शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनी पाठ फिरवल्याने हॉटेल उद्योगाचा व्यवसाय अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 13:13 IST

उन्हाळा, विमानाच्या कमतरतेचा फटका

ठळक मुद्देवाहन उद्योगातील मंदीचाही परिणामशहरातील पर्यटनस्थळांचा विकास महत्त्वाचा 

औरंगाबाद : मागील चार महिने हॉटेल उद्योगासाठी अत्यंत कठीण गेले. उन्हाळा, त्यात मुंबईचे विमान रद्द झाले, थेट शिर्डीत विमानसेवा सुरू, तसेच ऑटोमोबाईल हबमधील मंदी या सर्वांचा परिपाक म्हणून येथील हॉटेल उद्योगाचा व्यवसाय ५० टक्क्यांपर्यंत घटला आहे. मात्र, आता सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात पुन्हा एकदा, मुंबई- औरंगाबाद विमानसेवा सुरू होण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू झाल्याने पुढील हंगाम चांगला राहील, अशी आशा हॉटेल उद्योगात निर्माण झाली आहे. 

औरंगाबादेत लहान-मोठे मिळून सुमारे १५० पेक्षा अधिक हॉटेल, लॉजिंग बोर्डिंग आहेत. यात पंचतारांकित हॉटेलांचाही समावेश आहे. सर्व मिळून सरासरी २,३०० खोल्या आहेत. येथील जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी विदेशातील पर्यटक शहरात येतात, तसेच धार्मिक पर्यटकही येथे मोठ्या प्रमाणात येतात. देशविदेशांतूनही औद्योगिक पर्यटकही येत असतात. जून ते जानेवारी हा येथील पर्यटनाचा हंगाम असतो. मात्र, मार्च महिन्यात मुंबई- औरंगाबाद जेट विमानसेवा बंद पडली. त्यात शिर्डी येथे नवीन विमानतळ सुरू झाले, तसेच ऑटोमोबाईल उद्योगातील मंदी या सर्वांचा फटका येथील हॉटेल उद्योगाला बसला. 

उन्हाळ्यात औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटक कमीच येतात. मात्र, या वेळेस ५० टक्क्यांपर्यंत व्यवसाय घटल्याचे या उद्योगातील व्यवस्थापकांनी सांगितले. २,३०० खोल्या आहेत, त्यापैकी निम्म्या खोल्या रिकाम्या राहत होत्या. एवढेच नव्हे तर रेस्टॉरंटमधील व्यवसायही ६० टक्क्यांपर्यंत कमी झाला. पंचतारांकित हॉटेलानांही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शहरातील पाणीटंचाई, कचरा, तसेच अजिंठ्याच्या रस्त्याची लागलेली वाट याची माहिती सतत सोशल मीडियामुळे अपटेड होत असते. पर्यटक सोशल मीडियातील बातम्या वाचून शहरात येणे टाळत असल्याचेही या क्षेत्रातील व्यवस्थापकांनी सांगितले. पर्यटकांची संख्या घटल्याचा परिणाम, हॉटेल उद्योगासोबत अन्य व्यवसायांवरही झाला आहे. 

मात्र, आता देशांतर्गत पर्यटन, उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी विमानांची संख्या वाढवून राजस्थान, दिल्ली आणि मुंबईची एअर कनेक्टिव्हिटी बळकट करण्याच्या मागणीसाठी टूर आॅपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या नवीन हंगामाआधी जर नवीन विमानसेवा सुरू झाल्या, तर पर्यटकांची संख्या वाढेल व हॉटेलसह संपूर्ण पर्यटन उद्योगाला फायदा होईल, असा विचार हॉटेल उद्योगातून व्यक्त केला जात आहे.

शहरातील पर्यटनस्थळांचा विकास महत्त्वाचा वेरूळ, अजिंठा, देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा यामुळे पर्यटनाची राजधानी म्हणून औरंगाबाद ओळखले जाते; पण पर्यटक जास्त दिवस थांबण्यासाठी शहरातही पर्यटनस्थळे विकसित होणे आवश्यक आहे. यासाठी सलीम अली सरोवर, हिमायत बाग, सिद्धार्थ गार्डन चांगले विकसित होऊ शकते. सलीम अली सरोवर लेजर शो, फूड प्लाझा, तसेच नौकाविहार सुरू केला, तर पर्यटक येथे मुक्काम करू शकतात. पूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलियातूनही पर्यटक शहरात येत असत. मात्र, त्यांची संख्या आता नगण्य राहिली आहे. मागील चार महिने तर हॉटेल उद्योगाला खूप कठीण गेले. -गुरुप्रीतसिंग बग्गा, हॉटेल व्यावसायिक

एअर कनेक्टिव्हिटी वाढली, तरच पर्यटन उद्योग बहरेल एअर कनेक्टिव्हिटी वाढली, तरच येथील पर्यटन उद्योग बहरेल. यासाठी टूर आॅपरेटर, उद्योजक व व्यावसायिकांनी मुंबई, दिल्ली, औरंगाबाद विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यास विमान कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या दिल्ली आणि मुंबई विमानतळाकडून स्लॉट (विमान उड्डाणासाठी वेळ) मिळत नाही. मात्र, नवीन पर्यटन हंगाम सप्टेंबर महिन्यात सुरू होतो. त्याआधी विमानसेवा सुरू करण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्नशील आहोत. -जसवंतसिंह राजपूत, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलमपेंट फोरम

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ