शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
4
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
5
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
6
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
7
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
9
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
10
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
11
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
12
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
13
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
14
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
15
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
16
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
17
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
18
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
19
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
20
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:43 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नव्या विमानसेवा सुरू करून शहराची हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी विमानतळाच्या ‘टेकआॅफ’ला म्हणजे विकासाला सध्या खीळ बसत आहे.

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नव्या विमानसेवा सुरू करून शहराची हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी विमानतळाच्या ‘टेकआॅफ’ला म्हणजे विकासाला सध्या खीळ बसत आहे. इतर विमानतळे विकासाची ‘उड्डाणे’ घेत असताना चिकलठाणा विमानतळावरील सध्याची परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले आहे. चिकलठाणा विमानतळावरून स्पाइस जेटची औरंगाबाद- दिल्ली विमानसेवा १ फेब्रुवारी २०१५ पासून बंद करण्यात आली. ३१ जानेवारी २०१५ रोजी शहरातील १८५ प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे रवाना झालेले स्पाइस जेटचे विमान अखेरचे ठरले. हे विमान बंद झाल्यामुळे पर्यटन, उद्योगाला फटका बसला. तर ट्रूजेट कंपनीने २५ जुलै २०१५ पासून औरंगाबाद- हैदराबाद- तिरुपती विमानसेवा सुरू केली. औरंगाबादहून तिरुपतीला जाणाºया बालाजी भक्तांना आणि हैदराबादहून शिर्डीला साई दर्शनासाठी येणा-या भाविकांची या विमानसेवेने मोठी सुविधा झाली.एक विमानसेवा बंद पडल्यानंतर एका विमान कंपनीची भर पडली. परंतु गेल्या अडीच वर्षांत एकही नवीन विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. आता ट्रूजेट कंपनीने पुढील महिन्यापासून आठवड्यातून तीनच दिवस सेवा देण्याचे नियोजन केले आहे. परिणामी हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ होण्याऐवजी घट होत आहे. पूर्वी जयपूर-उदयपूर-दिल्ली विमानसेवाही सुरू होती. या विमानसेवेमुळे मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक शहरात दाखल होत असत. परंतु ही सेवा बंद झाल्याने आग्रा, जयपूर, उदयपूर येथे येणा-या पर्यटकांना औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेटी देता येत नाहीत. परिणामी औरंगाबादेतील पर्यटक संख्येवर परिणाम होत आहे. त्यामुळे विमानसेवेला घरघर लागण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी सावध पवित्रा घेऊन विमानतळाच्या विकासासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त होत आहे.