शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोघांची सुट्टी आश्रमशाळेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 23:38 IST

तामलवाडी : परीक्षा संपल्यानंतर शाळेतला किलबिलाट थांबला आहे. अनेकांनी आजी-आजोबा, मामा-मामीकडे सुटीसाठी जाणे पसंत केले आहे,

संतोष मगरतामलवाडी : परीक्षा संपल्यानंतर शाळेतला किलबिलाट थांबला आहे. अनेकांनी आजी-आजोबा, मामा-मामीकडे सुटीसाठी जाणे पसंत केले आहे, तर अनेकजण आई-बाबांसमवेत पर्यटनस्थळी सुटीची मजा घेत आहेत; मात्र यमगरवाडीतील एकलव्य आश्रमशाळेत असलेल्या त्या दोन विद्यार्थ्यांच्या नशिबी हे सुख नाही. आई-वडिलांविना पोरके असलेल्या तीन बहिणींना मावशी मिळाली आहे. मात्र दोघे विद्यार्थी जवळचे असे कोणी नसल्याने सुटीतही आश्रमशाळेतच आहेत.यमगरवाडी शिक्षण संकुलातील एकलव्य आश्रमशाळेत भटक्या विमुक्त समाजातील मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी संस्था आणि संस्थेतील कर्मचारी सातत्याने प्रयत्न करीत असतात. त्यामुळेच याच शाळेतील अनेक विद्यार्थी आज अनेक महत्त्वाच्या हुद्द्यावर काम करीत आहेत. सध्यस्थितीत या शाळेत ३७१ मुले शिक्षण घेत आहेत. परीक्षा संपल्यानंतर यातील बहुतांश मुले आपल्या घर, तसेच नातलगांकडे सुटीसाठी परतले आहेत. मात्र आई-वडिलांसह जवळचे नातेवाईक नसलेल्या रुपाली (वय ३ वर्षे), सोनाली (वय ५ वर्षे) आणि दीपाली (वय ७ वर्षे) या तिन्ही बहिणी सुटीतही आश्रमशाळेतच होत्या. जवळचे असे नातेवाईक नसल्याने जायचे कोणाकडे आणि सुटी सांभाळणार कोण? त्यामुळे या तिघींनीही आपल्याला हक्काचा निवारा दिलेल्या आश्रमशाळेत राहणेच पसंत केले. आश्रमशाळेतील कर्मचारीही या चिमुकल्यांची लेकरांप्रमाणेच काळजी घेतात; मात्र तरीही सुटीत कुठेतरी जावे असे या चिमुकल्यांना वाटणे स्वाभाविकच. ही त्यांची व्यथा पाटोदा (ता. किनवट, जि. नांदेड) येथील देवीसरोजा खंडगावकर यांना समजली. त्यांना या तिन्ही मुली मावशी मानतात. या चिमुकल्यांना खंडगावकर यांनी सुटीसाठी पाटोद्याला नेले आहे. या तिघींसारखीच रामू (इयत्ता सातवी) आणि रतन (इयत्ता सहावी) या दोघांची स्थिती आहे. या दोघांनाही जवळचे असे कोणी नाही. आई-वडिलांच्या पश्चात आश्रमशाळा हेच आज त्यांच्यासाठी हक्काचे घर आहे. आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्या नातलग, पै-पाहुण्यांकडे आनंदाने उपभोगत असताना हे दोघे मात्र आश्रमशाळेतच आहेत. दरम्यान, पाटोद्याला सुटीवर गेलेल्या तिघी बहिणी सुटी संपताच पुढील शिक्षणासाठी यमगरवाडी येथे दाखल होणार असल्याचे संस्थेच्या सूत्रांनी सांगितले.