शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

अधिवेशनवारीमुळे विद्यार्थी वाऱ्यावर

By admin | Updated: February 2, 2016 00:27 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नवी मुंबईतील पटनी मैदानावर आयोजित त्रैमासिक अधिवेशनासाठी जिल्ह्यातील

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नवी मुंबईतील पटनी मैदानावर आयोजित त्रैमासिक अधिवेशनासाठी जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनीही हजेरी लावली आहे़ एकाच शाळेतील अनेक शिक्षक गेल्याचा प्रकार समोर येत आहे. एकट्या कळंब तालुक्यातील ६९८ पैकी ४६७ तर भुम तालुक्यातून ४४६ पैकी २४१ शिक्षक अधिवेशन वारीवर गेले आहेत. तर वाशी तालुक्यातील ३१२ पैकी २२४ शिक्षक शाळेवर नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नवी मुंबईतील पटनी मैदानावर त्रैमासिक अधिवेशन भरविण्यात आले आहे़ या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना आॅन ड्युटी रजा मंजूर करण्यात आली आहे़ मात्र, ग्रामविकास खात्याचे याबाबत कोणतेही आदेश नसताना अनेक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अधिवेशनाच्या नावाखाली शाळेवर गैहजर राहिल्याचा प्रकार जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये दिसून आला़ विशेषत: कळंब, भूम, वाशी परिसरातील अनेक शिक्षकांनी या अधिवेशनाच्या नावावर शाळेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले़ कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आठ तर माध्यमिक शाळेतील १० असे १८ शिक्षक सोमवारी गैरहजर असल्याचे दिसून आले़ हा प्रकार शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य महादेव शेळके यांनी पाहणी केल्यानंतर समोर आला़ शेळके यांनी याबाबत तत्काळ जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली़ रायते यांनी या प्रकरणात तक्रार द्या, कारवाई करू, असे सांगितल्याची माहिती शेळके यांनी दिली़ तर सांजा येथील पालक प्रविण वसुदेव सूर्यवंशी, सुरेश संग्राम भोसले या पालकांनीही अनधिकृतपणे शाळेवर गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी केली आहे़ दरम्यान, शिक्षण विभागाने पर्यायी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.याबाबत शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अधिवेशनाबाबत अगोदर सर्व शाळांबाबत पत्रक काढले होते़ मात्र, दुसरे पत्र खासगी शाळांबाबत काढले असून, शाळा बंद राहणार नाहीत व शिक्षक गैरहजर राहणार नाहीत याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे़ शिक्षक अधिवेशनाला गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत़ मुख्याध्यापकांनी कामात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे़ अधिवेशनाला किती शिक्षक गेले याची माहिती मागविण्यात आली आहे़ जे शिक्षक अनधिकृतपणे अधिवेशनाला गेले असतील त्यांची रजा ही त्यांच्या अर्जित रजेत वर्ग करण्यात येणार आहे़ शिवाय त्यांच्या सेवा पुस्तिकेवरही याची नोंद करण्यात येणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले़