शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

बसस्थानकांमध्ये ठणठणाट !

By admin | Updated: March 2, 2015 00:54 IST

सोमनाथ खताळ , बीड जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये पाण्याची सुविधाच नाही. पाणपोया फक्त नावालाच उरल्या आहेत. विकतचे पाणी घेऊन पिण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे

सोमनाथ खताळ , बीडजिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये पाण्याची सुविधाच नाही. पाणपोया फक्त नावालाच उरल्या आहेत. विकतचे पाणी घेऊन पिण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. ऐन उन्हाळ्यात ही स्थिती असल्याने प्रवाशांत नाराजीचा सूर आहे.सध्या उन्हाळ्याच्या तिव्र झळा जाणवू लागल्या आहेत. या झळांनी अंगाची लाहीलाही होत असून नागरिक घामाघूम होत आहेत. अशा उन्हाच्या लाहित प्रत्येकाला तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र ही तहान आता विकतच्या पाण्यावर भागविण्याचे वेळ प्रवाशांवर आली आहे. जिल्ह्यातील कुठल्याच बसस्थानकात प्रवाशांसाठी मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना परिसरातील हॉटेल किंवा विकतचे पाणी घेऊन पिण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्याची सोय नाही. उन्हाळ्याची स्थिती असतानाही महामंडळाला गांभीर्य नसल्याचा आरोप जनाधार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनुप मंत्री यांनी केला आहे. या अशुद्ध पाण्यामुळे अथवा पाणी पाणी करून एखाद्या प्रवाशाबाबत काही दुुर्दैवी घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार वरीष्ठ अधिकारीच राहतील. स्थानकातील पाणी प्रश्न मार्गी नाही लावला तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही मंत्री यांनी दिला आहे. जिल्ह्यात आठ आगार आणि आठ मोठे बसस्थानके आहेत. तर आठ ते नऊ ठिकाणी मिनी बसस्टँड आहेत. प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. या सोयी सुविधांसाठी लाखो रूपयांचा निधी येतो. मात्र हा निधी सुविधांसाठी खर्च न करता महामंडळातील अधिकारी संगणमताने वाटून घेत असल्याचा अरोप जनाधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप मंत्री यांनी केला आहे.याबाबत विभागीय नियंत्रक पी. बी. नाईक व विभागीय वाहतूक अधिकारी जी. एम. जगतकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते ‘नॉट रिचेबल’ होते.