शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बजेटचा बट्ट्याबोळ !

By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या वर्ष २०१४-१५ च्या बजेटचा बट्ट्याबोळ होण्यास सुरुवात झाली आहे. ७९० कोटींच्या बजेटपैकी १९५ कोटी रुपये प्रशासनाचे आठ महिन्यांतील उत्पन्न आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या वर्ष २०१४-१५ च्या बजेटचा बट्ट्याबोळ होण्यास सुरुवात झाली आहे. ७९० कोटींच्या बजेटपैकी १९५ कोटी रुपये प्रशासनाचे आठ महिन्यांतील उत्पन्न आहे. पाच महिन्यांत बजेटचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असे चित्र स्पष्ट झाले आहे. ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी अवस्था पालिकेची झालेली आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बजेट, उत्पन्न, करवसुली, खर्च आणि विकासकामांवरून झालेल्या चर्चेअंती सगळेच सत्य बाहेर आले. मनपाच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना विकासकामे ठप्प असल्यामुळे नगरसेवकांनी मोठा धसका घेतला आहे. कामे झाली नाही तर मतदारांना काय उत्तरे द्यायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत नगरसेवकांनी कधी नव्हे इतक्या पोटतिडकी आणि आक्रमकतेने लेखा विभागाचे नियोजन आणि वसुलीचा आढावा घेतला. ४मालमत्ता करवसुलीतून १३० कोटी रुपयांचे उत्पन्न मनपाने गृहीत धरले आहे. २३ टक्के वसुली मनपाने केली आहे. अ प्रभागातून ६, ब मधून ७, क मधून १ कोटी ९९ लाख, तर ड मधून ७ कोटी, ई मधून ७५ लाख, तर फ मधून ९ कोटींचा पालिकेने कर वसूल केल्याचे अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले. यामध्ये ५ कोटी पाणीपट्टीचे आहेत. वेतनाइतकी रक्कमदेखील करवसुलीतून विभागाने संकलित केली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. ४प्रभाग अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून बैठकीत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी याप्रकरणी खुलासा करताना इतर मनपाचे अनुभव सांगितले. प्रभाग अधिकाऱ्यांनी बैठकीला यावे यात दुमत नाही; परंतु सर्वांनी उपस्थित राहावे अशा सूचना विभागांच्या नसतात.४ वॉर्ड समिती आणि विषय समितीच्या नियमित बैठका झाल्या, तर नगरसेवकांचे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. त्यांच्या या खुलाशावरून नगरसेवक संतापले. अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न अतिरिक्त आयुक्तांनी करू नये, असे नगरसेवक तुपे म्हणाले.