शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेचा रणसंग्राम; छत्रपती संभाजीनगरात प्रथमच भाजप-शिवसेना आमनेसामने

By शांतीलाल गायकवाड | Updated: February 13, 2024 11:11 IST

औरंगाबाद लोकसभा प्रथमच लढणार भाजप; उद्धव ठाकरेंनी ठोकले शड्डू, आता देशाचे गृहमंत्री येणार 

छत्रपती संभाजीनगर : देशात निवडणुका सुरू झाल्यानंतर प्रथमच भारतीय जनता पक्ष औरंगाबादलोकसभा मतदारसंघातून प्रत्यक्ष लढणार, असे जवळजवळ निश्चित झाले आहे. गेल्या निवडणुकीपर्यंतचा युतीतील भाजपचा जिवलग मित्र व विद्यमान कट्टर विरोधक शिवसेना (उबाठा) यांच्यात ही लक्षवेधी झुंज होईल, असे दिसते.

शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जिल्ह्यात जनसंवाद साधत लोकसभेचे रणशिंग फुंकले. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे चाणक्य, देशाचे गृहमंत्री अमित शाह गुरुवारी शहरात जाहीर सभेला संबोधित करून भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. गेली २५ वर्षे युतीत सोबत राहून अनेक देदीप्यमान विजय मिळविणारे भाजप व शिवसेना आता कट्टर विरोधक म्हणून आमनेसामने येणार असून, जनता कोणाच्या बाजूने उभी राहते, तेही स्पष्ट होईल.

१७ निवडणुकांत सात खासदार काँग्रेसचेलोकसभेची व देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ मध्ये झाली व अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे सुरेशचंद्र आर्य हे औरंगाबादचे पहिले खासदार झाले. त्यानंतर १९७७ पर्यंत सलग पाच वेळा काँग्रेस उमेदवाराने हा मतदारसंघ राखला. त्यात अनुक्रमे स्वामी रामानंद तीर्थ, बी. डी. देशमुख (दोन वेळेस) व माणिकदादा पालोदकर हे खासदार झाले. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये जनता दलाचे बापू काळदाते हे विजयी झाले. त्यानंतर तीन वर्षांतच पुन्हा निवडणुका होऊन पुन्हा काँग्रेसचे काझी सलिम विजयी झाले. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवारांच्या एस काँग्रेसचे साहेबराव पाटील यांनी १९८५ मध्ये ही जागा काँग्रेसकडून हिसकावली. विशेष म्हणजे तेव्हा राजीव गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात काँग्रेसने ४००हून अधिक जागा जिंकल्या होत्या.

युती झाली व काँग्रेस गारठली१९८५ नंतर शिवसेना व भाजपची युती झाली व काँग्रेस निवडणुकीत पराभूत होऊ लागली. नवव्या लोकसभेत प्रथमच युती पुरस्कृत अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे लोकसभेत पोहोचले. दहाव्या लोकसभेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा सावे विजयी झाले. युतीने ११ व्या लोकसभेत प्रदीप जैस्वाल यांना पाठविले. १९९८ मध्ये काँग्रेसचे रामकृष्ण बाबा यांनी जैस्वालांचा पराभव केला. पुन्हा वर्षभरात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रथमच चंद्रकांत खैरे लोकसभेत गेले. ते सतत चार वेळेस खासदार राहिले. २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला व एमआयएमचे इ्म्तियाज जलिल विजयी झाले.

जनसंघाने दोनदा आजमावले नशीबऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून जनसंघाने दोनदा नशीब आजमावले. परंतु, त्यांच्या पदरी अपयशच आले. लोकसभेच्या चौथ्या निवडणुकीत (१९६७) जनसंघाने बी. गंगाधर यांना उमेदवारी दिली. तेव्हा काँग्रेसचे उमेदवार होते भाऊसाव (बी.डी.) देशमुख. बी. गंगाधर यांना तिसऱ्या क्रमांकाची ३७८८३ मते मिळाली. देशमुख यांनी ५५.८२ टक्के (१,३५,८६५) मते घेत विजय संपादन केला, तर दुसऱ्या क्रमांकावर एस.जी. सरदेसाई (५२४०१) होते. लोकसभेची पाचवी निवडणूकही जनसंघाने लढविली होती. इंदिरा गांधी यांनी तेव्हा गरिबी हटावचा लोकप्रिय नारा दिला होता. या नाऱ्यावर काँग्रेसचे माणिकदादा पालोदकरांनी १ लाख ९४ हजार ९२६ मते घेत दणदणीत विजय प्राप्त केला. त्यांचे प्रतिस्पर्धी जनसंघाचे उमेदवार रामभाऊ एकनाथ गावंडे हे ४७ हजार १५ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक