शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

बजेटचा बट्ट्याबोळ !

By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या वर्ष २०१४-१५ च्या बजेटचा बट्ट्याबोळ होण्यास सुरुवात झाली आहे. ७९० कोटींच्या बजेटपैकी १९५ कोटी रुपये प्रशासनाचे आठ महिन्यांतील उत्पन्न आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या वर्ष २०१४-१५ च्या बजेटचा बट्ट्याबोळ होण्यास सुरुवात झाली आहे. ७९० कोटींच्या बजेटपैकी १९५ कोटी रुपये प्रशासनाचे आठ महिन्यांतील उत्पन्न आहे. पाच महिन्यांत बजेटचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असे चित्र स्पष्ट झाले आहे. ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी अवस्था पालिकेची झालेली आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बजेट, उत्पन्न, करवसुली, खर्च आणि विकासकामांवरून झालेल्या चर्चेअंती सगळेच सत्य बाहेर आले. मनपाच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना विकासकामे ठप्प असल्यामुळे नगरसेवकांनी मोठा धसका घेतला आहे. कामे झाली नाही तर मतदारांना काय उत्तरे द्यायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत नगरसेवकांनी कधी नव्हे इतक्या पोटतिडकी आणि आक्रमकतेने लेखा विभागाचे नियोजन आणि वसुलीचा आढावा घेतला. ४मालमत्ता करवसुलीतून १३० कोटी रुपयांचे उत्पन्न मनपाने गृहीत धरले आहे. २३ टक्के वसुली मनपाने केली आहे. अ प्रभागातून ६, ब मधून ७, क मधून १ कोटी ९९ लाख, तर ड मधून ७ कोटी, ई मधून ७५ लाख, तर फ मधून ९ कोटींचा पालिकेने कर वसूल केल्याचे अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले. यामध्ये ५ कोटी पाणीपट्टीचे आहेत. वेतनाइतकी रक्कमदेखील करवसुलीतून विभागाने संकलित केली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. ४प्रभाग अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून बैठकीत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी याप्रकरणी खुलासा करताना इतर मनपाचे अनुभव सांगितले. प्रभाग अधिकाऱ्यांनी बैठकीला यावे यात दुमत नाही; परंतु सर्वांनी उपस्थित राहावे अशा सूचना विभागांच्या नसतात.४ वॉर्ड समिती आणि विषय समितीच्या नियमित बैठका झाल्या, तर नगरसेवकांचे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. त्यांच्या या खुलाशावरून नगरसेवक संतापले. अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न अतिरिक्त आयुक्तांनी करू नये, असे नगरसेवक तुपे म्हणाले.