शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणात भांडवलदारांची घुसखोरी

By admin | Updated: January 1, 2017 23:47 IST

लातूर : देशभरातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवलदारांनी व्यवसाय म्हणून घुसखोरी केल्यामुळे शिक्षणाचे मूल्य आणि दर्जा घसरत चालला आहे

लातूर : देशभरातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवलदारांनी व्यवसाय म्हणून घुसखोरी केल्यामुळे शिक्षणाचे मूल्य आणि दर्जा घसरत चालला आहे. देशभरातील शिक्षणात संधी, गुणवत्ता आणि समानता आणण्यासाठी आता जागरुक नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे मत गोवा येथील विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी लातुरात रविवारी व्यक्त केले. दयानंद सभागृहात झालेल्या दुसऱ्या विवेक जागर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. विचार मंचावर डॉ. सतीश यादव, डॉ. मा. मा. जाधव, डॉ. संजय वाघमारे, डॉ. कमलाकर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तेलतुंबडे म्हणाले, ज्यांचा शिक्षणाचा काडीचाही संबंध नाही, अशांनी आता शिक्षणक्षेत्रावर आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. शिक्षणक्षेत्र म्हणजे पैसा मिळविण्याचे साधन झाले आहे. सध्याच्या शिक्षणाचे धोरण भांडवलदार मंडळी ठरवू लागली आहेत. परिणामी, श्रमिक, दलित, शोषित, वंचित आणि पीडित वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. ‘ज्यांच्या खिशात पैसा त्यांचे शिक्षण’ ही नवी पध्दत आता रुढ झाली आहे. त्यामुळे शिक्षणातील समानता संपुष्टात आल्याने दर्जाही घसरला आहे. दुसऱ्या सत्रात ‘समकालीन भारतीय शिक्षण धोरण’ या विषयावर प्रा. डॉ. किशोर ठेकेदत्त, मुंबई तर ‘मुक्तीदायी शिक्षणाच्या दिशेने’ या विषयावर प्रा. डॉ. श्रीकांत काळोखे अहमदनगर यांनी पुष्प गुंफले. सूत्रसंचालन नागेश पाटील तर आभार प्रा. किशन कुकडे यांनी मानले.अहमदनगर येथील प्रा. डॉ. श्रीकांत काळेखे यांनी भांडवली शिक्षण व्यवस्थेवर हल्ला चढविला. ग्रामीण आणि आदिवासी भाषेला, संस्कृतीला अभ्यासक्रमात महत्व नाही. त्याला मान्यता नाही. त्यांच्या सोईची आणि कष्टकरी, पीडित अन् बहुजनांच्या विद्यार्थ्यांना नाउमेद करणारे शैक्षणिक धोरण बदलले पाहिजे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)