शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासवर केबलचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:03 IST

सातारा-देवळाई वसाहतीत बीड बायपासवरील पथदिव्यांवर विविध केबलचे जाळे अंथरले असून, केबल टाकण्याची परवानगी नसल्याचे सांगितले जात असले तरी विद्युत विभाग व मालमत्ता विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा-देवळाई वसाहतीत बीड बायपासवरील पथदिव्यांवर विविध केबलचे जाळे अंथरले असून, केबल टाकण्याची परवानगी नसल्याचे सांगितले जात असले तरी विद्युत विभाग व मालमत्ता विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलीत आहेत. सोसाट्याच्या वा-याने वायर तुटून वाहनचालकाच्या अपघातास ते कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.सातारा-देवळाई परिसर झपाट्याने वाढला असून, महानुभाव आश्रम चौक ते देवळाई चौक दुतर्फा विविध वसाहती, दवाखाने, महाविद्यालये, व्यावसायिक दुकाने आहेत. रस्त्यावर जड वाहनांपासून ते दुचाकी व पादचा-यांची नेहमीच वर्दळ असते. अतिताण व सोसाट्याच्या वा-यात किंवा वाहनाचा धक्का खांबाला लागून वायर रस्त्यावर अडसर ठरते.लोडशेडिंग सुरू झाल्याने रस्त्यावर लटकलेले वायर दुचाकीस्वारासाठी धोका ठरू शकते. अंधारात दुचाकीस्वाराला धोकादायक वायर दिसले नाही तर गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे.पथदिव्यावर एक नव्हे, दोन नव्हे, तर डझनभर वायरींचे जाळे पसरले आहे. या वायर टाकण्यासाठी परवानगी घेतली किंवा नाही याविषयी मनपाच्या विद्युत विभागाने चेंडू मालमत्ता विभागाकडे टोलविला, तर त्यांनी तो परत विद्युत विभागाकडे टोलविला.खांबावर टाकलेल्या वायरमध्ये विद्युत प्रवाह नसल्याने त्या धोकादायक नसल्याचेही अनेकांनी मोघम मत मांडले; परंतु परवानगी घेतली नसेल तर महसूल बुडत असल्याचेही सांगितले. त्याचा सर्वे करून त्यावर कारवाई करण्यात येऊ शकते; परंतु ही जबाबदारी दुस-या विभागाकडे असल्याचेही पुन्हा टोलविले.मनपाच्या अधिका-यांनी दक्षता घ्यावी, अशी मागणी प्रा.अरविंद अवसरमोल, संदीप कुलकर्णी, कुलदीप शिंदे, जे. के. पाटील, रूपाली गायकवाड, बाळासाहेब मोरे आदींनी केली आहे.