शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

वर्धन घोडे खून खटल्यात दोन्ही आरोपी दोषी; ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी केले होते अपहरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 19:32 IST

२७ फेब्रुवारी २०१७ रोजी वर्धन विवेक घोडे या मुलाचे कारमधून अपहरण करून दौलताबाद घाटामध्ये त्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता.

औरंगाबाद : ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी वर्धन घोडे या दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खून केल्याच्या आरोपाखाली अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघांना सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी (दि.१०) दोषी ठरविले. या दोघांच्या शिक्षेबाबत मंगळवारी (दि ११ डिसेंबर) सुनावणी झाली. १४ डिसेंबरला त्यांना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 

टिळकनगरमधील गुरुकुंज हाऊसिंग सोसायटीतून २७ फेब्रुवारी २०१७ रोजी वर्धन विवेक घोडे या मुलाचे कारमधून अपहरण करून दौलताबाद घाटामध्ये त्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता. श्रेयनगरमधील नाल्यामध्ये त्याचा मृतदेह टाकण्यात आला होता. वर्धनची आई भारती विवेक घोडे (३८) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास  करून खून करणारे अभिलाष सुधीर मोहनपूरकर (रा. टिळकनगर) आणि श्याम लक्ष्मण मगरे (रा. तडगूर, ता. मदनूर, जि. निजामाबाद, ह. मु. टिळकनगर), या दोघांना २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या होत्या. त्या दोघांविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाअंती ७५० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.  

अभियोग पक्षातर्फे नाशिक येथील विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी यापूर्वीच्या युक्तिवादात घटनाक्रम विशद करीत सर्व पुराव्यांचा खुलासा करून पुराव्यांचे सर्व तपशीलही दिले होते. मृताला झालेल्या जखमा कशा प्रकारे होऊ शकतात त्याचा वैद्यकीय अहवाल, तसेच मृताचा फोटो, जखमा आणि गळा आवळण्यात आलेला रुमाल यांची सांगड घालून मृतदेहाजवळ सापडलेली चिठ्ठी, मृतदेह व रुमाल यांचे सबळ पुरावे व न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.

विशेषत: घटनाक्रमाची साखळी कशी जुळते हे डीएनए चाचणी, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे टॉवर लोकेशन्स, आदी वैज्ञानिक पुराव्यांद्वारे (सायन्टिफिक एव्हिडन्स), तसेच  पेट्रोल पंपावरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या युक्तिवादाच्या पुष्ट्यर्थ अ‍ॅड. मिसर यांनी उच्च न्यायालयाच्या सुमारे १०० आणि सर्वोच्च न्यायालयाच्या २५ निकालांचे (केस लॉ) संदर्भ सादर केले. अभियोग पक्षाने एकूण ४१ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. अ‍ॅड. मिसर यांना अ‍ॅड. सुरेश गायकवाड आणि फिर्यादीतर्फे (असिस्ट टू प्रॉसिक्युशन) अ‍ॅड. विजय काळे यांनी सहकार्य केले.

आरोपींनी सादर केली चिठ्ठीआजच्या सुनावणीदरम्यान आरोपी अभिलाष मोहनपूरकर याने १० पानी चिठ्ठी वजा अर्ज न्यायालयात सादर केला. त्यात म्हटले होते की, त्याने आणि श्याम मगरे यांनी वर्धनचा खून केला नाही. ते दोघे (आरोपी), त्यांची मैत्रीण आणि वर्धन वाहनातून जात असताना पाच जणांनी त्यांना अडविले.पिस्तुलाचा धाक दाखवून वर्धन आणि दोन्ही आरोपींना गुडघ्यावर बसवून त्यांच्या मैत्रिणीवर बलात्कार केला. त्या पाच जणांनीच वर्धनचा खून केला, असे म्हटले होते; मात्र न्यायालयाने ती चिठ्ठी रेकॉर्डवर घेतली नाही, वाचून उभय पक्षाच्या वकिलांकडे दिली. या खून खटल्याची सुनावणी सात महिने चालली व सोमवारी त्याचा निकाल न्यायालयाने सुनावला. 

या आरोपांखाली धरले दोषीन्यायालयाने वरील दोन्ही आरोपींना खून करणे (भादंवि कलम ३०२), पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे (भादंवि कलम २०१), अपहरण करणे (भादंवि कलम ३६३) आणि फौजदारीपात्र कट रचणे (भादंवि कलम १२० (ब)) या आरोपांखाली दोषी धरले.