शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

बसस्थानकांमध्ये ठणठणाट !

By admin | Updated: March 2, 2015 00:54 IST

सोमनाथ खताळ , बीड जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये पाण्याची सुविधाच नाही. पाणपोया फक्त नावालाच उरल्या आहेत. विकतचे पाणी घेऊन पिण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे

सोमनाथ खताळ , बीडजिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये पाण्याची सुविधाच नाही. पाणपोया फक्त नावालाच उरल्या आहेत. विकतचे पाणी घेऊन पिण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. ऐन उन्हाळ्यात ही स्थिती असल्याने प्रवाशांत नाराजीचा सूर आहे.सध्या उन्हाळ्याच्या तिव्र झळा जाणवू लागल्या आहेत. या झळांनी अंगाची लाहीलाही होत असून नागरिक घामाघूम होत आहेत. अशा उन्हाच्या लाहित प्रत्येकाला तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र ही तहान आता विकतच्या पाण्यावर भागविण्याचे वेळ प्रवाशांवर आली आहे. जिल्ह्यातील कुठल्याच बसस्थानकात प्रवाशांसाठी मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना परिसरातील हॉटेल किंवा विकतचे पाणी घेऊन पिण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्याची सोय नाही. उन्हाळ्याची स्थिती असतानाही महामंडळाला गांभीर्य नसल्याचा आरोप जनाधार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनुप मंत्री यांनी केला आहे. या अशुद्ध पाण्यामुळे अथवा पाणी पाणी करून एखाद्या प्रवाशाबाबत काही दुुर्दैवी घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार वरीष्ठ अधिकारीच राहतील. स्थानकातील पाणी प्रश्न मार्गी नाही लावला तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही मंत्री यांनी दिला आहे. जिल्ह्यात आठ आगार आणि आठ मोठे बसस्थानके आहेत. तर आठ ते नऊ ठिकाणी मिनी बसस्टँड आहेत. प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. या सोयी सुविधांसाठी लाखो रूपयांचा निधी येतो. मात्र हा निधी सुविधांसाठी खर्च न करता महामंडळातील अधिकारी संगणमताने वाटून घेत असल्याचा अरोप जनाधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप मंत्री यांनी केला आहे.याबाबत विभागीय नियंत्रक पी. बी. नाईक व विभागीय वाहतूक अधिकारी जी. एम. जगतकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते ‘नॉट रिचेबल’ होते.