शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

वर्षअखेरीस आॅरिकमध्ये येणार मोठा उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:59 IST

सरत्या वर्षअखेरपर्यंत औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिपमध्ये मोठा उद्योग येणार असल्याचा दावा दिल्ली, मुंबई, इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचे व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सरत्या वर्षअखेरपर्यंत औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिपमध्ये (आॅरिक) मोठा उद्योग येणार असल्याचा दावा दिल्ली, मुंबई, इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचे व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.येणारा उद्योग आॅटो, इलेक्ट्रिक, फूड अथवा अन्य उत्पादन क्षेत्राशी निगडित असेल; परंतु उद्योग येईल हे मात्र निश्चित, असेही त्यांनी स्पष्ट केले. किया मोटार्स का गेले हे माहिती नाही. शेवटी गुंतवणूकदारांची मर्जी असते. एलजीचा प्लांट नागपूरला जाण्यामागे पाणी हे मुख्य कारण आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तयार नसल्यामुळे उद्योग येत नाहीत, या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचा दावाही त्यांनी केला.‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र, इन्व्हेस्ट मराठवाडा’ या औद्योगिक गुंतवणूक परिषदेसाठी ते औरंगाबदेत आले होते. यावेळी उद्योजक ऋषी बागला, डीएमआयसीचे गजानन पाटील, सीआयआयचे निनाद करपे, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, रणजित कक्कड यांची उपस्थिती होती.विक्रमकुमार म्हणाले, आॅरिक काय आहे, हे बºयाच गुंतवणूकदारांना माहिती नाही. त्यामुळे देश व विदेशात मार्केटिंगवर फोकस करण्यात येणार आहे. सप्टेंबर २०१८ पर्यंत आॅरिकच्या प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण होईल. येणाºया वर्षभरात गुंतवणूकदारांच्या आॅरिकला भेटी वाढतील. पुणे, हरियाणा, गुडगावमध्ये आॅरिकमध्ये गुंतवणुकीच्या उद्देशाने रोड शो केले. इंडस्ट्रीयल सेक्टरशी निगडित ५०० संघटना आहेत. त्यांनाही आॅरिकच्या मार्केटिंगसाठी हाताशी धरले आहे. सीबीआयएईचे २२ हजार उद्योजक सदस्य आहेत. त्याचा फायदा आॅरिकमध्ये गुंतवणुकीसाठी होईल. हनीवेल या कंपनीला १४० कोटींचे कंत्राट आॅरिकमधील आयसीटीसाठी दिले आहे. तसेच शापूर्जी अ‍ॅण्ड पालनजीकडे प्रशासकीय इमारतीचे काम करीत असून, त्यांच्याकडे अंतर्गत रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी ४ वर्षांसाठी असेल, तोपर्यंत त्यांची काही रक्कम अदा करण्यात येणार नाही. हनीवेल ही कंपनीदेखील काम पूर्ण झाल्यावर ५ वर्षे देखभाल करील, असा दावा त्यांनी केला.