शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

ऊस तोडू, पण मुलांना उच्च शिक्षण देऊ

By admin | Updated: June 16, 2016 00:15 IST

औरंगाबाद : आणखी दहा वर्षे कष्ट करू, ऊसतोड करू; परंतु मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू, असा निर्धार पैठण तालुक्यातील वरंवडी तांडा येथील नं. २ केंद्र, निलजगाव येथील पालकांनी केला.

औरंगाबाद : आणखी दहा वर्षे कष्ट करू, ऊसतोड करू; परंतु मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू, असा निर्धार पैठण तालुक्यातील वरंवडी तांडा येथील नं. २ केंद्र, निलजगाव येथील पाल्यांच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना केला. या शाळेतील विद्यार्थ्यांनीदेखील ‘ज्ञानरचनावाद’ आणि शाळेमुळे परिवर्तन होत असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगत पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करणार असल्याचे नमूद केले.आई-वडील ऊस तोडणीला गेल्यानंतरही चिमुकल्या हाताने स्वयंपाक बनविला, पण शाळा बुडविली नाही. खूप शिकून डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे आहे, असा निर्धार ऊसतोड कामगारांच्या मुलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोडपणे त्यांनी उत्तरे देऊन सर्वांना चकित केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागातर्फे शाळा प्रवेश, शाळा उत्सव कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, लातूर, नंदूरबार, धुळे, पुणे, ठाणे या सहा जिल्ह्यांतील आदिवासी, दुर्गम, तांड्यावरील शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे थेट संवाद साधला. दुपारी २ वाजता पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला सुरुवात झाली. मुले ऊसतोडीला गेली नाहीततांडा व परिसरातील एकही मूल यंदा ऊसतोडीला गेले नाही. आजी-आजोबाजवळ राहून चिमुकल्यांनी स्वत: स्वयंपाक करून शाळेत हजेरी लावली. कोमल राठोड या विद्यार्थिनीस मुख्यमंत्र्यांनी प्रश्न केला, तुला शाळेत काय आवडते? ती म्हणाली की, सौरऊर्जेवर ई-लर्निंगचे शिक्षण मिळते, शाळेत बँक सुरू केली, बाग फुलविली, खेळणी, फुले यामध्ये आमचा दिवस जातो. शिक्षक चांगले शिकवीत असून, ज्ञानरचनावाद उपक्रमातून खूप शिकायला मिळते. वैशाली राठोड म्हणाली की, माझे आई-वडील ऊसतोडीचे काम करतात. पंरतु मी त्यांच्यासोबत जात नाही. मला इंग्रजी विषय आवडतो. घरी स्वयंपाक करून भावांना घेऊन मी शाळेत येते. मलाही डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे आहे.पालक अण्णा राठोड म्हणाले की, शिक्षकांनी सांगितलेले आम्हाला पटले. मुलांना ऊसतोडीसाठी सोबत नेले नाही, त्यांना शाळेत टाकले, तांड्यावरील कोणीही शाळाबाह्य राहणार नाही, याची काळजी घेतली. हिरामण राठोड म्हणाले की, आणखी १० वर्षे आम्ही ऊसतोडी करू, पण मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू.