शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

भाजपा-सेना सरकारचे धोरण शेतकरी विरोधी

By admin | Updated: February 4, 2015 00:40 IST

उस्मानाबाद : सत्तेत आल्यानंतर भाजप-सेना सरकारने शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांच्या हिताविरोधी निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे

उस्मानाबाद : सत्तेत आल्यानंतर भाजप-सेना सरकारने शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांच्या हिताविरोधी निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. दुष्काळी अनुदानात हात आखडता घेतला, खताची सबसीडी काढून घेतली, रॉकेल अन् धान्याचा कोटाही कमी केल्याचे सांगत ही कार्यपद्धी अशीच सुरू राहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला. राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.आ. पाटील म्हणाले की, दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनान मदत जाहीर केली. परंतु, ही मदत अत्यंत तोकडी आहे. शेतकऱ्यांच्या हाती हेक्टरी दोन ते अडीच हजार रूपयेही पडत नाहीत. त्यामुळे देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे भाजप-सेना सरकारने खताची सबसीडीही काढून घेतली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबतही शासनाने फेरविचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या वतीने (युपीए) केसरी कार्डधारकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य पुरविण्यात येत होते. परंतु, भाजपा-सेना सरकारने सत्तेत आल्याबरोबर धान्य वाटप बंद केले. आघाडी सरकार एपीएल कार्डधारकांना धान्य पुरवठा करू शकत होते, मग सध्याचे सरकार हे का करू शकत नाही? असा सवालही त्यंनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, केंद्र आणि राज्यातील शासनाने रॉकेलच्या कोट्यातही मोठी कपात केली आहे. ही कपात जवळपास ७२ टक्क्यांच्या आसपास आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील काकडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी) राज्यातील ८ कोटी ७७ लाख केशरी कार्ड धारकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य देण्याची योजना तत्कालीन युपीए सरकारने सुरू केली. तर केंद्राकडून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ७ कोटी लाभार्थ्यांना दोन रूपये किलोने गहू तर ३ रूपये किलोने तांदूळ दिला जात होता. महाराष्ट्र शासन दरमहा १२० कोटी खर्च करून उर्वरित १ कोटी ७७ लाख केशरी कार्डधारकांना प्रतिमहा १० किलो गहू व ५ किलो तांदूळ सवलतीच्या दरात देत होते. मात्र, भाजप-सेना सरकारने नोव्हेंबर महिन्यापासून १ कोटी ७७ लाख केशरी कार्डधारकांचे धान्य बंद केले. त्यामुळे राज्यातील २ कोटी जनतेच्या तोंडचा घास सध्याच्या सरकारने हिसकावला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात १ लाख १६ हजार ८८६ एपीएल कार्डधारक आहेत. या लाभार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये गहू, तांदूळ मिळणे बंद झाले असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.