शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रीडिंगनंतर तीन दिवसांत बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:58 IST

औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत घरगुती, वाणिज्य, कृषिपंप व औद्योगिक असे सर्व मिळून ११ लाख ५० हजार वीज ग्राहक आहेत. त्यांना आता मीटर रीडिंग घेतल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत वीज बिल मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत घरगुती, वाणिज्य, कृषिपंप व औद्योगिक असे सर्व मिळून ११ लाख ५० हजार वीज ग्राहक आहेत. त्यांना आता मीटर रीडिंग घेतल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत वीज बिल मिळणार आहे. त्यासाठी महावितरणने वीज बिलांची छपाई ते वितरण व्यवस्था ही केंद्रीय वीज बिल प्रणाली आत्मसात केली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना आपले वीज बिल वेळेवर भरता येईल.महावितरणला सध्या वीज बिल छपाई ते वितरणासाठी ७ ते ८ दिवस लागतात. अनेकदा ग्राहकांना बिले उशिरा मिळतात. परिणामी, वीज बिल भरण्यास उशीर होतो. त्यामुळे त्यांना सवलतींचा लाभ मिळत नाही. आतापर्यंत वीज बिल छपाई व वितरण वेगवेगळ्या एजन्सीमार्फत केले जात होते. त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नव्हते. या अडचणींवर मात करून वीज बिल वेळीच देण्यासाठी महावितरणने केंद्रीय वीज बिल प्रणाली अवलंबिली आहे.मोबाईल अ‍ॅप हे थेट महावितरणच्या सर्व्हरला जोडले आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारे घेतलेली रीडिंग थेट सर्व्हरवर जाईल. सर्व्हरवर अंतिम बिल तयार होईल. ही सर्व प्रक्रिया अतिजलद होईल. तयार बिले एजन्सीकडे वितरणासाठी २४ तासांच्या आत पाठविले जाईल. एजन्सी पुढे २४ तासांत शहरी तर ग्रामीण भागात ७२ तासांत बिले वितरित करील.ग्राहकांना मिळेल अचूक बिलकेंद्रीय वीज बिल वितरण प्रणाली अमलात आणणारी महावितरण ही कंपनी देशातील एकमेव आहे, असा दावा मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केला आहे. कमीत कमी मानवी हस्तक्षेप असल्यामुळे ग्राहकांना अचूक वीज बिल मिळेल. वीज बिल भरणा केंद्रातील रांगा कमी होतील. ग्राहक सेवा गुणवत्तेत मोठी वाढ होईल.वसुली कार्यक्षमतेत वाढ व थकबाकीत घट, उपलब्ध मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन, बिलिंग, छपाई व वितरण खर्चात मोठी बचत, संपूर्ण व्यवस्थेवर केंद्रीय स्तरावरून नियंत्रण, बिलिंग तक्रारीच्या प्रमाणात घट व संपूर्ण बिलिंग व्यवस्थेवर माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने नियंत्रण, आदी फायदे होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल