शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

‘संगमेश्वर’चा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 00:06 IST

ईट : येथील जवळील मांजरा नदीवरील संगमेश्वर कालवा फुटल्यामुळे हे पाणी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे.

ईट : येथील जवळील मांजरा नदीवरील संगमेश्वर मध्यम प्रकल्पावर पाटबंधारे विभागाने २० वर्षांपूर्वी ६२ कोटी रुपये खर्च करून प्रकल्पाची उभारणी केली. मात्र, मागील काही दिवसांपासून कालवा फुटल्यामुळे हे पाणी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. बीड-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या मांजरा नदीवर संगमेश्वर मध्यम प्रकल्पास डॉ. पद्मसिंह पाटील यांनी १९८९ साली मंजुरी घेऊन या कामासाठी ६.५ कोटी रुपयांची तरतूद केली; परंतु सुधारित अंदाजपत्रकानसार या प्रकल्पावर ६२ कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च करण्यात आले. या प्रकल्पाच्या उभारणीचे मातीकाम १९९२ ला पूर्ण झाले, तर कंधभरणीचे काम १९९५ साली पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पावरून उजवा व डावा अशा दोन कालव्यांची कामे करण्यात आली. उजवा कालव्याचे अंतर ३० किमी असून, हा कालवा ईट, पांढरेवाडी, डोकेवाडी, गिरवली, पारगाव, रुई, जेबा हातोला, पांगरी, ब्रह्मगाव, लाखनगाव पारा, पिंपळगाव या गावांच्या शिवारातून जातो. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या डावा कालव्याचे अंतर २९.५ किमी असून, तो वाढवणा, पिंपळगाव, हिंगणी (बु), हिंगणी (खु), जेंबा, पिंपरी, पोत्रा, पांगरी, पारगाव, पालसिंगण या गावच्या शिवारामध्ये आहे.दोन्ही कालव्याच्या माध्यमातून याद्वारे २४५० हेक्टर शेतीस पाणी मिळणार होते; दोन्ही कालव्याचे खोलीकरण कालव्यावर उभारलेले पूल, शेतचारीचे अपूर्ण कामे व वाढलेली झाडे-झुडपे यामुळे ५०० ते १००० मी. अंतरावर कालवा फुटून प्रकल्पातील सोडलेले पाणी नदीपात्रातून वाहून जात आहे. त्यामुळे प्रकल्पापासून ५०० मी. अंतरातही पाणी कालव्याद्वारे अद्यापपर्यंत जाऊ शकत नाही. (वार्ताहर)