शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

बब्रूवान रुद्रकंठावार म्हणाले, उपहासाचे चीज झाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:19 IST

‘मी लिहीत असलेल्या उपहासाचे चीज झाले,’ अशी प्रांजळ प्रतिक्रिया बब्रूवान रुद्रकंठावार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. त्यांच्या ‘आदमी विदाऊट पार्टी’ या पुस्तकाला मराठी भाषा विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘मी लिहीत असलेल्या उपहासाचे चीज झाले,’ अशी प्रांजळ प्रतिक्रिया बब्रूवान रुद्रकंठावार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. त्यांच्या ‘आदमी विदाऊट पार्टी’ या पुस्तकाला मराठी भाषा विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर ते बोलत होते.

त्यांचे मूळ नाव धनंजय चिंचोलीकर. ‘बब्रूवान रुद्रकंठावार’ या नावाने त्यांनी १९९८ पासून लिहिण्यास सुरुवात केली. ‘पुन्यांदा चबढब’ हे सदर ते वर्तमानपत्रात लिहीत. पुढे याच नावे लेखांचे पुस्तक प्रकाशित झाले. राजकीय-सामाजिक विषयावरील उपहास आणि भाषेच्या पातळीवर केलेले विविध प्रयोग ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये आहेत. मराठी वाङ्मयातील वैशिष्ट्यपूर्ण असे उपहासगर्भ लेखन करणारा प्रयोगशील लेखक म्हणून बब्रूवान प्रसिद्ध आहेत. मराठी भाषेत इंग्रजी शब्दांचा अत्यंत खुबीने वापर करून स्वत:ची अशी एक आगळीवेगळी शैली त्यांनी घडविली आहे. सोशल मीडियावर ते सातत्याने लिखाण करतात.

‘बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी’, ‘टºर्या, डिंग्या आन् गळे’ ही पुस्तके, तर पत्रकारितेच्या क्षेत्रावरील ‘चौथ्या इस्टेटच्या बैलाला’ हे नाटक त्यांनी लिहिलेआहे. जनशक्ती वाचक चळवळ प्रकाशित ‘आदमी विदाऊट पार्टी’ हे त्यांचे पाचवे पुस्तक आहे. यामध्ये त्यांनी राजकीय, सामाजिक, वाङ्मय, पत्रकारिता अशा विविध विषयांवर उपहासाच्या अंगाने चर्चा केली आहे.

साहित्यिकांच्या लेखनाला पुरस्कारांमुळे मान्यता मिळतेमला वाङ्मय पुरस्कार जाहीर झाल्याचे ‘लोकमत’कडूनच कळले. लेखक, कवी आणि साहित्यिकांच्या लेखनाला अशा पुरस्कारांमुळे मान्यता मिळते आणि यातूनच त्यांना प्रेरणा मिळते. यापूर्वीही माझ्या आठ पुस्तकांना वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. - डॉ. जनार्दन वाघमारे

 

खूप आनंद वाटलापुरस्कार मिळाल्यामुळे ‘मातंग चळवळींचा इतिहास’ हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या पुस्तकात दलित महासंघ, लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ, अण्णाभाऊ साठे फाऊं डेशन अशा विविध संघटनांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. त्याला शासनाने पुरस्कार दिला, याचा खूप आनंद वाटला.- डॉ. सुरेश चौथाईवाले 

पुरस्कार उपेक्षित समाजातील मुलांना समर्पितबालनाटकांच्या विषयांमध्ये बदल होऊन ते समाजाभिमुख होणे आवश्यक आहे. उपेक्षित समाजातील मुलांचं भावविश्व रंगभूमीवर आलं पाहिजे. हा पुरस्कार उपेक्षित समाजातील प्रतिकूलतेशी संघर्ष करणाºया मुलांना समर्पित. बाल रंगभूमीने आपल्या परंपरागत, बालिश विषयातून बाहेर येणे आवश्यक आहे.- डॉ. सतीश साळुंके

 

केलेल्या कामाचा सन्मानशिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची सरकारने दखल घेतलेल्याचा आनंद आहे. जे काही अनुभव या क्षेत्रात काम करत असताना आले, ते मी शब्दबद्ध केले होते. ज्ञानरचनावाद हा उपक्रमसुद्धा मला यातूनच राबविणे शक्य झाले. साहित्यामध्ये मिळालेला पुरस्कार हा केलेल्या कामाचा सन्मान आहे.- डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त