शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

पशुधनाच्या विक्रीतून बी-बियाणांची खरेदी

By admin | Updated: June 11, 2014 00:34 IST

नजीर कुरेशी , पारडगाव घनसावंगी तालुक्यातील पारडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी बी-बियाणांची तयारी कशी करावी म्हणून पशुधनाच्या विक्रीचा पर्याय निवडला आहे.

नजीर कुरेशी , पारडगावघनसावंगी तालुक्यातील पारडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी बी-बियाणांची तयारी कशी करावी म्हणून पशुधनाच्या विक्रीचा पर्याय निवडला आहे. या विक्रीतून बियाणे खरेदी केली जात आहेत.बेमोसमी पाऊस आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये झालेली गारपीट यामुळे रबी पिकाचे नुकसान झाले. आता खरीप पिकाच्या पेरणीसाठी लागणारा पैसा कोठून आणायचा? असा प्रश्न बळीराजासमोर आहे. गारपीट झालेल्या अनुदानाची प्रतीक्षा करीत असून मृग नक्षत्राचा पाऊस पडलेला आहे.पारडगावच्या आठवडी बाजारात कानोसा घेतला असता वरील धक्कादायक प्रकार नजरेस पडतो. बाजारात जनावरांना विक्रीसाठी आणलेल्या अनेक पशुपालकांसोबत चर्चा केली असता बी-बियाणे व खते खरेदीसाठी जनावरे विक्री केल्याशिवाय पर्याय नसल्याचे ते सांगतात. पीक कर्जासाठी प्रस्ताव दाखल तर केले, परंतु सदर पैसे पेरणीची वेळ निघून गेल्यावर मिळतील. तोपर्यंत थांबले तर पेरणीस उशिरा होईल, पर्यायाने पिकाच्या वाढीवर व उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होतो. खासगी सावकाराकडे पैशाचा तगादा लावला असला तरी त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत नसलयाचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गतवर्षी झालेल्या गारपीट, वादळी पावसाची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. जवळ असलेल्या पै-पैशातून घर चालविले. लेकीबाळीचे लग्न केले. आता खिशात दमडीही राहिलेली नाही. बॅँक आणि सोसायट्याकडून पैसे मिळतील तेव्हा मिळतील. परंतू पाऊस पडण्याअगोदर घरात बी-बियाणे, रासायनिक खते व औषधीचा साठा करुन ठेवावा लागतो. पाऊस पडल्याबरोबर शेतीची कामे सुरु होतात. त्यामुळे शेतात जाण्यास उसंत मिळत नाही. त्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या जनावरांना विकून त्यातून बी-बियाणे खरेदी करणेच जास्त सोयीस्कर ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे येते. जवळची बैलजोडी विकली तर शेतीची वहिती करण्याचा प्रश्न येतो. या परिस्थितीत गावातील काही अल्पभूधारक शेतकऱ्यांसोबत सांगड घालून काम करावे लागते. त्यामुळे त्याचेही भागते व आपलेही काम भागते. त्याचा एक बैल व आपला एक बैल अशी तडजोडीची भूमिका घेऊन वेळ निभावून न्यावा लागतो. अनुदान तात्काळ देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.घोषणा अन् आश्वासनेगतवर्षीच्या नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. मायबाप सरकारने मदतीची घोषणा केली. पारडगाव परिसरातील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले. आश्वासने दिली. मात्र, अद्यापही शासनाची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.