शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-सेना सरकारचे धोरण शेतकरी विरोधी

By admin | Updated: February 4, 2015 00:40 IST

उस्मानाबाद : सत्तेत आल्यानंतर भाजप-सेना सरकारने शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांच्या हिताविरोधी निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे

उस्मानाबाद : सत्तेत आल्यानंतर भाजप-सेना सरकारने शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांच्या हिताविरोधी निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. दुष्काळी अनुदानात हात आखडता घेतला, खताची सबसीडी काढून घेतली, रॉकेल अन् धान्याचा कोटाही कमी केल्याचे सांगत ही कार्यपद्धी अशीच सुरू राहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला. राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.आ. पाटील म्हणाले की, दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनान मदत जाहीर केली. परंतु, ही मदत अत्यंत तोकडी आहे. शेतकऱ्यांच्या हाती हेक्टरी दोन ते अडीच हजार रूपयेही पडत नाहीत. त्यामुळे देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे भाजप-सेना सरकारने खताची सबसीडीही काढून घेतली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबतही शासनाने फेरविचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या वतीने (युपीए) केसरी कार्डधारकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य पुरविण्यात येत होते. परंतु, भाजपा-सेना सरकारने सत्तेत आल्याबरोबर धान्य वाटप बंद केले. आघाडी सरकार एपीएल कार्डधारकांना धान्य पुरवठा करू शकत होते, मग सध्याचे सरकार हे का करू शकत नाही? असा सवालही त्यंनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, केंद्र आणि राज्यातील शासनाने रॉकेलच्या कोट्यातही मोठी कपात केली आहे. ही कपात जवळपास ७२ टक्क्यांच्या आसपास आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील काकडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी) राज्यातील ८ कोटी ७७ लाख केशरी कार्ड धारकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य देण्याची योजना तत्कालीन युपीए सरकारने सुरू केली. तर केंद्राकडून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ७ कोटी लाभार्थ्यांना दोन रूपये किलोने गहू तर ३ रूपये किलोने तांदूळ दिला जात होता. महाराष्ट्र शासन दरमहा १२० कोटी खर्च करून उर्वरित १ कोटी ७७ लाख केशरी कार्डधारकांना प्रतिमहा १० किलो गहू व ५ किलो तांदूळ सवलतीच्या दरात देत होते. मात्र, भाजप-सेना सरकारने नोव्हेंबर महिन्यापासून १ कोटी ७७ लाख केशरी कार्डधारकांचे धान्य बंद केले. त्यामुळे राज्यातील २ कोटी जनतेच्या तोंडचा घास सध्याच्या सरकारने हिसकावला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात १ लाख १६ हजार ८८६ एपीएल कार्डधारक आहेत. या लाभार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये गहू, तांदूळ मिळणे बंद झाले असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.