शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

भाऊ... काम मिळेल का काम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:16 IST

दरवर्षी दहा हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजूर कापूस वेचण्यासाठी वैजापूर तालुक्यात येतात; मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशीचे पीक बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाले. यंदाचा हंगाम हातचा गेल्याने हताश झालेले परप्रांतीय मजूर आता पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गृहलक्ष्मीला सोबत घेऊन कामाच्या शोधात चक्क वणवण भटकताना दिसत आहेत.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : दरवर्षी दहा हजारांपेक्षा अधिक परप्रांतीय मजूर कापूस वेचण्यासाठी वैजापूर तालुक्यात येतात; मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशीचे पीक बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाले. यंदाचा हंगाम हातचा गेल्याने हताश झालेले परप्रांतीय मजूर आता पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गृहलक्ष्मीला सोबत घेऊन कामाच्या शोधात चक्क वणवण भटकताना दिसत आहेत. ते ‘भाऊ...काही काम आहे का काम’ अशी रस्त्यावर विचारणा करत असल्याचे विदारक तालुक्यात दिसत आहे.तालुक्यात दहा महसूल मंडळांतर्गत ७६ हजार हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणाºया शेतकºयांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला. यामध्ये कापूस वेचणीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधून आलेल्या जवळपास दहा हजार परप्रांतीय मजुरांनाही मोठा फटका बसला आहे. तालुक्यात कापसाचे पीक जोमात आले. मात्र, माप पदरात पडण्याआधीच बोंडअळीने खेळ केला. त्यामुळे परप्रांतीय मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. शेतात कामच नसल्याने हे मजूर शहरातील कॉलेज रोड, हायवे चौफुली, स्टेशन रोडवर दररोज सकाळी येऊन थांबतात. मजुरांना कामाला लावण्यासाठी एखादा व्यक्ती येथे आल्यास शेकडो मजूर त्याच्याभोवती गराडा घालतात.भाऊ, कोणतेही काम सांगा, आम्ही करतो. काय बी असू द्या आम्ही दोघे, तिघे, चौघेजण मिळून करतो, अशी विनवणी केली जाते. परंतु त्या व्यक्तीला एक किंवा दोनच मजूर पाहिजे असतात. दोन मजुरांना घेऊन गेल्यानंतर बाकीचे मजूर नाराज होऊन दुसºया व्यक्तीची वाट पाहतात.तालुक्यात मागील काही वर्षांपासून शेतीकामासाठी मजूर पुरवणारे ठेकेदार कार्यरत झाले आहेत. यात गुजरात आणि मध्यप्रदेशातील मजुरांचा सर्वाधिक भरणा आहे. प्रतिएकर दर ठरवून काम करण्याची त्यांची पद्धत आहे. कमी कालावधी व वाजवी मजुरीत काम उरकण्यावर परप्रांतीयांचा भर असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.कांद्याची लागवड, गव्हाला पाणी देणे, ऊस लागवड आणि कापूस वेचणीचे काम परप्रांतीय मजूर करीत असतात. ३० ते ५० मजुरांची टोळी पन्नास ते साठ गावात शेतकºयांकडे विभागून काम करतात. सध्या परप्रांतीयांच्या या बाजारात महिन्यापासून गर्दी वाढली आहे.वैजापूर तालुक्यात दरवर्षी कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, यंदा बोंडअळीचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकºयांना सोसावा लागत आहे. यंदा सुमारे सत्तर टक्के उत्पादन घटले आहे. त्यामुळे तालुक्याला दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा फटका बसल्याचे तालुका कृषी अधिकारी विष्णू मोरे यांनी सांगितले.