शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

नाश्त्यात महागाईचा खडा; कांदे-पोहे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 15:04 IST

महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आवडता नाश्ता म्हणजे कांदे-पोहे. मात्र आता आपल्या पोह्यांच्या आवडीत महागाईचा खडा पडला आहे.

ठळक मुद्देयंदा धानचा तुटवडा असल्याने पोह्याचे दर किलोमागे ३ ते ५ रुपयांपर्यंत वाढले आहेत. 

औरंगाबाद : महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आवडता नाश्ता म्हणजे कांदे-पोहे. मात्र आता आपल्या पोह्यांच्या आवडीत महागाईचा खडा पडला आहे. यंदा धानचा तुटवडा असल्याने पोह्याचे दर किलोमागे ३ ते ५ रुपयांपर्यंत वाढले आहेत. 

इंधन दरवाढीचा फटका हळूहळू प्रत्येक वस्तूच्या दरवाढीतून नागरिकांना बसू लागला आहे. झटपट तयार होणाऱ्या नाश्त्यासाठी पोह्याला प्राधान्य मिळते. शहरात सकाळच्या वेळी अगदी १० रुपयांत प्लेटभर कांदा-पोहे मिळतात. शिक्षणासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांचा नाष्टाही अनेक वेळा कांदा-पोहे हाच असतो. हॉटेल, खानावळी, हातगाडीवाल्यांकडून पोह्याला मोठी मागणी असते. मागील महिन्यात शहरात १५० टन पोहे विक्री झाले. या महिन्यात व्यापाऱ्यांनी ५० टनाने मागणी वाढवून २०० टन पोहे मागविले आहेत. यात ८० टक्के कांदे-पोह्यांचा समावेश आहे.

यासंदर्भात पोह्यांचे होलसेल विक्रेते प्रकाश जैन यांनी सांगितले की, गुजरात, छत्तीसगढ, मध्यप्रदेशातून पोह्यांची आवक होत असते. मागील वर्षी धानचे उत्पादन घटल्याने याचा परिणाम पोह्यांच्या भाववाढीवर झाला आहे. पोह्यांचे दुसरे विक्रेते गणेश लड्डा म्हणाले की, पोह्यांचे भाव क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांनी वधारू न ३७०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहेत. तर किरकोळ विक्रीत ३ ते ५ रुपयांनी भाववाढ होऊन ४८ ते ५० रुपये किलोने पोहे विकले जात आहेत. 

टॅग्स :GovernmentसरकारPetrolपेट्रोलDieselडिझेल