शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

कार्यकर्त्यांचा प्रखर विरोध आणि दुसरीकडे सत्तारांना दिलेला शब्द या पेचात अडकले दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 17:03 IST

राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो

ठळक मुद्देनाराज कार्यकर्त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा प्रयत्न आमदार सत्तार हे लवकरच भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा

भोकरदन (जि. जालना) :  राजकारणात चढ-उतार सुरूच असतात. राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू आणि मित्र नसतो, अशी सांगत नाराज कार्यकर्त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आ.अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर नवीनच धर्मसंकट उभे ठाकले आहे. खुद्द सिल्लोडच्याच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्तारांना प्रखर विरोध आणि दुसरीकडे सत्तारांना दिलेला शब्द, अशा पेचात दानवे अडकले आहेत. सिल्लोडच्या भाजप कार्यकर्त्यांनी भोकरदनला दानवे यांची भेट घेऊन आपल्या तीव्र भावना त्यांच्या कानी घातल्या. यापूर्वी सत्तार यांनी भाजप तसेच तुमच्या विरोधात राळ उठविली होती. ही बाब विसरून चालणार नाही, याचे स्मरण कार्यकर्त्यांनी दानवेंना करून दिले.  तुमची इच्छाच असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुम्हाला सोबत घेऊन चर्चा करतो, असे आश्वासन दानवेंनी नाराजांना दिले.

भाजपचे शिष्टमंडळ भोकरदनलाआमदार सत्तार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली अगदी लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गाठी-भेटी अलीकडेच घेतल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये म्हणून सिल्लोड येथे मेळावा घेऊन विरोधही केला होता. त्यानंतर बुधवारी दुपारी १२ वाजेदरम्यान सिल्लोड येथील माजी आमदार सांडू लोखंडे, सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोठे, इद्रिस मुलतानी, अशोक गरूड, सुनील मिरकर, विनोद मंडलेचा, गजानन राऊत यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने भोकरदनला दानवे यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.