शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

भूमिपुत्रांच्या ‘एंट्री’ने दिग्गजांपुढे आव्हान

By admin | Updated: October 3, 2014 23:58 IST

पांडुरंग खराबे , मंठा मंठा-परतूर विधानसभा मतदार संघात निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून यावेळी मंठा तालुक्याचे भूमिपूत्र, उद्योजक सोमनाथ साखरे यांनी शिवसेनेकडून तर गायक प्रा. राजेश सरकटे

पांडुरंग खराबे , मंठा मंठा-परतूर विधानसभा मतदार संघात निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून यावेळी मंठा तालुक्याचे भूमिपूत्र, उद्योजक सोमनाथ साखरे यांनी शिवसेनेकडून तर गायक प्रा. राजेश सरकटे राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणूक आखाड्यात उतरले असल्याने प्रस्तापित मातब्बर पुढाऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.मंठा-परतूर विधानसभा निवडणुकीत गेल्या अनेक दशकांपासून मंठा तालुक्यातून प्रभावी पक्षाचा वजनदार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरला नव्हता. माजीमंत्री रामप्रसाद बोराडे, माजी आ. भगवानराव बोराडेनंतर विधानसभेचे नेतृत्व आजपर्यंत परतूर तालुक्याकडे असून यावेळी मात्र शिवसेनेकडून उद्योजक सोमनाथ साखरे तर राष्ट्रवादीकडून गायक प्रा. राजेश सरकटे निवडणूक रिंगणात उतरले असल्याने या मतदार संघातील दिग्गज कॉँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश जेथलिया, मनसेचे बाबासाहेब आकात, भाजपाचे बबनराव लोणीकर या तीनही अनुभवी दिग्गजांपुढे भूमिपूत्रांचे आव्हान उभे राहिले आहे.साखरे यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे. तर प्रा. सरकटे यांनी मातोश्री हंसादेवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली वर्षभर सामाजिक उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधले आहे.या निवडणुकीत विद्यमान आ. सुरेशकुमार जेथलिया कॉँग्रेसकडून विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असून त्याकडे विकासाबरोबरच मोठी कार्यकर्त्यांची फळी जमेची बाजू मानल्या जाते. तर मनसेचे उमेदवार बाबासाहेब आकात यांच्याकडे शिक्षण संस्थेचे जाळे, कार्यकर्त्यांचा फौजफाटा, सहकारी संस्था ताब्यात असल्याने त्यांना प्रबळदावेदार मानले जाते. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी दोनवेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करुन तळागाळापर्यंत पक्ष संघटन मजबुत करुन शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलने करुन दमदार नेतृत्व अशी छबी निर्माण केली असल्याने त्यांच्याकडे या जमेच्या बाजू आहेत. असे असले तरी गांधीजींचे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्याकडे चला, गड्या आपुला गाव बरा म्हणून कर्मभूमीकडून जन्मभूमीकडे नशिब अजमावणारे शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ साखरे, राष्ट्रवादीचे सरकटे मंठा-परतूर समृध्द करण्यासाठी राजकीय आखाड्यात उतरले आहेत.पूर्णवेळ राजकारण करणाऱ्या मातब्बरांशी हे कशी जुंज देणार, कोण बाजी मारणार, राजकीय डावपेच काय असणार याबाबत चर्चा रंगत आहेत. एकूणच नवखे व दिग्गज यांच्या लढतीकडे संपूर्ण मतदार संघाचे चित्र लागून आहे. ठिक ठिकाणी चर्चांना उधाण आले आहे.