शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

वर्धन घोडे खून खटल्यात दोन्ही आरोपी दोषी; ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी केले होते अपहरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 19:32 IST

२७ फेब्रुवारी २०१७ रोजी वर्धन विवेक घोडे या मुलाचे कारमधून अपहरण करून दौलताबाद घाटामध्ये त्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता.

औरंगाबाद : ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी वर्धन घोडे या दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खून केल्याच्या आरोपाखाली अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघांना सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी (दि.१०) दोषी ठरविले. या दोघांच्या शिक्षेबाबत मंगळवारी (दि ११ डिसेंबर) सुनावणी झाली. १४ डिसेंबरला त्यांना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 

टिळकनगरमधील गुरुकुंज हाऊसिंग सोसायटीतून २७ फेब्रुवारी २०१७ रोजी वर्धन विवेक घोडे या मुलाचे कारमधून अपहरण करून दौलताबाद घाटामध्ये त्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता. श्रेयनगरमधील नाल्यामध्ये त्याचा मृतदेह टाकण्यात आला होता. वर्धनची आई भारती विवेक घोडे (३८) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास  करून खून करणारे अभिलाष सुधीर मोहनपूरकर (रा. टिळकनगर) आणि श्याम लक्ष्मण मगरे (रा. तडगूर, ता. मदनूर, जि. निजामाबाद, ह. मु. टिळकनगर), या दोघांना २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या होत्या. त्या दोघांविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाअंती ७५० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.  

अभियोग पक्षातर्फे नाशिक येथील विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी यापूर्वीच्या युक्तिवादात घटनाक्रम विशद करीत सर्व पुराव्यांचा खुलासा करून पुराव्यांचे सर्व तपशीलही दिले होते. मृताला झालेल्या जखमा कशा प्रकारे होऊ शकतात त्याचा वैद्यकीय अहवाल, तसेच मृताचा फोटो, जखमा आणि गळा आवळण्यात आलेला रुमाल यांची सांगड घालून मृतदेहाजवळ सापडलेली चिठ्ठी, मृतदेह व रुमाल यांचे सबळ पुरावे व न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.

विशेषत: घटनाक्रमाची साखळी कशी जुळते हे डीएनए चाचणी, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे टॉवर लोकेशन्स, आदी वैज्ञानिक पुराव्यांद्वारे (सायन्टिफिक एव्हिडन्स), तसेच  पेट्रोल पंपावरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या युक्तिवादाच्या पुष्ट्यर्थ अ‍ॅड. मिसर यांनी उच्च न्यायालयाच्या सुमारे १०० आणि सर्वोच्च न्यायालयाच्या २५ निकालांचे (केस लॉ) संदर्भ सादर केले. अभियोग पक्षाने एकूण ४१ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. अ‍ॅड. मिसर यांना अ‍ॅड. सुरेश गायकवाड आणि फिर्यादीतर्फे (असिस्ट टू प्रॉसिक्युशन) अ‍ॅड. विजय काळे यांनी सहकार्य केले.

आरोपींनी सादर केली चिठ्ठीआजच्या सुनावणीदरम्यान आरोपी अभिलाष मोहनपूरकर याने १० पानी चिठ्ठी वजा अर्ज न्यायालयात सादर केला. त्यात म्हटले होते की, त्याने आणि श्याम मगरे यांनी वर्धनचा खून केला नाही. ते दोघे (आरोपी), त्यांची मैत्रीण आणि वर्धन वाहनातून जात असताना पाच जणांनी त्यांना अडविले.पिस्तुलाचा धाक दाखवून वर्धन आणि दोन्ही आरोपींना गुडघ्यावर बसवून त्यांच्या मैत्रिणीवर बलात्कार केला. त्या पाच जणांनीच वर्धनचा खून केला, असे म्हटले होते; मात्र न्यायालयाने ती चिठ्ठी रेकॉर्डवर घेतली नाही, वाचून उभय पक्षाच्या वकिलांकडे दिली. या खून खटल्याची सुनावणी सात महिने चालली व सोमवारी त्याचा निकाल न्यायालयाने सुनावला. 

या आरोपांखाली धरले दोषीन्यायालयाने वरील दोन्ही आरोपींना खून करणे (भादंवि कलम ३०२), पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे (भादंवि कलम २०१), अपहरण करणे (भादंवि कलम ३६३) आणि फौजदारीपात्र कट रचणे (भादंवि कलम १२० (ब)) या आरोपांखाली दोषी धरले.