शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत पारंपरिक लढतीला ब्रेक

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

हिंगोली : मतदारसंघात युती व आघाडी तुटल्यामुळे पारंपरिक लढतच होईल, अशी शक्यता बळावली होती.

हिंगोली : मतदारसंघात युती व आघाडी तुटल्यामुळे पारंपरिक लढतच होईल, अशी शक्यता बळावली होती. मात्र पक्षांनी आपला बाणा कायम ठेवल्याने पारंपरिकतेच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक होत आहे. हिंगोलीत कॉंग्रेसचे उमेदवार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची उमेदवारी अंतिम असल्याने ते सर्वात अगोदर तयारीला लागले होते. आता प्रचार प्रारंभ करण्यात त्यांनी आघाडी घेतली. गावोगाव प्रचाराचा झंझावात सुरू केला. सुरुवातीपासूनच इतर एकाही पक्षाची उमेदवारी जाहीर होत नसल्याने संभ्रम वाढत गेला होता. ही जागा भाजपाच्या कोट्यात असतानाही भाजपाचे तान्हाजी मुटकुळे यांना शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीसाठी ताटकळत बसावे लागले. तर राकॉं व सेना यावेळी नव्यानेच विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण व शिवसेनेचे दिनकरराव देशमुख हे उमेदवार आहेत. दिलीप चव्हाण हे हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष तर देशमुख हे बाजार समितीचे माजी सभापती आहेत. याशिवाय माजी आ.बळीराम पाटील कोटकर यांनी आपला नातू ओम कोटकर यांना मनसेकडून रिंगणात उतरवले आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांतच हत्तीची टक्कर होत असताना इतरही अनेक जण लढायला उत्सुक आहेत. वाढलेल्या उमेदवारांमुळे आपल्या वैयक्तिक, समाज अथवा पक्षाच्या बळावर संधी मिळेल, अशी आशा बाळगून या इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली आहे.मागील पंधरा वर्षांत मोठ्या प्रमाणात केलेल्या विकास- कामांच्या बळावर आ. गोरेगावकर हे मते मागत आहेत. तर दिलीप चव्हाण यांनी आपल्या शहर विकास कामांची माहिती देत पक्ष संघटनेच्या बळावर मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. तान्हाजी मुटकुळे यांनी भावनिक साद घालून जि.प.तील आपल्या कार्यकाळाची आठवण करून देण्याचे काम सुरू केले आहे. दिनकरराव देशमुख यांनीही आपल्या जि.प.तील कामांशिवाय पक्षाच्या जोरावर मतदारांना साद घालण्याचे काम सुरू केले आहे. ओम कोटकर यांनी आपल्या आजोबांच्यार् काळातील कामांचा पाढा वाचणे सुरू केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)