शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

बिरबल आणि गेंड्याची कातडी

By admin | Updated: September 7, 2016 00:39 IST

गेंड्याची कातडी निबर असते. त्याला सहसा जखम होत नाही. चिखल, दलदलित तो राहत असल्याने अशा कठीण कातडीची त्याला जन्मजात देणगी आहे.

गेंड्याची कातडी निबर असते. त्याला सहसा जखम होत नाही. चिखल, दलदलित तो राहत असल्याने अशा कठीण कातडीची त्याला जन्मजात देणगी आहे. मग तो एक शिंगीगेंडा असो की दोन शिंगांचा. माणूसही प्रसंग, परिस्थितीनुसार गेंड्याची कातडी पांघरतो. तर या गेंडापुराणाचे कारण म्हणजे औरंगाबाद महापालिकेत यावरून गदारोळ झाला. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांचा उल्लेख गेंड्यांच्या कातडीचे असा केला आणि आंतरिक संवेदनेने हेलावलेल्या अधिकाऱ्यांनी खड्ड्यांसाठी बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेतून बर्हिगमन केले. शहरातील खड्ड्यांमुळे संवेदनांचे कोंब फुटलेल्या नगरसेवकांचा हा आरोपच एवढा अनकुचीदार होता की, नगरसेवकांनी म्हटलेल्या गेंड्याच्या कातडीचा वेध घेत अधिकारी घायाळ झाले. काय हा प्रसंग. खड्डे हेच आपले प्राक्तन मानणाऱ्या औरंगाबादकरांच्या नशिबी आला. यापेक्षा खड्ड्यात सुखेनैव राहण्याची सवय केलेली बरी. तरी बरे, ज्या सभागृहात हे घडले ते तिथल्या भिंती, छतासाठी नवीन नव्हते. याच सभागृहाने नगरसेवकांनी पूर्वीच्या आयुक्तांवर ‘निकम्मा’, ‘जातीयवादी’, ‘ढिम्म’, ‘अकार्यक्षम’ अशा शब्दांमध्ये केलेली संभावना विसरलेली नाही. त्यात गेंड्याची कातडी हा शब्द तर गुळगुळीत झाला आहे. आयुक्त बकोरियांच्या जाणिवा अजून बोथट झाल्या नाहीत असेच आपण समजायचे. खरे म्हणजे कायद्याने दिलेले अधिकार आणि तांत्रिक ज्ञानाच्या आयुधांचा वापर करून या सर्वांना नामोहरम करणे त्यांना अवघड नव्हते. कारण तांत्रिक बाबींचा आधार घेत कोणी गेंड्याची कातडी पांघरूण त्यावर झुळझुळीत रेशमी उपरणे पांघरले आहे. याचा ते ‘उपरणे फाश’ करू शकले असते पण त्यापेक्षा त्यांनी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले.शहरांचा खड्ड्यांच्या इतिहासाकडे जरा नजर टाकली तर औरंगाबादकरांना आता चांगल्या गुळगुळीत रस्त्यावरून वावरण्याची सवय राहिली नाही. नटीचा गाल आणि गुळगुळीत रस्ता, असे समीकरण मांडले जाते म्हणून औरंगाबादकर आता रस्त्यावरील गड्ड्यांपेक्षा नटीच्या गालांवरील खळ्याच पाहण्यात धन्यता मानतात. शहराच्या ११५ वॉर्डात १३०० कि.मी. रस्ते आहेत. यापैकी २१ कि.मी. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या खात्याच्या नियमानुसार १ कि.मी. रस्त्यासाठी १ कोटी खर्च येतो म्हणजे शहर गुळगुळीत करायचे तर १३०० कोटी खर्च आणि एवढा पैसा आणणार कोठून? २०१३ मध्ये व्हाईट टॅपिंगचे तंत्रज्ञान शहरात आले, त्यात १२५ कोटी रुपयांची कामे झाली, तर तीनच वर्षांत रस्ते खराब झाले कसे. कर्मचारी, शाखा अभियंते यांना आरोपींच्या कडघऱ्यात उभे करण्यास नगरसेवक का धजावले नाही? भूमिगत गटार योजनेची कामे शहरात चालू असल्याने रस्ते उखडले, पण हे रस्ते पूर्ववत व्यवस्थित करून देण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असताना ती कामे नगरसेवक का करवून घेत नाहीत. ७ वर्षाच्या आत रस्ता खराब झाला तो पुन्हा दुरुस्त करून देण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असते, पण महापालिकेच्या रस्त्याची मुदत ३ वर्षांचीच आहे. नगरसेवक ही मुदत किमान ५ वर्षांची का करीत नाहीत? बरे हे सर्व कंत्राटदार कोण आहेत? व्हाईट टॅपिंगची किती कामे झाली हे न उलगडणारे कोडे नगरसेवक का सोडवत नाहीत? रस्त्यांचा आणि त्यावरील खड्ड्यांचा इतिहास शोधताना सामान्य माणसांना असे अनेक प्रश्न पडतात त्याची उत्तरे मिळत नाहीत आणि शोधूनही सापडत नाहीत. आता प्रस्तावित विकास आराखड्यात आणखी १२५ कि.मी. नवीन रस्त्यांची भर पडणार आहे. गेंड्याला कातडीचे संरक्षण का असते याचा उलगडा सुरुवातीलाच केला, पण माणूस गेंड्याची कातडी का पांघरतो यावरही संशोधन झाले आहे. भ्रष्टाचार, गैरकारभार, अनैतिकतेचा चिखल आणि दलदलित सापडला की तो गेंड्याची कातडी पांघरतो. एकदा अकबराच्या दरबारात बहुरूपी बैलाचे सोंग घेऊन आला. त्याच्या अदाकारीने सारा दरबार स्तिमित झाला. बहुरुप्यावर स्तुतिसुमनांची उधळण सुरू होती, पण बिरबल या सर्वांकडे निर्विकारपणे पाहत होता. बादशहाने विचारले, ‘‘बिरबला तू एवढा अरसिक कसा? त्यावर बिरबल म्हणाला, याची परीक्षा घेतली पाहिजे. तुम्ही त्याच्या दिसण्यावर भाळला’’ असे म्हणत बिरबलाने एक खडा त्या बैलरूपी बहुरुप्याच्या पाठीवर मारला तर बहुरुप्याची कातडी थरारली. त्यावर बिरबलाने ‘बहोत खूब’ अशी दाद दिली. आता प्रश्न आहे औरंगाबादेत गेंड्याची कातडी नेमकी कोणी पांघरली? बरे, हे शोधण्यासाठी आमच्याकडे बिरबल आहे का? सुधसुधीर महाजन ाहाजनसुधीर महाजन