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)