शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बिरबल आणि गेंड्याची कातडी

By admin | Updated: September 7, 2016 00:39 IST

गेंड्याची कातडी निबर असते. त्याला सहसा जखम होत नाही. चिखल, दलदलित तो राहत असल्याने अशा कठीण कातडीची त्याला जन्मजात देणगी आहे.

गेंड्याची कातडी निबर असते. त्याला सहसा जखम होत नाही. चिखल, दलदलित तो राहत असल्याने अशा कठीण कातडीची त्याला जन्मजात देणगी आहे. मग तो एक शिंगीगेंडा असो की दोन शिंगांचा. माणूसही प्रसंग, परिस्थितीनुसार गेंड्याची कातडी पांघरतो. तर या गेंडापुराणाचे कारण म्हणजे औरंगाबाद महापालिकेत यावरून गदारोळ झाला. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांचा उल्लेख गेंड्यांच्या कातडीचे असा केला आणि आंतरिक संवेदनेने हेलावलेल्या अधिकाऱ्यांनी खड्ड्यांसाठी बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेतून बर्हिगमन केले. शहरातील खड्ड्यांमुळे संवेदनांचे कोंब फुटलेल्या नगरसेवकांचा हा आरोपच एवढा अनकुचीदार होता की, नगरसेवकांनी म्हटलेल्या गेंड्याच्या कातडीचा वेध घेत अधिकारी घायाळ झाले. काय हा प्रसंग. खड्डे हेच आपले प्राक्तन मानणाऱ्या औरंगाबादकरांच्या नशिबी आला. यापेक्षा खड्ड्यात सुखेनैव राहण्याची सवय केलेली बरी. तरी बरे, ज्या सभागृहात हे घडले ते तिथल्या भिंती, छतासाठी नवीन नव्हते. याच सभागृहाने नगरसेवकांनी पूर्वीच्या आयुक्तांवर ‘निकम्मा’, ‘जातीयवादी’, ‘ढिम्म’, ‘अकार्यक्षम’ अशा शब्दांमध्ये केलेली संभावना विसरलेली नाही. त्यात गेंड्याची कातडी हा शब्द तर गुळगुळीत झाला आहे. आयुक्त बकोरियांच्या जाणिवा अजून बोथट झाल्या नाहीत असेच आपण समजायचे. खरे म्हणजे कायद्याने दिलेले अधिकार आणि तांत्रिक ज्ञानाच्या आयुधांचा वापर करून या सर्वांना नामोहरम करणे त्यांना अवघड नव्हते. कारण तांत्रिक बाबींचा आधार घेत कोणी गेंड्याची कातडी पांघरूण त्यावर झुळझुळीत रेशमी उपरणे पांघरले आहे. याचा ते ‘उपरणे फाश’ करू शकले असते पण त्यापेक्षा त्यांनी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले.शहरांचा खड्ड्यांच्या इतिहासाकडे जरा नजर टाकली तर औरंगाबादकरांना आता चांगल्या गुळगुळीत रस्त्यावरून वावरण्याची सवय राहिली नाही. नटीचा गाल आणि गुळगुळीत रस्ता, असे समीकरण मांडले जाते म्हणून औरंगाबादकर आता रस्त्यावरील गड्ड्यांपेक्षा नटीच्या गालांवरील खळ्याच पाहण्यात धन्यता मानतात. शहराच्या ११५ वॉर्डात १३०० कि.मी. रस्ते आहेत. यापैकी २१ कि.मी. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या खात्याच्या नियमानुसार १ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी खर्च येतो म्हणजे शहर गुळगुळीत करायचे तर १३०० कोटी खर्च आणि एवढा पैसा आणणार कोठून? २०१३ मध्ये व्हाईट टॅपिंगचे तंत्रज्ञान शहरात आले, त्यात १२५ कोटी रुपयांची कामे झाली, तर तीनच वर्षांत रस्ते खराब झाले कसे. कर्मचारी, शाखा अभियंते यांना आरोपींच्या कडघऱ्यात उभे करण्यास नगरसेवक का धजावले नाही? भूमिगत गटार योजनेची कामे शहरात चालू असल्याने रस्ते उखडले, पण हे रस्ते पूर्ववत व्यवस्थित करून देण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असताना ती कामे नगरसेवक का करवून घेत नाहीत. ७ वर्षाच्या आत रस्ता खराब झाला तो पुन्हा दुरुस्त करून देण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असते, पण महापालिकेच्या रस्त्याची मुदत ३ वर्षांचीच आहे. नगरसेवक ही मुदत किमान ५ वर्षांची का करीत नाहीत? बरे हे सर्व कंत्राटदार कोण आहेत? व्हाईट टॅपिंगची किती कामे झाली हे न उलगडणारे कोडे नगरसेवक का सोडवत नाहीत? रस्त्यांचा आणि त्यावरील खड्ड्यांचा इतिहास शोधताना सामान्य माणसांना असे अनेक प्रश्न पडतात त्याची उत्तरे मिळत नाहीत आणि शोधूनही सापडत नाहीत. आता प्रस्तावित विकास आराखड्यात आणखी १२५ कि.मी. नवीन रस्त्यांची भर पडणार आहे. गेंड्याला कातडीचे संरक्षण का असते याचा उलगडा सुरुवातीलाच केला, पण माणूस गेंड्याची कातडी का पांघरतो यावरही संशोधन झाले आहे. भ्रष्टाचार, गैरकारभार, अनैतिकतेचा चिखल आणि दलदलित सापडला की तो गेंड्याची कातडी पांघरतो. एकदा अकबराच्या दरबारात बहुरूपी बैलाचे सोंग घेऊन आला. त्याच्या अदाकारीने सारा दरबार स्तिमित झाला. बहुरुप्यावर स्तुतिसुमनांची उधळण सुरू होती, पण बिरबल या सर्वांकडे निर्विकारपणे पाहत होता. बादशहाने विचारले, ‘‘बिरबला तू एवढा अरसिक कसा? त्यावर बिरबल म्हणाला, याची परीक्षा घेतली पाहिजे. तुम्ही त्याच्या दिसण्यावर भाळला’’ असे म्हणत बिरबलाने एक खडा त्या बैलरूपी बहुरुप्याच्या पाठीवर मारला तर बहुरुप्याची कातडी थरारली. त्यावर बिरबलाने ‘बहोत खूब’ अशी दाद दिली. आता प्रश्न आहे औरंगाबादेत गेंड्याची कातडी नेमकी कोणी पांघरली? बरे, हे शोधण्यासाठी आमच्याकडे बिरबल आहे का? सुधसुधीर महाजन ाहाजनसुधीर महाजन