शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

उत्कर्ष अन् संरक्षणाचे बांधले २५0 रेशीमबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST

महावीर भवनात आयोजित सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यात २५० बहिणींनी आपल्या भावाला राखी बांधून भावाच्या उत्कर्षाची मंगल कामना व्यक्त करीत आपल्या संरक्षणाची हमीही घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आयुष्यात माझ्याकडून तुझ्याबद्दल कटू शब्द निघाले असतील, तर मला माफ कर,’ असे म्हणत बहिणीने आपल्या भाऊरायाला राखी बांधली. ‘कितीही संकट आले तरी तुझ्या पाठीशी खंबीरपणे मी उभा राहीन व आयुष्यभर तुझे संरक्षण करीन,’ असे वचन भावाने आपल्या लाडक्या बहिणीस दिले. आनंदाने बहिणीने भावाला मिठाई भरविली. हा प्रसंग होता महावीर भवनात आयोजित सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यातील. या सोहळ्यात २५० बहिणींनी आपल्या भावाला राखी बांधून भावाच्या उत्कर्षाची मंगल कामना व्यक्त करीत आपल्या संरक्षणाची हमीही घेतली.वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे रविवारी हा सामूहिक स्नेहसोहळा पार पडला. धर्मपीठावर विवेकमुनीजी म.सा. आदिठाणा ५ यांची उपस्थिती होती. प्रारंभी, जास्तीत जास्त तपआराधना करण्याचा संकल्प करणाºया महिलांनी संकल्परूपी राखी विवेकमुनीजी म.सा., गौरवमुनीजी म.सा., संभवमुनीजी म.सा., सौरभमुनीजी म.सा., प्रणवमुनीजी म.सा. यांना दिली. यानंतर ५ ते ४० वर्षांपर्यंतच्या २५० भाऊरायांना चार रांगांत बसविले. त्यांच्या समोर बहिणी बसल्या. प्रथम या बहिणींनी भाऊरायांना टिळा लावला व मनगटावर राखी बांधली. भाऊरायांनी बहिणींना भेटवस्तू दिली. बहिणींनी मिठाईने भावाचे तोंड गोड केले.प्रारंभी, गौरवमुनीजी म.सा. यांनी एका भाऊ-बहिणीची कथा सांगितली. या कथेने भाविक भारावले.यानिमित्त थाळी सजावट स्पर्धाही घेण्यात आली. धार्मिक सोहळा यशस्वीतेसाठी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व गुरुमिश्री युवा मंडळ व प्रभा कन्या मंडळाच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ताराचंद बाफना यांनी केले, तर अध्यक्ष प्रकाश बाफना यांनी आभार मानले.