शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

‘बड्या’ संचिकांना बे्रक!

By admin | Updated: July 30, 2014 01:17 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा व ड्रेनेजच्या (वॉटर/गटार) ‘बड्या’ संचिकांना ब्रेक लावला आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा व ड्रेनेजच्या (वॉटर/गटार) ‘बड्या’ संचिकांना ब्रेक लावला आहे. समांतर जलवाहिनीची योजना आणि भूमिगत गटार योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या आणि ड्रेनेजलाईन टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रशासनने बहुतांश वॉर्डातील संचिका तुंबविल्या आहेत. विधानसभेनंतर मनपाच्या निवडणुका आहेत. त्यानंतर सहा महिन्यांनी मनपाच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहिता २० आॅगस्टपर्यंत लागण्याची शक्यता आहे.आॅक्टोबरपर्यंत आचारसंहिता राहील. त्यामुळे २० आॅगस्टपर्यंत जास्तीत कामांना मंजुरी मिळावी. या दिशेने नगरसेविका पालिका प्रशासनाकडे हेलपाटे मारीत असल्या तरी जलवाहिनी टाकण्याच्या आणि ड्रेनेजलाईनच्या मोठ्या खर्चाच्या संचिकांना प्रशासन मंजुरी देणे टाळत आहे. वर्ष २०१३-१४ च्या बजेटमध्ये मनपाने पाणीपुरवठा विभागासाठी ५१ कोटी रुपयांचा खर्च केला. अंदाजे १५ कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या. गतवर्षी ड्रेनेजलाईन व देखभाल दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांची तरतूद होती. भूमिगत गटारचे काम होणार असल्यामुळे या खर्चाला फाटा देण्यात आला आहे, तर समांतर जलवाहिनीचे काम होईल, अशी अपेक्षा असल्यामुळे नवीन जलवाहिन्यांची कामेही थांबविण्यात आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. या परिस्थितीत समांतर योजना कधी होणार, याचा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.आयुक्त म्हणाले...जी महत्त्वाची कामे आहेत व छोटी-छोटी कामे आहेत. त्यांना मंजुरी दिली जात आहे.भूमिगतचे काम लवकरच सुरू होईल. त्यामुळे वारंवार एकाच कामावर खर्च होऊ नये यासाठी विचार करून निर्णय घेतले जात आहेत, असे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी स्पष्ट केले. नगरसेवक म्हणतात...नगरसेवक कृष्णा बनकर म्हणाले की, माझ्या वॉर्डातील ड्रेनेजलाईनच्या संचिका थांबविण्यात आल्या आहेत. प्रशासनाला विचारले असता, भूमिगत गटार योजनेमुळे मोठी कामे थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.दुष्परिणाम असा... भूमिगतचे उद्घाटन जरी झाले तरी काम पूर्ण होण्यास ३ वर्षे लागतील. तोपर्यंत ड्रेनेजलाईन देखभाल दुरुस्तीवरच पालिका लक्ष देणार का? असा प्रश्न आहे. या सगळ्या कारभारामुळे मनपाचे इंजिनिअरिंग कोलमडेल. त्याचे दुष्परिणाम सध्याची यंत्रणा ठप्प होण्यावर होतील. समांतरचे काम सुरू होईल, अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे नागरिक लोकवर्गणीतून जलवाहिन्या टाकून घेत आहेत. गेल्या आठवड्यात गजानननगर भागामध्ये नागरिकांनी जलवाहिनी टाकून घेतली.