शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नाश्त्यात महागाईचा खडा; कांदे-पोहे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 15:04 IST

महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आवडता नाश्ता म्हणजे कांदे-पोहे. मात्र आता आपल्या पोह्यांच्या आवडीत महागाईचा खडा पडला आहे.

ठळक मुद्देयंदा धानचा तुटवडा असल्याने पोह्याचे दर किलोमागे ३ ते ५ रुपयांपर्यंत वाढले आहेत. 

औरंगाबाद : महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आवडता नाश्ता म्हणजे कांदे-पोहे. मात्र आता आपल्या पोह्यांच्या आवडीत महागाईचा खडा पडला आहे. यंदा धानचा तुटवडा असल्याने पोह्याचे दर किलोमागे ३ ते ५ रुपयांपर्यंत वाढले आहेत. 

इंधन दरवाढीचा फटका हळूहळू प्रत्येक वस्तूच्या दरवाढीतून नागरिकांना बसू लागला आहे. झटपट तयार होणाऱ्या नाश्त्यासाठी पोह्याला प्राधान्य मिळते. शहरात सकाळच्या वेळी अगदी १० रुपयांत प्लेटभर कांदा-पोहे मिळतात. शिक्षणासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांचा नाष्टाही अनेक वेळा कांदा-पोहे हाच असतो. हॉटेल, खानावळी, हातगाडीवाल्यांकडून पोह्याला मोठी मागणी असते. मागील महिन्यात शहरात १५० टन पोहे विक्री झाले. या महिन्यात व्यापाऱ्यांनी ५० टनाने मागणी वाढवून २०० टन पोहे मागविले आहेत. यात ८० टक्के कांदे-पोह्यांचा समावेश आहे.

यासंदर्भात पोह्यांचे होलसेल विक्रेते प्रकाश जैन यांनी सांगितले की, गुजरात, छत्तीसगढ, मध्यप्रदेशातून पोह्यांची आवक होत असते. मागील वर्षी धानचे उत्पादन घटल्याने याचा परिणाम पोह्यांच्या भाववाढीवर झाला आहे. पोह्यांचे दुसरे विक्रेते गणेश लड्डा म्हणाले की, पोह्यांचे भाव क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांनी वधारू न ३७०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहेत. तर किरकोळ विक्रीत ३ ते ५ रुपयांनी भाववाढ होऊन ४८ ते ५० रुपये किलोने पोहे विकले जात आहेत. 

टॅग्स :GovernmentसरकारPetrolपेट्रोलDieselडिझेल