शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधील आधार खंडित; केंद्राकडून राशन दुकानांवर होणारा मोफत तांदूळ पुरवठा झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:50 IST

केंद्र शासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रतिव्यक्ती ५ किलोप्रमाणे मोफत तांदूळ पुरवठा केला.

ठळक मुद्देयोजना चालू ठेवायची की नाही हे केंद्र शासन ठरविणारलॉकडाऊनमध्ये गरिबांना केवळ रेशनचाच आधार होता.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू केल्यानंतर केंद्र शासनाने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून मोफत पुरवठा करण्यास सुरुवात केली होती. ३० नोव्हेंबरपर्यंत ही योजना होती. ही योजना एक आठवड्यापासून बंद करण्यात आली असून, यापुढे स्वस्त धान्य दुकानांवरून मोफत तांदूळ पुरवठा करायचा की नाही, याबाबतचा निर्णय केंद्र शासनच घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. 

लॉकडाऊनमध्ये गरिबांना केवळ रेशनचाच आधार होता. त्यात केंद्र शासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रतिव्यक्ती ५ किलोप्रमाणे मोफत तांदूळ पुरवठा केला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन केले. त्यामुळे लाखो कुटुंबांचे हाल होऊ नये म्हणून त्यांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत अन्नधान्य पुरविण्याचे निर्णय घेण्यात आला. मराठवाड्यातील विविध योजनांतील जवळपास ८० टक्के लाभधारकांना एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत धान्य वाटप करण्यात आले.

सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमान्वये मराठवाड्यातील ७ लाख ३७ हजार केशरी कार्डधारकांनाही (एनपीएच) सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना १ मे पासून धान्य उपलब्ध करून देण्यात आले. यासह मराठवाड्यात विविध योजनांतून तब्बल ४१ लाख ४१ हजार १६७ कार्डधारकांना धान्य योजनेचा लाभ देण्यात आला. मराठवाड्यात प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्नयोजना, तसेच अंत्योदय योजनेतील शेतकरी, अशा एकूण ३४ लाख ३ हजार २८३ कार्डधारकांना, तर ७ लाख ७३ हजार केशरी कार्डधारकांना धान्य योजनेचा लाभ देण्यात आला. 

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या