शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे

By admin | Updated: August 7, 2014 23:35 IST

जालना : जिल्हा परिषदेतील अत्यंत महत्वाचा समजला जाणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात आता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस

जालना : जिल्हा परिषदेतील अत्यंत महत्वाचा समजला जाणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात आता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीची तरतूद उपकर कार्यालयीन खर्चामधून करण्यात आली आहे.गतवर्षी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला कॉर्पोरेट लूक देण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आसन व्यवस्था अत्यंत सुटसुटीत झाली. मात्र या विभागामध्ये संगणक संच, झेरॉक्स मशीन, स्कॅनर आदींची उणीव जाणवत होती. संगणक संच अपूर्ण होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शासकीय कामे वेळेत पूर्ण करणे अशक्य होते. ही अडचण लक्षात घेता उपकर कार्यालयीन खर्चातून या सुविधांवरही तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात दुष्काळाचा सामना करताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाकडे गतवर्षी जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. या विभागात कर्मचारी संख्या पुरेशी असली तरी कामांमध्ये विलंब झाल्याचे प्रकारही गेल्या काही काळात जिल्हा परिषद सभांमधून सदस्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. त्यामुळे आता या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर कार्यालयीन वेळेत लक्ष ठेवता यावे, यासाठी उपकरातून जीपीएस कॅमेऱ्यांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. या कॅमेऱ्यांद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवू शकणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात वेळेवर कामकाज आटोपण्याची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. हे कॅमेरे लवकरच बसविण्यात येणार असून त्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.दरम्यान, कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी ४० खर्ु्च्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंबंधीचा ठराव नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडून तो मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)