शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाची राजधानी ब्रँडिंगविना

By admin | Updated: June 1, 2014 00:55 IST

नजीर शेख, प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी असे बिरुद मिरविणार्‍या औरंगाबादचे ब्रँडिंगच झाले नाही.

 नजीर शेख, प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी असे बिरुद मिरविणार्‍या औरंगाबादचे ब्रँडिंगच झाले नाही. या ऐतिहासिक जिल्ह्यात खर्‍या अर्थाने ‘अतिथी देवो भव’ची संस्कृती रुजलीच नाही. फाईव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेल वगळता, स्थानिक नागरिकांनी पर्यटन उद्योगाने अख्खे गाव समृद्ध होऊ शकते, असा विचार कधी केलाच नाही. परिणामी, पर्यटनात विविधतेने नटलेला या शहरात पर्यटक थांबतच नाहीत. कोकणच्या धर्तीवर पर्यटनात ‘औरंगाबादचा ब्रँड’ निर्माण करण्यासाठी यंग ब्रिगेडने अग्रेसिव्ह होण्याची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी आयोजित ‘टुरिझम कॉन्वलेव्ह’ कार्यक्रमात तत्कालीन राज्याचे पर्यटनमंत्री विजयकुमार गावित यांनी औरंगाबाद महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून अधिकृतरीत्या घोषणा केली होती. याशिवाय औरंगाबाद, अजिंठा, वेरूळ व लोणार यांचा समावेश असलेल्या ‘औरंगाबाद हेरिटेज कॉरिडोर’ची घोषणाही त्यांनी केली होती. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा समृद्ध आहे. मात्र, पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी कोकणात जसे घराघरांतून प्रयत्न होतात तसेच प्रयत्न औरंगाबाद जिल्ह्यात झाल्यास पर्यटन उद्योगात क्रांती होेऊ शकते. यासाठी संपूर्णपणे शासनाच्या भरवशावर गाडी न हाकता, औरंगाबादकरांनी स्वत: उद्योगात उडी घेण्याची गरज आहे. प्रत्येक पर्यटक फाईव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेलमध्ये राहू शकत नाही. याकरिता यंग ब्रिगेडने नोकरीऐवजी ‘अतिथी देवो भव’ म्हणत पर्यटकांना लज्जतदार जेवणापासून, निवासापर्यंत सुविधा पुरविल्यास पर्यटनात ‘औरंगाबादी ब्रँड’ निर्माण होऊ शकतो. राज्य शासनाचे दुर्लक्ष अजिंठा, वेरूळसह औरंगाबाद शहरातील पर्यटनस्थळांच्या विकासाकडे राज्य सरकारने आतापर्यंत गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसते. औरंगाबादसह वेरूळ, खुलताबाद, म्हैसमाळ, शूलिभंजन या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे राज्याच्या अर्थसंकल्पात गेल्या अनेक वर्षांपासून वाक्य असते. मात्र, आर्थिक तरतुदीच्या पातळीवर राज्य शासनाने पर्यटन राजधानीसाठी भरीव तरतूद केल्याचे दिसत नाही. त्यामुळे पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा निर्माण करता आल्या नाहीत. पर्यटन ब्रँड 1 देशाच्या पातळीवर विचार केला तर जम्मू- काश्मीर, राजस्थान, केरळ, हिमाचल प्रदेश तसेच धार्मिक स्थळांच्या बाबतीत उत्तर प्रदेश तसेच उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ, केदारेश्वर, हरिद्वार, प्रयाग, वाराणसी आदी स्थळांमुळे धार्मिक स्थळांच्या बाबतीत एक ब्रँड निर्माण झाला आहे. 2 त्या-त्या प्रदेशातील वैशिष्ट्यांचा या ब्रँडमध्ये समावेश होऊ शकतो. राजस्थानमध्ये पोशाखापासून ते आहारापर्यंत केवळ राजस्थानी ‘कल्चर’ डोकावते आणि हाच राजस्थानी ब्रँड म्हणून लोकप्रिय आहे. याचप्रमाणे काश्मिरी संस्कृती आणि तेथील आदरातिथ्य यामुळे काश्मीरचा देशात नंबर एकचा ब्रँड निर्माण झाला आहे. 3 महाराष्टÑाचा विचार केला तरी आपल्याकडे कोकणी, मालवणी, कोल्हापुरी, असे ब्रँड निर्माण झाले आहेत. त्या-त्या भागातील पर्यटन/धार्मिक स्थळांबरोबच तेथील खाद्यसंस्कृती, सांस्कृतिक वारसा, कलाकुसर, कौशल्ये याचा समावेश त्यामध्ये होतो. 4 मात्र, पर्यटनाची राज्याची राजधानी असलेल्या व युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत अजिंठा आणि वेरूळचा समावेश असतानाही केवळ ब्रँड निर्माण झाला नसल्याने किंवा जाणीवपूर्वक केला नसल्याने पर्यटनाच्या दृष्टीने आपण मागे पडत चाललो आहोत. ‘येवा कोकण आपलाच आसा’ हे वाक्य जसे प्रसिद्ध झाले तसे काही आपल्याकडे दिसत नाही. प्रसिद्धीची आवश्यकता औरंगाबादचा खास पर्यटन ब्रँड निर्माण करण्याबरोबरच त्याची राज्याच्या संपूर्ण देशभरात जाहिरात होणे आवश्यक आहे. इतर राज्यांतील राजधानीची शहरे तसेच इतर पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाहिरातबाजी होणे आवश्यक आहे. आधुनिक काळात सोशल नेटवर्किंग, वेबसाईट याचाही वापर करता येऊ शकेल. आपल्याकडे सर्व आहे; पण मार्केटिंग नाही, हेच दुखणे आहे. या दुखण्यावर मात करण्याची गरज आहे.