शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

‘बड्या’ संचिकांना बे्रक!

By admin | Updated: July 30, 2014 01:17 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा व ड्रेनेजच्या (वॉटर/गटार) ‘बड्या’ संचिकांना ब्रेक लावला आहे.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा व ड्रेनेजच्या (वॉटर/गटार) ‘बड्या’ संचिकांना ब्रेक लावला आहे. समांतर जलवाहिनीची योजना आणि भूमिगत गटार योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या आणि ड्रेनेजलाईन टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रशासनने बहुतांश वॉर्डातील संचिका तुंबविल्या आहेत. विधानसभेनंतर मनपाच्या निवडणुका आहेत. त्यानंतर सहा महिन्यांनी मनपाच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहिता २० आॅगस्टपर्यंत लागण्याची शक्यता आहे.आॅक्टोबरपर्यंत आचारसंहिता राहील. त्यामुळे २० आॅगस्टपर्यंत जास्तीत कामांना मंजुरी मिळावी. या दिशेने नगरसेविका पालिका प्रशासनाकडे हेलपाटे मारीत असल्या तरी जलवाहिनी टाकण्याच्या आणि ड्रेनेजलाईनच्या मोठ्या खर्चाच्या संचिकांना प्रशासन मंजुरी देणे टाळत आहे. वर्ष २०१३-१४ च्या बजेटमध्ये मनपाने पाणीपुरवठा विभागासाठी ५१ कोटी रुपयांचा खर्च केला. अंदाजे १५ कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या. गतवर्षी ड्रेनेजलाईन व देखभाल दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांची तरतूद होती. भूमिगत गटारचे काम होणार असल्यामुळे या खर्चाला फाटा देण्यात आला आहे, तर समांतर जलवाहिनीचे काम होईल, अशी अपेक्षा असल्यामुळे नवीन जलवाहिन्यांची कामेही थांबविण्यात आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. या परिस्थितीत समांतर योजना कधी होणार, याचा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.आयुक्त म्हणाले...जी महत्त्वाची कामे आहेत व छोटी-छोटी कामे आहेत. त्यांना मंजुरी दिली जात आहे.भूमिगतचे काम लवकरच सुरू होईल. त्यामुळे वारंवार एकाच कामावर खर्च होऊ नये यासाठी विचार करून निर्णय घेतले जात आहेत, असे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी स्पष्ट केले. नगरसेवक म्हणतात...नगरसेवक कृष्णा बनकर म्हणाले की, माझ्या वॉर्डातील ड्रेनेजलाईनच्या संचिका थांबविण्यात आल्या आहेत. प्रशासनाला विचारले असता, भूमिगत गटार योजनेमुळे मोठी कामे थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.दुष्परिणाम असा... भूमिगतचे उद्घाटन जरी झाले तरी काम पूर्ण होण्यास ३ वर्षे लागतील. तोपर्यंत ड्रेनेजलाईन देखभाल दुरुस्तीवरच पालिका लक्ष देणार का? असा प्रश्न आहे. या सगळ्या कारभारामुळे मनपाचे इंजिनिअरिंग कोलमडेल. त्याचे दुष्परिणाम सध्याची यंत्रणा ठप्प होण्यावर होतील. समांतरचे काम सुरू होईल, अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे नागरिक लोकवर्गणीतून जलवाहिन्या टाकून घेत आहेत. गेल्या आठवड्यात गजानननगर भागामध्ये नागरिकांनी जलवाहिनी टाकून घेतली.