शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
5
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
6
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
7
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
8
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
9
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
10
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
11
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
12
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
13
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
14
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
15
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
16
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
17
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
18
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
19
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!

ब्राह्मण समाज अन्य समाजांसमवेत संमेलने घेणार...

By admin | Updated: February 8, 2016 00:19 IST

लातूर : देशातील समाज वेगवेगळ्या जाती-जमातीत विखुरला गेला आहे. प्रत्येक जातीचे गट आहेत. त्यामुळे समाजा-समाजात दरी निर्माण होते. ही दरी दूर होण्याची गरज आहे.

लातूर : देशातील समाज वेगवेगळ्या जाती-जमातीत विखुरला गेला आहे. प्रत्येक जातीचे गट आहेत. त्यामुळे समाजा-समाजात दरी निर्माण होते. ही दरी दूर होण्याची गरज आहे. त्यासाठी ब्राह्मण समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत वेदशास्त्राचे अभ्यासक अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी येथे रविवारी व्यक्त केले.अखिल भारतीय ब्राह्मण महासंमेलन बेळंबे नगरात सुरू आहे. संमेलनातील ‘ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी प़पू. दत्तात्रय महाराज रुईकर होते़ मंचावर संमेलन प्रमुख सुबोध बेळंबे, स्वागताध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, आ़ अमर राजूरकर, नांदेडचे नगरसेवक संजीव कोल्हे, परळीचे नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, पेशवा संघटनेचे अध्यक्ष दीपक रणनवरे आदी उपस्थित होते.भगरे गुरुजी म्हणाले, काळ झपाट्याने बदलत आहे़ अशा स्थितीत देश प्रबळ बनला पाहिजे़ यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केलेच पाहिजे़ त्याबरोबरच भारतीय संस्कृतीही तरुणांनी जपली पाहिजे़ ब्राह्मण समाज सुरुवातीपासूनच सर्व समाजाला सोबत घेऊन जात असून, सुरुवातीपासूनच तो सर्वांना मार्गदर्शक ठरला आहे़ ब्राह्मण समाजाच्या तरुणांनी केवळ शिक्षणच घेऊन थांबू नये, तर त्यांनी समाजकारणासोबतच राजकारणामध्येही आले पाहिजे, असेही ब्राह्मण तरुणांना यावेळी आवाहन केले़ माणसांनी आपापल्या गरजेसाठी विविध जाती-धर्माचे गट निर्माण केले आहेत़ त्यामुळे समाजा-समाजातील विचारांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम काही लोक करीत असतात़ ती विचारांची दरी कमी करण्याची गरज असून, ब्राह्मण समाजातील तरुणांनी पुढे आले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले़ या परिसंवादात बारामतीचे बाळासाहेब गावडे यांना ‘बाजीराव शौर्य पुरस्कारा’ने गौरविण्यात आले़ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जेवरीकर, वैशाली गोस्वामी, संजय अयाचित यांनी केले़ (प्रतिनिधी)समाजा-समाजात असलेली दरी कमी करण्यासाठी ब्राह्मण समाजाने यापूर्वीही पुढाकार घेतला आहे. आता वाढत असलेली दरी कमी करण्यासाठी ब्राह्मण समाज ब्राह्मण-धनगर समाज, ब्राह्मण-माळी समाज, ब्राह्मण-धोबी समाज अशी महासंमेलने घेणार आहे. जेणेकरून समाजा-समाजातील दरी कमी होईल, असेही भगरे गुरुजी म्हणाले.