शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

समन्वय बैठकांना ब्रेक; लॉकडाऊन करताना लोकप्रतिनिधीना अंशत: विचारलेही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 12:46 IST

Partial Lockdown in Aurangabad जिल्हाधिकारी, मनपा प्रशासक, पोलीस आयुक्त, अधीक्षकांनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने घेतलेल्या संयुक्त बैठकीपूर्वी लोकप्रतिनिधींची बैठकही घेतली नाही. किंबहुना त्यांना याबाबत काही सूचनादेखील केल्या नाहीत.

ठळक मुद्देजूलैपासून सुरू झालेला प्रशासन व लोकप्रतिनिधीमधील संवादही खुंटला

औरंगाबाद : कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर ११ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय घेतांना प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अंशत: देखील विचारले नाही. शनिवारी आणि रविवारच्या १०० टक्के लॉकडाऊनवरून लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर आगपाखड सुरू केली आहे.दुसरीकडे कोरोनाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि निर्णयाबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वय राहावा, यासाठी जुलै २०२० पासून दर सोमवारी होणाऱ्या बैठकीला ऑक्टोबर २०२० पासून ब्रेक लागला तो आजपर्यंत कायम आहे.

जुलै महिन्यांत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर आगपाखड करून समन्वय नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपा, जिल्हाप्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेत मध्यस्थी केली. आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा प्रशासनाने दर सोमवारी नियमित बैठक आयोजित केली. कोरोनाचे रुग्ण कमी होताच, बैठकही गुंडाळण्यात आली.२०२० मध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांतील दर सोमवारी बैठक झाल्यात. त्यात रुग्णालयात खाटांची संख्या वाढविणे, टेस्ट वाढविणे, खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या वाढीव बिलांचे परीक्षण करणे, व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यासारखे महत्त्वाचे निर्णय झाले.

लोकप्रतिनिधींचा चक्क विसरजिल्हाधिकारी, मनपा प्रशासक, पोलीस आयुक्त, अधीक्षकांनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने घेतलेल्या संयुक्त बैठकीपूर्वी लोकप्रतिनिधींची बैठकही घेतली नाही. किंबहुना त्यांना याबाबत काही सूचनादेखील केल्या नाहीत.

संसर्ग संपल्याचा सर्वांचाच अविर्भावकोरोनाचा संसर्ग संपल्याच्या अविर्भावात सगळेच वावरत होते. लोकप्रतिनिधींनीदेखील गर्दीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. इकडे प्रशासनानेही सोहळ्यांकडे दुर्लक्ष केले. क्वारंटाईन सेंटरची व्यवस्था गुंडाळण्यात आली. लसीकरण सुरू झाल्यामुळे सगळे आलबेल होणार असे वाटत असतांनाच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा एबीसीडीपासून सगळी सुरुवात प्रशासनाला करावी लागत आहे.

प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतलाखा.डॉ.भागवत कराड म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून बैठक घेणे अपेक्षित होते. व्यापारी, उद्योजक, सामान्य नागरिकांना विश्वासात घेण्याऐवजी प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतला आहे. उपचाराची क्षमता, क्वारंटाईन सेंटर्स, खासगी रुग्णालयांतील उपचार याबाबत सगळेच अधांतरी असल्याचे दिसते आहे.

शनिवार, रविवार विषाणू सुटीवर असतो काखा.इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियातून टीका करतांना म्हटले आहे, शनिवारी आणि रविवारी कोरोनाचा विषाणू सुटीवर असणार आहे काय? विषाणूने प्रशासकीय यंत्रणेला सांगितले आहे का, तो केव्हा येणार आणि संसर्ग वाढविणार. ५०० कामगार उद्योगात जाऊ शकतात, परंतु मास्क घातलेले १०० नागरिक विवाहात सहभागी होऊ शकत नाहीत. हे खेदजनक आहे.

लॉकडाऊनची ही पध्दत नाहीआ.संजय शिरसाट म्हणाले, लॉकडाऊन करण्याची ही पध्दत नाही. परमिट रूम रात्री ९ वाजेपर्यंत चालू ठेवायचे आणि व्यायामशाळा, जिम बंद ठेवायचे. लॉकडाऊनची लोकांची मानसिकता नाही. एकदम निर्णय घेणे योग्य नाही. अधिवेशनातून परतल्यानंतर प्रशासनाला याबाबत विचारणा करण्यात येईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या