शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बब्रूवान रुद्रकंठावार म्हणाले, उपहासाचे चीज झाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:19 IST

‘मी लिहीत असलेल्या उपहासाचे चीज झाले,’ अशी प्रांजळ प्रतिक्रिया बब्रूवान रुद्रकंठावार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. त्यांच्या ‘आदमी विदाऊट पार्टी’ या पुस्तकाला मराठी भाषा विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘मी लिहीत असलेल्या उपहासाचे चीज झाले,’ अशी प्रांजळ प्रतिक्रिया बब्रूवान रुद्रकंठावार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. त्यांच्या ‘आदमी विदाऊट पार्टी’ या पुस्तकाला मराठी भाषा विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर ते बोलत होते.

त्यांचे मूळ नाव धनंजय चिंचोलीकर. ‘बब्रूवान रुद्रकंठावार’ या नावाने त्यांनी १९९८ पासून लिहिण्यास सुरुवात केली. ‘पुन्यांदा चबढब’ हे सदर ते वर्तमानपत्रात लिहीत. पुढे याच नावे लेखांचे पुस्तक प्रकाशित झाले. राजकीय-सामाजिक विषयावरील उपहास आणि भाषेच्या पातळीवर केलेले विविध प्रयोग ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये आहेत. मराठी वाङ्मयातील वैशिष्ट्यपूर्ण असे उपहासगर्भ लेखन करणारा प्रयोगशील लेखक म्हणून बब्रूवान प्रसिद्ध आहेत. मराठी भाषेत इंग्रजी शब्दांचा अत्यंत खुबीने वापर करून स्वत:ची अशी एक आगळीवेगळी शैली त्यांनी घडविली आहे. सोशल मीडियावर ते सातत्याने लिखाण करतात.

‘बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी’, ‘टºर्या, डिंग्या आन् गळे’ ही पुस्तके, तर पत्रकारितेच्या क्षेत्रावरील ‘चौथ्या इस्टेटच्या बैलाला’ हे नाटक त्यांनी लिहिलेआहे. जनशक्ती वाचक चळवळ प्रकाशित ‘आदमी विदाऊट पार्टी’ हे त्यांचे पाचवे पुस्तक आहे. यामध्ये त्यांनी राजकीय, सामाजिक, वाङ्मय, पत्रकारिता अशा विविध विषयांवर उपहासाच्या अंगाने चर्चा केली आहे.

साहित्यिकांच्या लेखनाला पुरस्कारांमुळे मान्यता मिळतेमला वाङ्मय पुरस्कार जाहीर झाल्याचे ‘लोकमत’कडूनच कळले. लेखक, कवी आणि साहित्यिकांच्या लेखनाला अशा पुरस्कारांमुळे मान्यता मिळते आणि यातूनच त्यांना प्रेरणा मिळते. यापूर्वीही माझ्या आठ पुस्तकांना वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. - डॉ. जनार्दन वाघमारे

 

खूप आनंद वाटलापुरस्कार मिळाल्यामुळे ‘मातंग चळवळींचा इतिहास’ हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या पुस्तकात दलित महासंघ, लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ, अण्णाभाऊ साठे फाऊं डेशन अशा विविध संघटनांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. त्याला शासनाने पुरस्कार दिला, याचा खूप आनंद वाटला.- डॉ. सुरेश चौथाईवाले 

पुरस्कार उपेक्षित समाजातील मुलांना समर्पितबालनाटकांच्या विषयांमध्ये बदल होऊन ते समाजाभिमुख होणे आवश्यक आहे. उपेक्षित समाजातील मुलांचं भावविश्व रंगभूमीवर आलं पाहिजे. हा पुरस्कार उपेक्षित समाजातील प्रतिकूलतेशी संघर्ष करणाºया मुलांना समर्पित. बाल रंगभूमीने आपल्या परंपरागत, बालिश विषयातून बाहेर येणे आवश्यक आहे.- डॉ. सतीश साळुंके

 

केलेल्या कामाचा सन्मानशिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची सरकारने दखल घेतलेल्याचा आनंद आहे. जे काही अनुभव या क्षेत्रात काम करत असताना आले, ते मी शब्दबद्ध केले होते. ज्ञानरचनावाद हा उपक्रमसुद्धा मला यातूनच राबविणे शक्य झाले. साहित्यामध्ये मिळालेला पुरस्कार हा केलेल्या कामाचा सन्मान आहे.- डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त