शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लोकसभेचा रणसंग्राम; छत्रपती संभाजीनगरात प्रथमच भाजप-शिवसेना आमनेसामने

By शांतीलाल गायकवाड | Updated: February 13, 2024 11:11 IST

औरंगाबाद लोकसभा प्रथमच लढणार भाजप; उद्धव ठाकरेंनी ठोकले शड्डू, आता देशाचे गृहमंत्री येणार 

छत्रपती संभाजीनगर : देशात निवडणुका सुरू झाल्यानंतर प्रथमच भारतीय जनता पक्ष औरंगाबादलोकसभा मतदारसंघातून प्रत्यक्ष लढणार, असे जवळजवळ निश्चित झाले आहे. गेल्या निवडणुकीपर्यंतचा युतीतील भाजपचा जिवलग मित्र व विद्यमान कट्टर विरोधक शिवसेना (उबाठा) यांच्यात ही लक्षवेधी झुंज होईल, असे दिसते.

शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जिल्ह्यात जनसंवाद साधत लोकसभेचे रणशिंग फुंकले. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे चाणक्य, देशाचे गृहमंत्री अमित शाह गुरुवारी शहरात जाहीर सभेला संबोधित करून भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. गेली २५ वर्षे युतीत सोबत राहून अनेक देदीप्यमान विजय मिळविणारे भाजप व शिवसेना आता कट्टर विरोधक म्हणून आमनेसामने येणार असून, जनता कोणाच्या बाजूने उभी राहते, तेही स्पष्ट होईल.

१७ निवडणुकांत सात खासदार काँग्रेसचेलोकसभेची व देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ मध्ये झाली व अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे सुरेशचंद्र आर्य हे औरंगाबादचे पहिले खासदार झाले. त्यानंतर १९७७ पर्यंत सलग पाच वेळा काँग्रेस उमेदवाराने हा मतदारसंघ राखला. त्यात अनुक्रमे स्वामी रामानंद तीर्थ, बी. डी. देशमुख (दोन वेळेस) व माणिकदादा पालोदकर हे खासदार झाले. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये जनता दलाचे बापू काळदाते हे विजयी झाले. त्यानंतर तीन वर्षांतच पुन्हा निवडणुका होऊन पुन्हा काँग्रेसचे काझी सलिम विजयी झाले. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवारांच्या एस काँग्रेसचे साहेबराव पाटील यांनी १९८५ मध्ये ही जागा काँग्रेसकडून हिसकावली. विशेष म्हणजे तेव्हा राजीव गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात काँग्रेसने ४००हून अधिक जागा जिंकल्या होत्या.

युती झाली व काँग्रेस गारठली१९८५ नंतर शिवसेना व भाजपची युती झाली व काँग्रेस निवडणुकीत पराभूत होऊ लागली. नवव्या लोकसभेत प्रथमच युती पुरस्कृत अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे लोकसभेत पोहोचले. दहाव्या लोकसभेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा सावे विजयी झाले. युतीने ११ व्या लोकसभेत प्रदीप जैस्वाल यांना पाठविले. १९९८ मध्ये काँग्रेसचे रामकृष्ण बाबा यांनी जैस्वालांचा पराभव केला. पुन्हा वर्षभरात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रथमच चंद्रकांत खैरे लोकसभेत गेले. ते सतत चार वेळेस खासदार राहिले. २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला व एमआयएमचे इ्म्तियाज जलिल विजयी झाले.

जनसंघाने दोनदा आजमावले नशीबऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून जनसंघाने दोनदा नशीब आजमावले. परंतु, त्यांच्या पदरी अपयशच आले. लोकसभेच्या चौथ्या निवडणुकीत (१९६७) जनसंघाने बी. गंगाधर यांना उमेदवारी दिली. तेव्हा काँग्रेसचे उमेदवार होते भाऊसाव (बी.डी.) देशमुख. बी. गंगाधर यांना तिसऱ्या क्रमांकाची ३७८८३ मते मिळाली. देशमुख यांनी ५५.८२ टक्के (१,३५,८६५) मते घेत विजय संपादन केला, तर दुसऱ्या क्रमांकावर एस.जी. सरदेसाई (५२४०१) होते. लोकसभेची पाचवी निवडणूकही जनसंघाने लढविली होती. इंदिरा गांधी यांनी तेव्हा गरिबी हटावचा लोकप्रिय नारा दिला होता. या नाऱ्यावर काँग्रेसचे माणिकदादा पालोदकरांनी १ लाख ९४ हजार ९२६ मते घेत दणदणीत विजय प्राप्त केला. त्यांचे प्रतिस्पर्धी जनसंघाचे उमेदवार रामभाऊ एकनाथ गावंडे हे ४७ हजार १५ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक