शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

ऊस तोडू, पण मुलांना उच्च शिक्षण देऊ

By admin | Updated: June 16, 2016 00:15 IST

औरंगाबाद : आणखी दहा वर्षे कष्ट करू, ऊसतोड करू; परंतु मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू, असा निर्धार पैठण तालुक्यातील वरंवडी तांडा येथील नं. २ केंद्र, निलजगाव येथील पालकांनी केला.

औरंगाबाद : आणखी दहा वर्षे कष्ट करू, ऊसतोड करू; परंतु मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू, असा निर्धार पैठण तालुक्यातील वरंवडी तांडा येथील नं. २ केंद्र, निलजगाव येथील पाल्यांच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना केला. या शाळेतील विद्यार्थ्यांनीदेखील ‘ज्ञानरचनावाद’ आणि शाळेमुळे परिवर्तन होत असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगत पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करणार असल्याचे नमूद केले.आई-वडील ऊस तोडणीला गेल्यानंतरही चिमुकल्या हाताने स्वयंपाक बनविला, पण शाळा बुडविली नाही. खूप शिकून डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे आहे, असा निर्धार ऊसतोड कामगारांच्या मुलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोडपणे त्यांनी उत्तरे देऊन सर्वांना चकित केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागातर्फे शाळा प्रवेश, शाळा उत्सव कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, लातूर, नंदूरबार, धुळे, पुणे, ठाणे या सहा जिल्ह्यांतील आदिवासी, दुर्गम, तांड्यावरील शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे थेट संवाद साधला. दुपारी २ वाजता पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला सुरुवात झाली. मुले ऊसतोडीला गेली नाहीततांडा व परिसरातील एकही मूल यंदा ऊसतोडीला गेले नाही. आजी-आजोबाजवळ राहून चिमुकल्यांनी स्वत: स्वयंपाक करून शाळेत हजेरी लावली. कोमल राठोड या विद्यार्थिनीस मुख्यमंत्र्यांनी प्रश्न केला, तुला शाळेत काय आवडते? ती म्हणाली की, सौरऊर्जेवर ई-लर्निंगचे शिक्षण मिळते, शाळेत बँक सुरू केली, बाग फुलविली, खेळणी, फुले यामध्ये आमचा दिवस जातो. शिक्षक चांगले शिकवीत असून, ज्ञानरचनावाद उपक्रमातून खूप शिकायला मिळते. वैशाली राठोड म्हणाली की, माझे आई-वडील ऊसतोडीचे काम करतात. पंरतु मी त्यांच्यासोबत जात नाही. मला इंग्रजी विषय आवडतो. घरी स्वयंपाक करून भावांना घेऊन मी शाळेत येते. मलाही डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे आहे.पालक अण्णा राठोड म्हणाले की, शिक्षकांनी सांगितलेले आम्हाला पटले. मुलांना ऊसतोडीसाठी सोबत नेले नाही, त्यांना शाळेत टाकले, तांड्यावरील कोणीही शाळाबाह्य राहणार नाही, याची काळजी घेतली. हिरामण राठोड म्हणाले की, आणखी १० वर्षे आम्ही ऊसतोडी करू, पण मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू.