शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

नाथषष्ठी रद्द झाल्याने ७० कोटींच्या उलाढालीला लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 19:44 IST

आर्थिक गणित कोलमडले, व्यापारी माघारी

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना बसला मोठा फटका  पैठण शहरातील नाथषष्ठी यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालते.

- संजय जाधव 

पैठण : जवळपास ७० कोटींची उलाढाल होणारी नाथषष्ठी यात्रा प्रशासनाने ऐन वेळेवर रद्द केल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पैठण शहरातील व बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या या निर्णयामुळे जबर हादरा बसला असून, जवळपास ७० कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे. बुधवारी पैठण शहरातून परत जाताना अनेक व्यापाऱ्यांचे डोळे पाणवले होते. 

पैठण शहरातील नाथषष्ठी यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालते. यात्रेत बैलगाडीपासून गळ्यातील तुळशीमाळेपर्यंत सर्वकाही मिळते. ज्या वस्तू शहरी बाजारपेठेत मिळत नाहीत, अशी घोंगडी, बेलने, पोळपाट, मृदंग, पेटी, तबला, चाटू, काठवत, भांडे, निरंजन, समयी, टाळ, अशा अनेक वस्तूंची दुकाने यात्रेत १५ दिवस व्यवसाय करतात. 

नाथषष्ठी यात्रेत व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रभरातून व्यापारी येतातच. शिवाय गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांतील व्यापारीही हजेरी लावतात. नाथषष्ठीसाठी पैठण शहरातील व्यापारी महिनाभरापासून तयारी करतात. शहरातील वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता किराणा माल व कापड मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी भरून ठेवला आहे. वर्षभरात जेवढा किराणा माल विकला जातो. तेवढाच माल षष्ठी कालावधीत विकला जातो. यामुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने नाथषष्ठी यात्रेचे मोठे महत्त्व आहे. एकंदरीत स्थानिक व बाहेरचे व्यापारी मिळून नाथषष्ठी यात्रेत ७० कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, नाथषष्ठीच रद्द झाल्यामुळे ७० ते ८० कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे.

दीड कोटीचा रवा, मैदा खराब होणारनाथषष्ठीदरम्यान पैठण शहरात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांकडून रवा, मैदा व बेसन यासह साखर, मुरमुरे मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. नाथषष्ठीमुळे पैठण शहरातील व्यापाऱ्यांनी रवा, मैदा, बेसन, साखर आदी जवळपास दीड कोटी रुपयांचा माल दुकानात भरला आहे. यात्रा रद्द झाल्याने आता हा माल विकला जाणार नाही. दुकानातही हा माल जास्त दिवस टिकत नाही. यामुळे शहरातील किराणा व्यापाऱ्यांना रवा, मैदा विक्री न झाल्यामुळे दीड कोटीचा फटका बसणार असल्याचे किराणा व्यापारी मधुसूदन मुंदडा यांनी सांगितले.

२० लाख रुपयांचा माल उधारीवर दिला, रक्कम गुंतलीनाथषष्ठीदरम्यान धोतर, लुगडे, सेमी पैठणी व उपरणे आदींची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यामुळे दुकानातील स्टॉक वाढवला. दरम्यान, इतर व्यापाऱ्यांना षष्ठीदरम्यान विक्रीसाठी होलसेल दराने २० लाख रुपयांचा माल दिला आहे. यात्रा रद्द झाल्याने मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतून पडला आहे. पुढील काही वर्षे याचा परिणाम व्यवसायावर होण्याची भीती शहरातील कापड व्यापारी पवन लोहिया यांनी व्यक्त केली असून, इतर सर्व व्यापाऱ्यांची अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले.

देणगीतही घट होणार यात्रा रद्द करायची होती, तर अगोदर कल्पना द्यायला पाहिजे होती. यात्रेची आढावा बैठक घेऊन दुसऱ्या दिवशी प्रशासनाने यात्रा रद्द केल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे व्यापारी नंदलाल लाहोटी यांनी सांगितले. यात्रा रद्द झाल्याने नाथ संस्थानच्या देणगी पेटीलाही फटका बसणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय