शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोडू, पण मुलांना उच्च शिक्षण देऊ

By admin | Updated: June 16, 2016 00:15 IST

औरंगाबाद : आणखी दहा वर्षे कष्ट करू, ऊसतोड करू; परंतु मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू, असा निर्धार पैठण तालुक्यातील वरंवडी तांडा येथील नं. २ केंद्र, निलजगाव येथील पालकांनी केला.

औरंगाबाद : आणखी दहा वर्षे कष्ट करू, ऊसतोड करू; परंतु मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू, असा निर्धार पैठण तालुक्यातील वरंवडी तांडा येथील नं. २ केंद्र, निलजगाव येथील पाल्यांच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना केला. या शाळेतील विद्यार्थ्यांनीदेखील ‘ज्ञानरचनावाद’ आणि शाळेमुळे परिवर्तन होत असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगत पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करणार असल्याचे नमूद केले.आई-वडील ऊस तोडणीला गेल्यानंतरही चिमुकल्या हाताने स्वयंपाक बनविला, पण शाळा बुडविली नाही. खूप शिकून डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे आहे, असा निर्धार ऊसतोड कामगारांच्या मुलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोडपणे त्यांनी उत्तरे देऊन सर्वांना चकित केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागातर्फे शाळा प्रवेश, शाळा उत्सव कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, लातूर, नंदूरबार, धुळे, पुणे, ठाणे या सहा जिल्ह्यांतील आदिवासी, दुर्गम, तांड्यावरील शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे थेट संवाद साधला. दुपारी २ वाजता पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला सुरुवात झाली. मुले ऊसतोडीला गेली नाहीततांडा व परिसरातील एकही मूल यंदा ऊसतोडीला गेले नाही. आजी-आजोबाजवळ राहून चिमुकल्यांनी स्वत: स्वयंपाक करून शाळेत हजेरी लावली. कोमल राठोड या विद्यार्थिनीस मुख्यमंत्र्यांनी प्रश्न केला, तुला शाळेत काय आवडते? ती म्हणाली की, सौरऊर्जेवर ई-लर्निंगचे शिक्षण मिळते, शाळेत बँक सुरू केली, बाग फुलविली, खेळणी, फुले यामध्ये आमचा दिवस जातो. शिक्षक चांगले शिकवीत असून, ज्ञानरचनावाद उपक्रमातून खूप शिकायला मिळते. वैशाली राठोड म्हणाली की, माझे आई-वडील ऊसतोडीचे काम करतात. पंरतु मी त्यांच्यासोबत जात नाही. मला इंग्रजी विषय आवडतो. घरी स्वयंपाक करून भावांना घेऊन मी शाळेत येते. मलाही डॉक्टर, इंजिनिअर व्हायचे आहे.पालक अण्णा राठोड म्हणाले की, शिक्षकांनी सांगितलेले आम्हाला पटले. मुलांना ऊसतोडीसाठी सोबत नेले नाही, त्यांना शाळेत टाकले, तांड्यावरील कोणीही शाळाबाह्य राहणार नाही, याची काळजी घेतली. हिरामण राठोड म्हणाले की, आणखी १० वर्षे आम्ही ऊसतोडी करू, पण मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवू.