शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

एका जागेवर उभ्या बस गाड्या भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:02 IST

जाण्यापासून रोखण्याची रोज कसरत निर्बंधांचा परिणाम : कचरा अन् धुळीने भरल्या एसटी बस, चालू करून ठेवण्याची वेळ संतोष हिरेमठ ...

जाण्यापासून रोखण्याची रोज कसरत

निर्बंधांचा परिणाम : कचरा अन् धुळीने भरल्या एसटी बस, चालू करून ठेवण्याची वेळ

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावामुळे एसटी बस गाड्यांचा चक्का जाम आहे. एसटी महामंडळाच्या आगारांत बस अनेक दिवसांपासून जागेवर रांगेत उभ्या आहेत. त्यामुळे उभ्या बस भंगारात जाण्यापासून रोखण्याची कसरत एसटी कर्मचारी आणि कारागिरांना करावी लागत आहे.

मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या बसगाड्यांची पाहणी करण्यात आली. तेव्हा काही बसमध्ये अस्वच्छता, धुळीचे साचलेली पुटे मिळाली, तर काही कर्मचारी बसची स्वच्छता करण्याच्या कामात गुंतले होते. उभ्या बस काही वेळेसाठी चालू करून ठेवण्याची जबाबदारीही कर्मचाऱ्यांना पार पाडावी लागते. असे केले नाही तर ऐन प्रवासाच्या वेळी बस ‘हात’ देण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण उभ्या बसवर नेमका काय परिणाम झाला, हे जेव्हा बस धावेल, तेव्हाच लक्षात येईल, असेही सांगण्यात आले.

जिल्ह्यातील आगार-८

एकूण बस संख्या-५५०

------

फाटलेले सीट

मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या एका बसमध्ये काही सिटांचे कव्हर फाटलेले दिसले. या बसमध्ये सिटाखालील प्लास्टिमुळे मोठ्या प्रमाणात धूळ जमा झाली होती. त्यामुळे कारागिरांकडून प्रत्येक सीटमधील प्लास्टिक काढण्याचे काम करण्यात येत होते.

तुटलेले आरसे

आगारात उभ्या शिवनेरी बसचे दोन्ही आरसे तुटले होते. चिकट टेपने आरशाला आधार दिला होता. या आरशांतून चालकाला पाठीमागील भाग पाहण्यासाठी कसरत करावी लागत असणार. बसचा दरवाजाही अर्धवट अवस्थेत बंद होता.

ऑइल गळती

आगारात उभ्या एका साध्या बसच्या (लाल बस) डाव्या बाजूकडील दोन्ही चाकांतून ऑइल गळत होते. बसच्या समोरील जाळीला दोरी बांधण्यात आली होती. इंडिकेटरला लोखंडी पट्टीचा आधार दिला होता. आतमध्ये प्रथमोपचार पेटी उघड्या अवस्थेत पडून होती.

-----

१४ महिन्यांत फक्त ५ महिने रस्त्यावर

- एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील एसटी कोरोनात गेल्या १४ महिन्यांत केवळ ५ महिने पूर्ण क्षमतेने रस्त्यावर आहे. गतवर्षी लाॅकडाऊन लागले आणि बस आगारातच उभ्या राहिल्या. त्यानंतर ऑक्टोबर ते मार्चपर्यंत सेवा सुरळीत सुरू होती.

-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर सुरू केल्यानंतर एप्रिलपासून पुन्हा एसटीचा चक्का पुन्हा जाम झाला. गेल्या दीड महिन्यापासून अत्यावश्यक सेवेसाठी, मालवाहतुकीसाठी एसटी, एसटी मालट्रक धावत आहे.

-----

उभ्या बसवर खर्चाची वेळ

-आगारात बस उभ्या राहिल्याने अनेक बसची अवस्था वाईट होत आहे. त्यामुळे बसची नियमित तपासणी, स्वच्छता केली जात आहे. यातून देखभाल-दुरुस्तीपोटी उभ्या बसवरही खर्च होत आहे.

- अनेक दिवस बस उभ्या राहिल्या तर बॅटरी उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे बस दोन ते तीन दिवसाला चालू केल्या जातात. जागेवर उभ्या राहिल्याने धुळीने भरून जातात. त्यामुळे स्वच्छतेचे कामही करावे लागत आहे.

-------

आधीच दुष्काळ....

बससेवा ठप्प राहिल्याने एसटीच्या औरंगाबाद विभागाला दिवसाला जवळपास ५० लाख रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत बस जागेवरच उभ्या राहून खराब झाल्या तर दुष्काळात तेरावा महिना, अशी स्थिती होईल. त्यामुळे जागेवर उभ्या बसकडेही अधिक लक्ष दिले जात आहे.

-----

बसचे नुकसान नाही

बस जागेवरच उभ्या राहिल्याने काही नुकसान होत नाही. लोखंडी बाॅडी असेल तर गंजते; पण एसटी बसची बाॅडी ही लोखंडी नसते. त्यामुळे तोही प्रश्न नाही. बसगाड्यांची नियमित देखभाल दुरुस्ती केली जाते. स्वच्छता केली जाते. बस सुरू केल्या जातात. त्यामुळे काही अडचण नाही.

- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

---------

फोटो ओळ

१)मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या बस.

२)फाटलेले सीट

३)तुटलेले आरसे

४)चाकातून ऑइल गळती