शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

दहशतवादी भुल्लरच्या पॅरोलवर बिट्टांची नाराजी

By admin | Updated: April 26, 2016 00:12 IST

औरंगाबाद : दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी देवेंदर पालसिंह भुल्लर याला पॅरोलवर सोडण्याच्या निर्णयावर आॅल इंडिया अ‍ॅन्टी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

औरंगाबाद : दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी देवेंदर पालसिंह भुल्लर याला पॅरोलवर सोडण्याच्या निर्णयावर आॅल इंडिया अ‍ॅन्टी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भुल्लरसारख्या दहशतवाद्यांवर केवळ व्होट बँकेसाठीच दया दाखविली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बॉम्बगोळ्यांच्या दहशतवादापुढे हार मानली नाही; परंतु आता राजकीय दहशतवादापुढे मात्र आपण पराभूत झालो आहोत, असेही ते म्हणाले. खाजगी कामासाठी शहरात आलेल्या बिट्टा यांनी सोमवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. खलिस्तान लिबरेशन फोर्सच्या दहशतवाद्यांनी १९९३ साली दिल्लीत बिट्टा यांना लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता आणि बिट्टा यांच्यासह ३१ जण जखमी झाले होते. या हल्ल्यातील आरोपी देवेंदर पालसिंह भुल्लर यांना दोन दिवसांपूर्वीच पॅरोलवर सोडण्यात आले. हा निर्णय पंजाबातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व्होट बँकेच्या राजकारणापायीच घेतला असल्याचा आरोप बिट्टा यांनी केला. बिट्टा म्हणाले, २००१ साली भुल्लरला टाडा कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली; परंतु कपिल सिब्बल आणि तुलसी यांनी सर्वोच्च न्यायालयातून भुल्लरची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित केली. त्याच्या बदल्यात काँग्रेसने सिब्बल यांना मंत्रीपदाचे आणि तुलसी यांना खासदारकीचे बक्षीस दिले. दिल्लीतील केजरीवाल सरकारनेही सत्तेत आल्यापासून भुल्लरला वाचविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.बिट्टा ज्या हॉटेलात थांबले होते, तेथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दहशतवाद्यांपासून जिवाला धोका असल्यामुळे बिट्टा यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केलेली आहे. त्यामुळे प्रवासासाठी बुलेटप्रूफ गाडी, दिमतीला ३६ शस्त्रधारी कमांडो व पोलिसांचाही फौजफाटा होता.