शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

आलमल्याच्या तावरजा नदीवरील पुलाला गेले तडे

By admin | Updated: March 25, 2017 23:11 IST

आलमला औसा तालुक्यातील आलमला येथील तावरजा नदीला सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे पुलालगतचा अर्धा रस्ता वाहून गेल्याने रोडवर भला मोठा खड््डा पडला आहे़

जयपाल ठाकूर आलमलाऔसा तालुक्यातील आलमला येथील तावरजा नदीला सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे पुलालगतचा अर्धा रस्ता वाहून गेल्याने रोडवर भला मोठा खड््डा पडला आहे़ शिवाय, आलमला ते तांडा वस्तीत जाणाऱ्या १७ कमानी पुलाला तडे गेल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे़ रस्ता वाहून गेल्यानंतर प्रशासनाने याची साधी पाहणीही केली नाही़ सहा महिने लोटले तरी रस्त्याची अवस्था जैसे थे आहे़ सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तावरजा नदीला पूर आला़ पुराचे पाणी नदीपात्राच्या बाहेर गेल्याने आलमला-आलमला तांडा रोडवरील पुलाच्या दोन्ही बाजूने रोड खचून अर्धा रस्ता वाहून गेला़ तावरजा नदीवर साधारणत: १६ वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाला मधोमध मोठा तडाही गेला आहे़ सध्या या पुलावरून वाहतूक करणाऱ्या शेतकरी, वाहनधारकांत भीतीचे वातावरण आहे़ अगोदरच सदरील पूल हा अत्यंत अरुंद आहे व त्यातच सदरील पुलाच्या जवळच मोठ्ठा खड्डा पडल्याने रात्रीच्या वेळी येणाऱ्या बहुतांश वाहनांचा अपघात ठरलेला आहे़ नवीन वाहनधारक तर या मार्गाने रात्री प्रवास करणे अशक्यच आहे़ शेतात जात असताना रात्री वेळी खड्ड्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत़