शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जागतिक हवामान बदलावर उद्या मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:32 IST

हवामान बदल व त्याचे शेतीवर होणारे परिणाम यावर सातत्याने संशोधन करणारे देश व विदेशातील शास्त्रज्ञ शहरात येत आहेत. एवढेच नव्हे तर राज्यातील चारही कृषी विद्यापीठ पुन्हा एकदा एकत्रित येऊन विचारमंथन करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हवामान बदल व त्याचे शेतीवर होणारे परिणाम यावर सातत्याने संशोधन करणारे देश व विदेशातील शास्त्रज्ञ शहरात येत आहेत. एवढेच नव्हे तर राज्यातील चारही कृषी विद्यापीठ पुन्हा एकदा एकत्रित येऊन विचारमंथन करणार आहेत. १४ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाºया या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून निघालेले निष्कर्ष, उपाययोजना राज्य शासन, शास्त्रज्ञ, शेतकºयांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.एमजीएम महाविद्यालयातील रुक्मिणी सभागृहात १४ रोजी हवामान बदलावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी वाल्मी येथे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू वेंकटेश्वरलू यांनी पत्रपरिषद घेतली. कुलगुरूंनी सांगितले की, बदलते हवामान व त्याचा कृषी क्षेत्रावर होणाºया परिणामावर देश-विदेशात संशोधन सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात शास्त्रज्ञ संशोधन, नवतंत्रज्ञानाची माहिती देणार आहे. शिवाय भविष्यातील हवामानबदलाच्या आव्हानांना कसे सामोरे जायचे व कोणत्या परिस्थितीत कोणते पीक शेतकºयाला तारू शकेल. याचा दिशादर्शक अहवाल या चर्चासत्रातील सखोल मंथनातून तयार करण्यात येणार आहे. याचा फायदा राज्य शासनाला त्यांचे शेतीविषयक धोरण ठरविण्यात मोठा उपयोग होईल, तसेच कृषी उद्योग तसेच शेतकºयांनाही अहवाल अतिउपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. चर्चासत्राचे उद्घाटन नीती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद करणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी पद्मभूषण डॉ. आर. एस. परोडा व चारही कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची उपस्थिती राहणार आहे. वाल्मी येथे १२ सत्रात प्रत्येक विषयावर सखोल विचारमंथन होणार आहे. शास्त्रज्ञांसाठी प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.या प्रदर्शनात शेतकºयांसाठी एक चर्चासत्र आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वाल्मीचे महासंचालक एच. के. गोसावी आदींची उपस्थिती होती.