शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ... काम मिळेल का काम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:16 IST

दरवर्षी दहा हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजूर कापूस वेचण्यासाठी वैजापूर तालुक्यात येतात; मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशीचे पीक बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाले. यंदाचा हंगाम हातचा गेल्याने हताश झालेले परप्रांतीय मजूर आता पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गृहलक्ष्मीला सोबत घेऊन कामाच्या शोधात चक्क वणवण भटकताना दिसत आहेत.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : दरवर्षी दहा हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजूर कापूस वेचण्यासाठी वैजापूर तालुक्यात येतात; मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशीचे पीक बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाले. यंदाचा हंगाम हातचा गेल्याने हताश झालेले परप्रांतीय मजूर आता पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गृहलक्ष्मीला सोबत घेऊन कामाच्या शोधात चक्क वणवण भटकताना दिसत आहेत. ते ‘भाऊ...काही काम आहे का काम’ अशी रस्त्यावर विचारणा करत असल्याचे विदारक तालुक्यात दिसत आहे.तालुक्यात दहा महसूल मंडळांतर्गत ७६ हजार हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणाºया शेतकºयांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला. यामध्ये कापूस वेचणीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधून आलेल्या जवळपास दहा हजार परप्रांतीय मजुरांनाही मोठा फटका बसला आहे. तालुक्यात कापसाचे पीक जोमात आले. मात्र, माप पदरात पडण्याआधीच बोंडअळीने खेळ केला. त्यामुळे परप्रांतीय मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. शेतात कामच नसल्याने हे मजूर शहरातील कॉलेज रोड, हायवे चौफुली, स्टेशन रोडवर दररोज सकाळी येऊन थांबतात. मजुरांना कामाला लावण्यासाठी एखादा व्यक्ती येथे आल्यास शेकडो मजूर त्याच्याभोवती गराडा घालतात.भाऊ, कोणतेही काम सांगा, आम्ही करतो. काय बी असू द्या आम्ही दोघे, तिघे, चौघेजण मिळून करतो, अशी विनवणी केली जाते. परंतु त्या व्यक्तीला एक किंवा दोनच मजूर पाहिजे असतात. दोन मजुरांना घेऊन गेल्यानंतर बाकीचे मजूर नाराज होऊन दुसºया व्यक्तीची वाट पाहतात.तालुक्यात मागील काही वर्षांपासून शेतीकामासाठी मजूर पुरवणारे ठेकेदार कार्यरत झाले आहेत. यात गुजरात आणि मध्यप्रदेशातील मजुरांचा सर्वाधिक भरणा आहे. प्रतिएकर दर ठरवून काम करण्याची त्यांची पद्धत आहे. कमी कालावधी व वाजवी मजुरीत काम उरकण्यावर परप्रांतीयांचा भर असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.कांद्याची लागवड, गव्हाला पाणी देणे, ऊस लागवड आणि कापूस वेचणीचे काम परप्रांतीय मजूर करीत असतात. ३० ते ५० मजुरांची टोळी पन्नास ते साठ गावात शेतकºयांकडे विभागून काम करतात. सध्या परप्रांतीयांच्या या बाजारात महिन्यापासून गर्दी वाढली आहे.वैजापूर तालुक्यात दरवर्षी कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, यंदा बोंडअळीचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकºयांना सोसावा लागत आहे. यंदा सुमारे सत्तर टक्के उत्पादन घटले आहे. त्यामुळे तालुक्याला दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा फटका बसल्याचे तालुका कृषी अधिकारी विष्णू मोरे यांनी सांगितले.