शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

नाथषष्ठी रद्द झाल्याने ७० कोटींच्या उलाढालीला लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 19:44 IST

आर्थिक गणित कोलमडले, व्यापारी माघारी

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना बसला मोठा फटका  पैठण शहरातील नाथषष्ठी यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालते.

- संजय जाधव 

पैठण : जवळपास ७० कोटींची उलाढाल होणारी नाथषष्ठी यात्रा प्रशासनाने ऐन वेळेवर रद्द केल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पैठण शहरातील व बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या या निर्णयामुळे जबर हादरा बसला असून, जवळपास ७० कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे. बुधवारी पैठण शहरातून परत जाताना अनेक व्यापाऱ्यांचे डोळे पाणवले होते. 

पैठण शहरातील नाथषष्ठी यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालते. यात्रेत बैलगाडीपासून गळ्यातील तुळशीमाळेपर्यंत सर्वकाही मिळते. ज्या वस्तू शहरी बाजारपेठेत मिळत नाहीत, अशी घोंगडी, बेलने, पोळपाट, मृदंग, पेटी, तबला, चाटू, काठवत, भांडे, निरंजन, समयी, टाळ, अशा अनेक वस्तूंची दुकाने यात्रेत १५ दिवस व्यवसाय करतात. 

नाथषष्ठी यात्रेत व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रभरातून व्यापारी येतातच. शिवाय गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांतील व्यापारीही हजेरी लावतात. नाथषष्ठीसाठी पैठण शहरातील व्यापारी महिनाभरापासून तयारी करतात. शहरातील वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता किराणा माल व कापड मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी भरून ठेवला आहे. वर्षभरात जेवढा किराणा माल विकला जातो. तेवढाच माल षष्ठी कालावधीत विकला जातो. यामुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने नाथषष्ठी यात्रेचे मोठे महत्त्व आहे. एकंदरीत स्थानिक व बाहेरचे व्यापारी मिळून नाथषष्ठी यात्रेत ७० कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, नाथषष्ठीच रद्द झाल्यामुळे ७० ते ८० कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे.

दीड कोटीचा रवा, मैदा खराब होणारनाथषष्ठीदरम्यान पैठण शहरात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांकडून रवा, मैदा व बेसन यासह साखर, मुरमुरे मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. नाथषष्ठीमुळे पैठण शहरातील व्यापाऱ्यांनी रवा, मैदा, बेसन, साखर आदी जवळपास दीड कोटी रुपयांचा माल दुकानात भरला आहे. यात्रा रद्द झाल्याने आता हा माल विकला जाणार नाही. दुकानातही हा माल जास्त दिवस टिकत नाही. यामुळे शहरातील किराणा व्यापाऱ्यांना रवा, मैदा विक्री न झाल्यामुळे दीड कोटीचा फटका बसणार असल्याचे किराणा व्यापारी मधुसूदन मुंदडा यांनी सांगितले.

२० लाख रुपयांचा माल उधारीवर दिला, रक्कम गुंतलीनाथषष्ठीदरम्यान धोतर, लुगडे, सेमी पैठणी व उपरणे आदींची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यामुळे दुकानातील स्टॉक वाढवला. दरम्यान, इतर व्यापाऱ्यांना षष्ठीदरम्यान विक्रीसाठी होलसेल दराने २० लाख रुपयांचा माल दिला आहे. यात्रा रद्द झाल्याने मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतून पडला आहे. पुढील काही वर्षे याचा परिणाम व्यवसायावर होण्याची भीती शहरातील कापड व्यापारी पवन लोहिया यांनी व्यक्त केली असून, इतर सर्व व्यापाऱ्यांची अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले.

देणगीतही घट होणार यात्रा रद्द करायची होती, तर अगोदर कल्पना द्यायला पाहिजे होती. यात्रेची आढावा बैठक घेऊन दुसऱ्या दिवशी प्रशासनाने यात्रा रद्द केल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे व्यापारी नंदलाल लाहोटी यांनी सांगितले. यात्रा रद्द झाल्याने नाथ संस्थानच्या देणगी पेटीलाही फटका बसणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय