शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

भाऊ... काम मिळेल का काम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:16 IST

दरवर्षी दहा हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजूर कापूस वेचण्यासाठी वैजापूर तालुक्यात येतात; मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशीचे पीक बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाले. यंदाचा हंगाम हातचा गेल्याने हताश झालेले परप्रांतीय मजूर आता पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गृहलक्ष्मीला सोबत घेऊन कामाच्या शोधात चक्क वणवण भटकताना दिसत आहेत.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : दरवर्षी दहा हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजूर कापूस वेचण्यासाठी वैजापूर तालुक्यात येतात; मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशीचे पीक बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाले. यंदाचा हंगाम हातचा गेल्याने हताश झालेले परप्रांतीय मजूर आता पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गृहलक्ष्मीला सोबत घेऊन कामाच्या शोधात चक्क वणवण भटकताना दिसत आहेत. ते ‘भाऊ...काही काम आहे का काम’ अशी रस्त्यावर विचारणा करत असल्याचे विदारक तालुक्यात दिसत आहे.तालुक्यात दहा महसूल मंडळांतर्गत ७६ हजार हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणाºया शेतकºयांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला. यामध्ये कापूस वेचणीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधून आलेल्या जवळपास दहा हजार परप्रांतीय मजुरांनाही मोठा फटका बसला आहे. तालुक्यात कापसाचे पीक जोमात आले. मात्र, माप पदरात पडण्याआधीच बोंडअळीने खेळ केला. त्यामुळे परप्रांतीय मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. शेतात कामच नसल्याने हे मजूर शहरातील कॉलेज रोड, हायवे चौफुली, स्टेशन रोडवर दररोज सकाळी येऊन थांबतात. मजुरांना कामाला लावण्यासाठी एखादा व्यक्ती येथे आल्यास शेकडो मजूर त्याच्याभोवती गराडा घालतात.भाऊ, कोणतेही काम सांगा, आम्ही करतो. काय बी असू द्या आम्ही दोघे, तिघे, चौघेजण मिळून करतो, अशी विनवणी केली जाते. परंतु त्या व्यक्तीला एक किंवा दोनच मजूर पाहिजे असतात. दोन मजुरांना घेऊन गेल्यानंतर बाकीचे मजूर नाराज होऊन दुसºया व्यक्तीची वाट पाहतात.तालुक्यात मागील काही वर्षांपासून शेतीकामासाठी मजूर पुरवणारे ठेकेदार कार्यरत झाले आहेत. यात गुजरात आणि मध्यप्रदेशातील मजुरांचा सर्वाधिक भरणा आहे. प्रतिएकर दर ठरवून काम करण्याची त्यांची पद्धत आहे. कमी कालावधी व वाजवी मजुरीत काम उरकण्यावर परप्रांतीयांचा भर असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.कांद्याची लागवड, गव्हाला पाणी देणे, ऊस लागवड आणि कापूस वेचणीचे काम परप्रांतीय मजूर करीत असतात. ३० ते ५० मजुरांची टोळी पन्नास ते साठ गावात शेतकºयांकडे विभागून काम करतात. सध्या परप्रांतीयांच्या या बाजारात महिन्यापासून गर्दी वाढली आहे.वैजापूर तालुक्यात दरवर्षी कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, यंदा बोंडअळीचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकºयांना सोसावा लागत आहे. यंदा सुमारे सत्तर टक्के उत्पादन घटले आहे. त्यामुळे तालुक्याला दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा फटका बसल्याचे तालुका कृषी अधिकारी विष्णू मोरे यांनी सांगितले.