शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनवारीमुळे विद्यार्थी वाऱ्यावर

By admin | Updated: February 2, 2016 00:27 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नवी मुंबईतील पटनी मैदानावर आयोजित त्रैमासिक अधिवेशनासाठी जिल्ह्यातील

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नवी मुंबईतील पटनी मैदानावर आयोजित त्रैमासिक अधिवेशनासाठी जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनीही हजेरी लावली आहे़ एकाच शाळेतील अनेक शिक्षक गेल्याचा प्रकार समोर येत आहे. एकट्या कळंब तालुक्यातील ६९८ पैकी ४६७ तर भुम तालुक्यातून ४४६ पैकी २४१ शिक्षक अधिवेशन वारीवर गेले आहेत. तर वाशी तालुक्यातील ३१२ पैकी २२४ शिक्षक शाळेवर नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नवी मुंबईतील पटनी मैदानावर त्रैमासिक अधिवेशन भरविण्यात आले आहे़ या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना आॅन ड्युटी रजा मंजूर करण्यात आली आहे़ मात्र, ग्रामविकास खात्याचे याबाबत कोणतेही आदेश नसताना अनेक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अधिवेशनाच्या नावाखाली शाळेवर गैहजर राहिल्याचा प्रकार जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये दिसून आला़ विशेषत: कळंब, भूम, वाशी परिसरातील अनेक शिक्षकांनी या अधिवेशनाच्या नावावर शाळेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले़ कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आठ तर माध्यमिक शाळेतील १० असे १८ शिक्षक सोमवारी गैरहजर असल्याचे दिसून आले़ हा प्रकार शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य महादेव शेळके यांनी पाहणी केल्यानंतर समोर आला़ शेळके यांनी याबाबत तत्काळ जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली़ रायते यांनी या प्रकरणात तक्रार द्या, कारवाई करू, असे सांगितल्याची माहिती शेळके यांनी दिली़ तर सांजा येथील पालक प्रविण वसुदेव सूर्यवंशी, सुरेश संग्राम भोसले या पालकांनीही अनधिकृतपणे शाळेवर गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी केली आहे़ दरम्यान, शिक्षण विभागाने पर्यायी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.याबाबत शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अधिवेशनाबाबत अगोदर सर्व शाळांबाबत पत्रक काढले होते़ मात्र, दुसरे पत्र खासगी शाळांबाबत काढले असून, शाळा बंद राहणार नाहीत व शिक्षक गैरहजर राहणार नाहीत याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे़ शिक्षक अधिवेशनाला गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत़ मुख्याध्यापकांनी कामात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे़ अधिवेशनाला किती शिक्षक गेले याची माहिती मागविण्यात आली आहे़ जे शिक्षक अनधिकृतपणे अधिवेशनाला गेले असतील त्यांची रजा ही त्यांच्या अर्जित रजेत वर्ग करण्यात येणार आहे़ शिवाय त्यांच्या सेवा पुस्तिकेवरही याची नोंद करण्यात येणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले़