शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

भाजप शहरप्रमुख ते कॅबिनेटमंत्री, आता अतुल सावेंची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी वर्णीही शक्य

By विकास राऊत | Updated: August 9, 2022 18:08 IST

आ. अतुल सावे यांना दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात संधी; भाजपने मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचनेसाठी दिला चेहरा

औरंगाबाद : आ. अतुल मोरेश्वर सावे यांना २०१७ सालापासून मंत्रिमंडळ विस्तारात हुलकावणी दिल्यानंतर शेवटच्या टप्प्यात म्हणजेच २०१९ साली त्यांना पाच महिन्यांसाठी राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मंत्री होण्याचे निश्चित होते, मात्र शिवसेना-भाजप युती तुटली आणि त्यांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले. ते स्वप्न शिंदे सरकारमध्ये पूर्ण झाले आहे. येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आ. सावे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यांनी मंगळवारी राजभवनात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. पालकमंत्रिपदी सावे यांना संधी मिळण्याची चर्चा सध्या सुरू आहे.

आ. सावे यांचा १९९८ ते २०१९ पर्यंत हा २१ वर्षांचा राजकीय प्रवास अनेक चढ-उतारांचा असला तरी त्यांनी भाजपशी असलेली नाळ तुटू दिली नाही. शिवसेनेसोबत युतीत असताना त्यांनी नेहमीच संयमाची भूमिका घेत शहरातील राजकारणात काम करताना वेगळा ठसा उमटविला. एक उद्योगकर्मी आणि उद्योगाची जाण असलेला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. एक-दोन अपवादात्मक घटना वगळता मागील २४ वर्षांत भाजपसोबत काम करताना त्यांनी १९९८ ते २००३ पर्यंत शहराध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य या पदावर २००३ ते २००६ पर्यंत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. 

२००६ ते २००९ या काळात ते भाजप जिल्हाध्यक्ष झाले. यानंतर भाजप राज्य सरचिटणीसपदावर त्यांनी २००९ ते २०१५ पर्यंत जबाबदारी सांभाळली. पूर्व मतदारसंघातून १९ ऑक्टोबर २०१४ रोजी ते आमदार म्हणून विजयी झाले. १६ जून २०१९ रोजी त्यांना राज्य मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा ९ ऑगस्ट २०२२ रोजी ते कॅबिनेट मंत्री झाले.

टॅग्स :Atul Saveअतुल सावेAurangabadऔरंगाबादCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार