शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनाच्या विक्रीतून बी-बियाणांची खरेदी

By admin | Updated: June 11, 2014 00:34 IST

नजीर कुरेशी , पारडगाव घनसावंगी तालुक्यातील पारडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी बी-बियाणांची तयारी कशी करावी म्हणून पशुधनाच्या विक्रीचा पर्याय निवडला आहे.

नजीर कुरेशी , पारडगावघनसावंगी तालुक्यातील पारडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी बी-बियाणांची तयारी कशी करावी म्हणून पशुधनाच्या विक्रीचा पर्याय निवडला आहे. या विक्रीतून बियाणे खरेदी केली जात आहेत.बेमोसमी पाऊस आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये झालेली गारपीट यामुळे रबी पिकाचे नुकसान झाले. आता खरीप पिकाच्या पेरणीसाठी लागणारा पैसा कोठून आणायचा? असा प्रश्न बळीराजासमोर आहे. गारपीट झालेल्या अनुदानाची प्रतीक्षा करीत असून मृग नक्षत्राचा पाऊस पडलेला आहे.पारडगावच्या आठवडी बाजारात कानोसा घेतला असता वरील धक्कादायक प्रकार नजरेस पडतो. बाजारात जनावरांना विक्रीसाठी आणलेल्या अनेक पशुपालकांसोबत चर्चा केली असता बी-बियाणे व खते खरेदीसाठी जनावरे विक्री केल्याशिवाय पर्याय नसल्याचे ते सांगतात. पीक कर्जासाठी प्रस्ताव दाखल तर केले, परंतु सदर पैसे पेरणीची वेळ निघून गेल्यावर मिळतील. तोपर्यंत थांबले तर पेरणीस उशिरा होईल, पर्यायाने पिकाच्या वाढीवर व उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होतो. खासगी सावकाराकडे पैशाचा तगादा लावला असला तरी त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत नसलयाचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गतवर्षी झालेल्या गारपीट, वादळी पावसाची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. जवळ असलेल्या पै-पैशातून घर चालविले. लेकीबाळीचे लग्न केले. आता खिशात दमडीही राहिलेली नाही. बॅँक आणि सोसायट्याकडून पैसे मिळतील तेव्हा मिळतील. परंतू पाऊस पडण्याअगोदर घरात बी-बियाणे, रासायनिक खते व औषधीचा साठा करुन ठेवावा लागतो. पाऊस पडल्याबरोबर शेतीची कामे सुरु होतात. त्यामुळे शेतात जाण्यास उसंत मिळत नाही. त्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या जनावरांना विकून त्यातून बी-बियाणे खरेदी करणेच जास्त सोयीस्कर ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे येते. जवळची बैलजोडी विकली तर शेतीची वहिती करण्याचा प्रश्न येतो. या परिस्थितीत गावातील काही अल्पभूधारक शेतकऱ्यांसोबत सांगड घालून काम करावे लागते. त्यामुळे त्याचेही भागते व आपलेही काम भागते. त्याचा एक बैल व आपला एक बैल अशी तडजोडीची भूमिका घेऊन वेळ निभावून न्यावा लागतो. अनुदान तात्काळ देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.घोषणा अन् आश्वासनेगतवर्षीच्या नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. मायबाप सरकारने मदतीची घोषणा केली. पारडगाव परिसरातील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले. आश्वासने दिली. मात्र, अद्यापही शासनाची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.