शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

लॉकडाऊनमधील आधार खंडित; केंद्राकडून राशन दुकानांवर होणारा मोफत तांदूळ पुरवठा झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:50 IST

केंद्र शासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रतिव्यक्ती ५ किलोप्रमाणे मोफत तांदूळ पुरवठा केला.

ठळक मुद्देयोजना चालू ठेवायची की नाही हे केंद्र शासन ठरविणारलॉकडाऊनमध्ये गरिबांना केवळ रेशनचाच आधार होता.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू केल्यानंतर केंद्र शासनाने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून मोफत पुरवठा करण्यास सुरुवात केली होती. ३० नोव्हेंबरपर्यंत ही योजना होती. ही योजना एक आठवड्यापासून बंद करण्यात आली असून, यापुढे स्वस्त धान्य दुकानांवरून मोफत तांदूळ पुरवठा करायचा की नाही, याबाबतचा निर्णय केंद्र शासनच घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. 

लॉकडाऊनमध्ये गरिबांना केवळ रेशनचाच आधार होता. त्यात केंद्र शासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रतिव्यक्ती ५ किलोप्रमाणे मोफत तांदूळ पुरवठा केला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन केले. त्यामुळे लाखो कुटुंबांचे हाल होऊ नये म्हणून त्यांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत अन्नधान्य पुरविण्याचे निर्णय घेण्यात आला. मराठवाड्यातील विविध योजनांतील जवळपास ८० टक्के लाभधारकांना एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत धान्य वाटप करण्यात आले.

सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमान्वये मराठवाड्यातील ७ लाख ३७ हजार केशरी कार्डधारकांनाही (एनपीएच) सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना १ मे पासून धान्य उपलब्ध करून देण्यात आले. यासह मराठवाड्यात विविध योजनांतून तब्बल ४१ लाख ४१ हजार १६७ कार्डधारकांना धान्य योजनेचा लाभ देण्यात आला. मराठवाड्यात प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्नयोजना, तसेच अंत्योदय योजनेतील शेतकरी, अशा एकूण ३४ लाख ३ हजार २८३ कार्डधारकांना, तर ७ लाख ७३ हजार केशरी कार्डधारकांना धान्य योजनेचा लाभ देण्यात आला. 

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या