शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

अतिवृष्टीने गेल्या चार वर्षांत कोट्यवधींचे नुकसान, दुरुस्तीला फुटकी कवडी मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:02 IST

--- जिल्हा परिषद : ग्रामीण रस्ते, पुलांची दुरवस्था, दुरुस्तीसाठी २३१ कोटींची मागणी --- औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ...

---

जिल्हा परिषद : ग्रामीण रस्ते, पुलांची दुरवस्था, दुरुस्तीसाठी २३१ कोटींची मागणी

---

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत अतिवृष्टी, पुरामुळे रस्ते, पूल वाहून गेले. अनेक गावांचा संपर्क तुटला. रस्त्यांची चाळणी झाली. जिल्हा परिषदेकडून दरवेळी केवळ दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली. युती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही शासनकाळात एकही रुपया दुरुस्तीसाठी न मिळाल्याने अद्याप गावक-यांची शहराकडे येणारी वाट बिकटच आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ३५४ रस्त्यांची ८९७.१३ किलोमीटरची रस्त्यांचे तर ३५५ नळकांडी पुलांचे नुकसान झाले. रस्ते दुरुस्तीसाठी ९५.०५ कोटी तर पुलांसाठी ३०.०८ कोटींचा अंदाजित खर्च लागणार आहे. तर ६१ नव्या पुलांची बांधणी गरजेची असून त्यासाठी २.९५ कोटींचा खर्च अपेक्षित असून असा ७७० पुनर्बांधणीसाठी १२८ कोटी ५९ लाख ३० हजार रुपयांचा खर्च लागणार आहे. अतिवृष्टीमुळे ३५१ रस्ते आणि ४०५ पूल नादुरुस्त झाले आहेत. त्यासाठी १२७ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी केली होती. तर सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ मध्ये जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, कन्नड, सिल्लोड व सोयगाव या तालुक्यांतील ९९ रस्ते पूल नादुरुस्त झाले होते. त्यासाठी २७ कोटी ७६ लाख १० हजार रुपयांची मागणी ग्रामविकास विभागाकडे करण्यात आली होती. मात्र, त्यासाठी अद्याप कोणताही निधी मिळाला नाही.

---

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांची चाळणी

---

यावर्षी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जिल्हा आणि ग्रामरस्ते यांचे ६ हजार ६५५ किलोमीटरपैकी ६४३ किलोमीटर रस्त्यांचे २११ कोटी ४७ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, तातडीने रस्ते दुरुस्तीसाठी ९ कोटी ६४ लाख रुपये लागणार आहे. तर पूल व रस्ते दुरुस्तीसाठी २३१ कोटींची मागणी करण्यात आली असून ग्रामीण भागात ३० ते ३५ गावांतील संपर्क तुटल्याने निधी मिळणे गरजेचे आहे.

--

सरकार बदलले परिस्थिती सारखीच

---

भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना जिल्हा परिषदेला अतिवृष्टीच्या नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी एकही रुपया निधी मिळाला नाही. गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ टक्के निधीचा शासन आदेश निघाला मात्र, तो पर्यंत सर्व नियोजन व वाटप झालेले होते. यावर्षी पुन्हा नुकसान झाले. त्याची पाहणी करुन दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे. असे कार्यकारी अभियंता अहेमद जफर काझी यांनी सांगितले.

---

अतिवृष्टीमुळे २०२०-२१ मध्ये २१३ सिंचन प्रकल्पांचे जिल्ह्यात नुकसान झाले. त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून दुरुस्तीसाठी ३५.८९ कोटींची मागणी केली होती. त्यापैकी आतापर्यंत १९.५८ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. जिल्हा परिषदेचा सिंचन विभाग सक्षम असताना ती दुरुस्तीची कामे मृद व जलसंधारण (स्थानिक स्थर) कडे वर्ग करण्यात आली. त्याशिवाय इतर मागणीनुसार शासनाने कोणताही निधी दिला नाही.

-मीना शेळके, अध्यक्ष, जिल्हा परिषद औरंगाबाद

---

गेल्या चार वर्षांत अतिवृष्टीतून रस्ते पुलांच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने वेळोवेळी आवश्यक निधीची मागणी केली. मात्र, गेल्या चार वर्षांत एकही रुपया निधी मिळाला नाही. ग्रामीण भागातील रस्ते व पुलांच्या दुरवस्थेमुळे दळणवळणावर परिणाम होत असून २३१ कोटींची मागणी पुन्हा करण्यात आली आहे.

-किशोर बलांडे, बांधकाम व अर्थ सभापती, जिल्हा परिषद, औरंगाबाद