शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:43 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नव्या विमानसेवा सुरू करून शहराची हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी विमानतळाच्या ‘टेकआॅफ’ला म्हणजे विकासाला सध्या खीळ बसत आहे.

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नव्या विमानसेवा सुरू करून शहराची हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी विमानतळाच्या ‘टेकआॅफ’ला म्हणजे विकासाला सध्या खीळ बसत आहे. इतर विमानतळे विकासाची ‘उड्डाणे’ घेत असताना चिकलठाणा विमानतळावरील सध्याची परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले आहे. चिकलठाणा विमानतळावरून स्पाइस जेटची औरंगाबाद- दिल्ली विमानसेवा १ फेब्रुवारी २०१५ पासून बंद करण्यात आली. ३१ जानेवारी २०१५ रोजी शहरातील १८५ प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे रवाना झालेले स्पाइस जेटचे विमान अखेरचे ठरले. हे विमान बंद झाल्यामुळे पर्यटन, उद्योगाला फटका बसला. तर ट्रूजेट कंपनीने २५ जुलै २०१५ पासून औरंगाबाद- हैदराबाद- तिरुपती विमानसेवा सुरू केली. औरंगाबादहून तिरुपतीला जाणाºया बालाजी भक्तांना आणि हैदराबादहून शिर्डीला साई दर्शनासाठी येणा-या भाविकांची या विमानसेवेने मोठी सुविधा झाली.एक विमानसेवा बंद पडल्यानंतर एका विमान कंपनीची भर पडली. परंतु गेल्या अडीच वर्षांत एकही नवीन विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. आता ट्रूजेट कंपनीने पुढील महिन्यापासून आठवड्यातून तीनच दिवस सेवा देण्याचे नियोजन केले आहे. परिणामी हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ होण्याऐवजी घट होत आहे. पूर्वी जयपूर-उदयपूर-दिल्ली विमानसेवाही सुरू होती. या विमानसेवेमुळे मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक शहरात दाखल होत असत. परंतु ही सेवा बंद झाल्याने आग्रा, जयपूर, उदयपूर येथे येणा-या पर्यटकांना औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेटी देता येत नाहीत. परिणामी औरंगाबादेतील पर्यटक संख्येवर परिणाम होत आहे. त्यामुळे विमानसेवेला घरघर लागण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी सावध पवित्रा घेऊन विमानतळाच्या विकासासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त होत आहे.