शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

कॉपी बहाद्दरांविरुद्ध कारवाईचा दणका

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

औरंगाबाद : पदवी परीक्षेत आतापर्यंत ५० ते ६० कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि सह केंद्रप्रमुखांची नजर आहे

औरंगाबाद : पदवी परीक्षेत आतापर्यंत ५० ते ६० कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि सह केंद्रप्रमुखांची नजर आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली.विद्यापीठामार्फत २९ आॅक्टोबरपासून पदवी परीक्षेला प्रारंभ झाला. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील २३० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली असून या सर्व केंद्रांसाठी विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून सह केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, २० ते २५ सह केंद्रप्रमुख नियुक्त केलेल्या परीक्षा केंद्रांवर गेलेच नाहीत. यासंदर्भात विद्यापीठाने चौकशी केली असता काही जणांना नियुक्तीचे आदेश पोहोचले नाहीत, तर काहींना प्राचार्यांनी परीक्षेच्या कामासाठी कार्यमुक्त केले नाही. परीक्षेच्या कामासाठी सहकार्य न करणाऱ्या प्राचार्यांविरुद्ध विद्यापीठामार्फत कारवाई केली जाणार आहे. जेथे सह केंद्रप्रमुख पोहोचू शकले नाहीत, त्या केंद्रांवर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे. परीक्षेच्या या चार दिवसांच्या कालावधीत गंगापूर, जालना, गेवराई, बीड या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉपी करताना सह केंद्रप्रमुख, भरारी पथकांतील सदस्य आणि काही ठिकाणी प्राचार्यांनी पकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सर्वच केंद्रांवर कॉपीमुक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाची सर्व यंत्रणा अलर्ट असून जो विद्यार्थी कॉपी करताना पकडला जाईल, त्याचा संपूर्ण वर्षाचा ‘परफॉर्मन्स’ रद्द करण्याच्या निर्णयावर विद्यापीठ प्रशासन ठाम आहे. दरम्यान, १०- १५ केंद्रे वगळली, तर उर्वरित सर्वच केंद्रांवर परीक्षा सुरळीत असल्याचे डॉ. गायकवाड म्हणाले. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये कॉपीमुक्ती परीक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे हे सर्व प्राचार्य आणि विद्यार्थ्यांना उद्या पत्र लिहिणार आहेत.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉपीमुक्ती अभियान महत्त्वाचे आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांशिवाय प्राचार्य आणि शिक्षकांची भूमिका कशी महत्त्वाची आहे, याचा उलगडा कुलगुरू हे त्या पत्राद्वारे करणार आहेत.