शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

भाजपा-सेना सरकारचे धोरण शेतकरी विरोधी

By admin | Updated: February 4, 2015 00:40 IST

उस्मानाबाद : सत्तेत आल्यानंतर भाजप-सेना सरकारने शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांच्या हिताविरोधी निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे

उस्मानाबाद : सत्तेत आल्यानंतर भाजप-सेना सरकारने शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांच्या हिताविरोधी निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. दुष्काळी अनुदानात हात आखडता घेतला, खताची सबसीडी काढून घेतली, रॉकेल अन् धान्याचा कोटाही कमी केल्याचे सांगत ही कार्यपद्धी अशीच सुरू राहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला. राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.आ. पाटील म्हणाले की, दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनान मदत जाहीर केली. परंतु, ही मदत अत्यंत तोकडी आहे. शेतकऱ्यांच्या हाती हेक्टरी दोन ते अडीच हजार रूपयेही पडत नाहीत. त्यामुळे देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे भाजप-सेना सरकारने खताची सबसीडीही काढून घेतली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबतही शासनाने फेरविचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या वतीने (युपीए) केसरी कार्डधारकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य पुरविण्यात येत होते. परंतु, भाजपा-सेना सरकारने सत्तेत आल्याबरोबर धान्य वाटप बंद केले. आघाडी सरकार एपीएल कार्डधारकांना धान्य पुरवठा करू शकत होते, मग सध्याचे सरकार हे का करू शकत नाही? असा सवालही त्यंनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, केंद्र आणि राज्यातील शासनाने रॉकेलच्या कोट्यातही मोठी कपात केली आहे. ही कपात जवळपास ७२ टक्क्यांच्या आसपास आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील काकडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी) राज्यातील ८ कोटी ७७ लाख केशरी कार्ड धारकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य देण्याची योजना तत्कालीन युपीए सरकारने सुरू केली. तर केंद्राकडून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ७ कोटी लाभार्थ्यांना दोन रूपये किलोने गहू तर ३ रूपये किलोने तांदूळ दिला जात होता. महाराष्ट्र शासन दरमहा १२० कोटी खर्च करून उर्वरित १ कोटी ७७ लाख केशरी कार्डधारकांना प्रतिमहा १० किलो गहू व ५ किलो तांदूळ सवलतीच्या दरात देत होते. मात्र, भाजप-सेना सरकारने नोव्हेंबर महिन्यापासून १ कोटी ७७ लाख केशरी कार्डधारकांचे धान्य बंद केले. त्यामुळे राज्यातील २ कोटी जनतेच्या तोंडचा घास सध्याच्या सरकारने हिसकावला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात १ लाख १६ हजार ८८६ एपीएल कार्डधारक आहेत. या लाभार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये गहू, तांदूळ मिळणे बंद झाले असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.