शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली...!

By admin | Updated: January 3, 2017 00:06 IST

जालना : निवडणूक काळात दिलेल्या शेतमालाला हमीभावासह इतर आश्वासनांची पूर्तता केलेली नाही

जालना : निवडणूक काळात दिलेल्या शेतमालाला हमीभावासह इतर आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि कामगारांना बसला आहे. भाजपा सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.पाटील म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय कुठलीही तयारी न करता घेतल्याने ग्रामीण भागात आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. या निर्णयामुळे भाजपाला बाजार, जनावरांचा बाजार आदी मार्केट ठप्प असून, त्याचे भावही कमालीचे उतरले आहेत. एकूणच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हतबल झाला असून, त्यांचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. काँग्रेस आघाडी आणि भाजपा युती दोन्ही पक्ष सारखेच असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष सोडून इतर छोटे-छोटे पक्ष आणि संघाटनांशी आघाडी करण्यात येणार आहे. संभाजी ब्रिगेड, संविधान मोर्चा, भारत मुक्ती संग्राम, किसानसभा आदी संघटनांना सोबत घेतले जाईल, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतमाल आणि स्वामीनाथ आयोगाबाबत केलेल्या विधानाचा त्यांनी निषेध केला. गत काही वर्षांत राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेस कालीदास आपेट, शिवाजी नांदकिले, बाबूराव गोल्डे, डॉ. आप्पासाहेब कदम, देविदास वाघ, दत्ता पाटील, गोविंद आर्दड, गजानन राजबिंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)