शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

विमानतळाच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:43 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नव्या विमानसेवा सुरू करून शहराची हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी विमानतळाच्या ‘टेकआॅफ’ला म्हणजे विकासाला सध्या खीळ बसत आहे.

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नव्या विमानसेवा सुरू करून शहराची हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी विमानतळाच्या ‘टेकआॅफ’ला म्हणजे विकासाला सध्या खीळ बसत आहे. इतर विमानतळे विकासाची ‘उड्डाणे’ घेत असताना चिकलठाणा विमानतळावरील सध्याची परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले आहे. चिकलठाणा विमानतळावरून स्पाइस जेटची औरंगाबाद- दिल्ली विमानसेवा १ फेब्रुवारी २०१५ पासून बंद करण्यात आली. ३१ जानेवारी २०१५ रोजी शहरातील १८५ प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे रवाना झालेले स्पाइस जेटचे विमान अखेरचे ठरले. हे विमान बंद झाल्यामुळे पर्यटन, उद्योगाला फटका बसला. तर ट्रूजेट कंपनीने २५ जुलै २०१५ पासून औरंगाबाद- हैदराबाद- तिरुपती विमानसेवा सुरू केली. औरंगाबादहून तिरुपतीला जाणाºया बालाजी भक्तांना आणि हैदराबादहून शिर्डीला साई दर्शनासाठी येणा-या भाविकांची या विमानसेवेने मोठी सुविधा झाली.एक विमानसेवा बंद पडल्यानंतर एका विमान कंपनीची भर पडली. परंतु गेल्या अडीच वर्षांत एकही नवीन विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. आता ट्रूजेट कंपनीने पुढील महिन्यापासून आठवड्यातून तीनच दिवस सेवा देण्याचे नियोजन केले आहे. परिणामी हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ होण्याऐवजी घट होत आहे. पूर्वी जयपूर-उदयपूर-दिल्ली विमानसेवाही सुरू होती. या विमानसेवेमुळे मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक शहरात दाखल होत असत. परंतु ही सेवा बंद झाल्याने आग्रा, जयपूर, उदयपूर येथे येणा-या पर्यटकांना औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेटी देता येत नाहीत. परिणामी औरंगाबादेतील पर्यटक संख्येवर परिणाम होत आहे. त्यामुळे विमानसेवेला घरघर लागण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी सावध पवित्रा घेऊन विमानतळाच्या विकासासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त होत आहे.