शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

कॉपी बहाद्दरांविरुद्ध कारवाईचा दणका

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

औरंगाबाद : पदवी परीक्षेत आतापर्यंत ५० ते ६० कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि सह केंद्रप्रमुखांची नजर आहे

औरंगाबाद : पदवी परीक्षेत आतापर्यंत ५० ते ६० कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि सह केंद्रप्रमुखांची नजर आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली.विद्यापीठामार्फत २९ आॅक्टोबरपासून पदवी परीक्षेला प्रारंभ झाला. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील २३० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली असून या सर्व केंद्रांसाठी विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून सह केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, २० ते २५ सह केंद्रप्रमुख नियुक्त केलेल्या परीक्षा केंद्रांवर गेलेच नाहीत. यासंदर्भात विद्यापीठाने चौकशी केली असता काही जणांना नियुक्तीचे आदेश पोहोचले नाहीत, तर काहींना प्राचार्यांनी परीक्षेच्या कामासाठी कार्यमुक्त केले नाही. परीक्षेच्या कामासाठी सहकार्य न करणाऱ्या प्राचार्यांविरुद्ध विद्यापीठामार्फत कारवाई केली जाणार आहे. जेथे सह केंद्रप्रमुख पोहोचू शकले नाहीत, त्या केंद्रांवर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे. परीक्षेच्या या चार दिवसांच्या कालावधीत गंगापूर, जालना, गेवराई, बीड या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉपी करताना सह केंद्रप्रमुख, भरारी पथकांतील सदस्य आणि काही ठिकाणी प्राचार्यांनी पकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सर्वच केंद्रांवर कॉपीमुक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाची सर्व यंत्रणा अलर्ट असून जो विद्यार्थी कॉपी करताना पकडला जाईल, त्याचा संपूर्ण वर्षाचा ‘परफॉर्मन्स’ रद्द करण्याच्या निर्णयावर विद्यापीठ प्रशासन ठाम आहे. दरम्यान, १०- १५ केंद्रे वगळली, तर उर्वरित सर्वच केंद्रांवर परीक्षा सुरळीत असल्याचे डॉ. गायकवाड म्हणाले. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये कॉपीमुक्ती परीक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे हे सर्व प्राचार्य आणि विद्यार्थ्यांना उद्या पत्र लिहिणार आहेत.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉपीमुक्ती अभियान महत्त्वाचे आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांशिवाय प्राचार्य आणि शिक्षकांची भूमिका कशी महत्त्वाची आहे, याचा उलगडा कुलगुरू हे त्या पत्राद्वारे करणार आहेत.