शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

भुजल पातळीत तब्बल २.१५ मीटरने घट

By admin | Updated: February 21, 2016 23:55 IST

बालासाहेब काळे, हिंगोली सततच्या अवर्षणाचा सामना करीत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारी अखेर भुजल पातळीत तब्बल २.१५ मीटरने घट झाली आहे.

बालासाहेब काळे, हिंगोलीसततच्या अवर्षणाचा सामना करीत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारी अखेर भुजल पातळीत तब्बल २.१५ मीटरने घट झाली आहे. येत्या महिनाभरात साधारणत: दीडशे गावांमध्ये जलसंकट अधिक गडद होणार असल्याची चिन्हे आहेत.भुजल सर्वेक्षण यंत्रणा विभागाने हिंगोली जिल्ह्याची पाणी पातळी मोजण्यासाठी ५५ विहिरी निश्चित केल्या आहेत. साधारणत: तीन महिन्याच्या अंतराने या निरीक्षण विहिरींतील पाण्याची पातळी वाढली किंवा कमी झाली आहे काय? हे पाहण्यासाठी जलपातळी मोजली जाते. सध्या ऊन वाढू लागल्याने फेब्रुवारीतच टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. जानेवारी अखेर भूजल सर्वेक्षण विभागाने निरीक्षण विहिरीतील पाणीपातळी मोजली असता जिल्ह्याच्या भुजल पातळीत सरासरी २.१५ मीटरने घट झाल्याचे दिसून आले. यात औंढा तालुक्याची पाणी पातळी २.३९ मी., वसमत तालुका- २.३५, हिंगोली तालुका- १.२०, कळमनुरी तालुका १.५७ आणि सेनगाव तालुक्याची पाणी पातळी २.१६ मीटरने खालावली आहे. यावर्षी हिंगोली व कळमनुरी तालुक्याच्या भूजल पातळीत प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. एप्रिल, मे महिन्यात ही पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता आहे. शिवाय यापुढे दोन महिन्याच्या कालावधीत नदी-नाले, विहिरी, तलाव कोरडे पडतात. यामागे जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने जवळपास १० गावांमध्ये जानेवारी अखेर टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. येलदरी धरणात ४६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सिद्धेश्वर धरणाचा जीवंत साठा संपला असून त्यात केवळ १६९.८९ दलघमी म्हणजे १८.९९ टक्के पाणी शिल्लक आहे. इसापूर धरणात १८३.०४ दलघमी पाणी उपलब्ध आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाणी पातळी तपासणीचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान सेनगाव तालुक्यातील ४५, औंढा तालुक्यातील ३०, हिंगोली तालुक्यातील २६, कळमनुरी तालुक्यातील २५ आणि वसमत तालुक्यातील २० गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.