शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

ब्राह्मण समाज अन्य समाजांसमवेत संमेलने घेणार...

By admin | Updated: February 8, 2016 00:19 IST

लातूर : देशातील समाज वेगवेगळ्या जाती-जमातीत विखुरला गेला आहे. प्रत्येक जातीचे गट आहेत. त्यामुळे समाजा-समाजात दरी निर्माण होते. ही दरी दूर होण्याची गरज आहे.

लातूर : देशातील समाज वेगवेगळ्या जाती-जमातीत विखुरला गेला आहे. प्रत्येक जातीचे गट आहेत. त्यामुळे समाजा-समाजात दरी निर्माण होते. ही दरी दूर होण्याची गरज आहे. त्यासाठी ब्राह्मण समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत वेदशास्त्राचे अभ्यासक अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी येथे रविवारी व्यक्त केले.अखिल भारतीय ब्राह्मण महासंमेलन बेळंबे नगरात सुरू आहे. संमेलनातील ‘ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी प़पू. दत्तात्रय महाराज रुईकर होते़ मंचावर संमेलन प्रमुख सुबोध बेळंबे, स्वागताध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, आ़ अमर राजूरकर, नांदेडचे नगरसेवक संजीव कोल्हे, परळीचे नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, पेशवा संघटनेचे अध्यक्ष दीपक रणनवरे आदी उपस्थित होते.भगरे गुरुजी म्हणाले, काळ झपाट्याने बदलत आहे़ अशा स्थितीत देश प्रबळ बनला पाहिजे़ यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केलेच पाहिजे़ त्याबरोबरच भारतीय संस्कृतीही तरुणांनी जपली पाहिजे़ ब्राह्मण समाज सुरुवातीपासूनच सर्व समाजाला सोबत घेऊन जात असून, सुरुवातीपासूनच तो सर्वांना मार्गदर्शक ठरला आहे़ ब्राह्मण समाजाच्या तरुणांनी केवळ शिक्षणच घेऊन थांबू नये, तर त्यांनी समाजकारणासोबतच राजकारणामध्येही आले पाहिजे, असेही ब्राह्मण तरुणांना यावेळी आवाहन केले़ माणसांनी आपापल्या गरजेसाठी विविध जाती-धर्माचे गट निर्माण केले आहेत़ त्यामुळे समाजा-समाजातील विचारांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम काही लोक करीत असतात़ ती विचारांची दरी कमी करण्याची गरज असून, ब्राह्मण समाजातील तरुणांनी पुढे आले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले़ या परिसंवादात बारामतीचे बाळासाहेब गावडे यांना ‘बाजीराव शौर्य पुरस्कारा’ने गौरविण्यात आले़ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जेवरीकर, वैशाली गोस्वामी, संजय अयाचित यांनी केले़ (प्रतिनिधी)समाजा-समाजात असलेली दरी कमी करण्यासाठी ब्राह्मण समाजाने यापूर्वीही पुढाकार घेतला आहे. आता वाढत असलेली दरी कमी करण्यासाठी ब्राह्मण समाज ब्राह्मण-धनगर समाज, ब्राह्मण-माळी समाज, ब्राह्मण-धोबी समाज अशी महासंमेलने घेणार आहे. जेणेकरून समाजा-समाजातील दरी कमी होईल, असेही भगरे गुरुजी म्हणाले.