शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

भीमा-कोरेगावच्या घटनेचे औरंगाबाद शहरात पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:45 IST

पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेली दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे सोमवारी दुपारपासून शहरात तीव्र पडसाद उमटले. शहराच्या विविध भागांत दलित समाजातील संतप्त कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करायला लावली. काही भागांत दगडफेकीच्या घटनाही घडल्या. तीन एसटी बसेसवर दगडफेक झाली. दुपारपासून सुरु झालेला हा तणाव रात्री आठ वाजेपर्यंत सुरु होता.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेली दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे सोमवारी दुपारपासून शहरात तीव्र पडसाद उमटले. शहराच्या विविध भागांत दलित समाजातील संतप्त कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करायला लावली. काही भागांत दगडफेकीच्या घटनाही घडल्या. तीन एसटी बसेसवर दगडफेक झाली. दुपारपासून सुरु झालेला हा तणाव रात्री आठ वाजेपर्यंत सुरु होता. या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाची मदत घेत शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. रात्रीच्या वेळी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.भीमा कोरेगावच्या घटनेची माहिती कळताच सुरुवातीला उस्मानपुरा आणि क्रांती चौक भागात दलित समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. यामुळे कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. याचवेळी उस्मानपुरा रोडवरील एका शोरुमवर दगड भिरकावल्याने शोरुमच्या प्रवेशद्वाराची काच फुटली. यानंतर हा जमाव उस्मानपुºयाकडे गेला. कार्यकर्त्यांनी उस्मानपुरा ते पीरबाजार रस्त्यावरील दुकाने बंद केली. याचेवळी त्रिमुर्ती चौकातही कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी परिसरातील दुकाने बंद करण्यास भाग पाडले. शहरातील घटनांची माहिती वेगाने पसरल्याने त्यानंतर मुकुंदवाडी, रामनगर, पैठणगेट रोड आदी भागांत व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली.जय भवानीनगर भागातही कार्र्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. याठिकाणी एका एटीएमवर दगडफेक झाली.टी.व्ही. सेंटर येथे सुमारे हजार लोकांचा जमाव रस्त्यावर आला. यावेळी तेथील होर्डिंग जमावाने पाडून टाकले. यानंतर जमाव भाजी मार्केटमध्ये घुसला. तेथील भाजीपाल्याची दुकाने आणि हातगाड्या उलट्या करून पुढे गेला. यामुळे लहान-मोठ्या दुकानदारांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. नक्षत्रवाडी, कांचनवाडी येथील दुकानांच्या काचा फोडण्यात आल्याने दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. मुकुंदवाडी, रामनगर येथील एका हॉस्पिटलवर दगडफेक करण्यात आली. सायंकाळपर्यंत या भागातील व्यवहार पूर्णपणी थंडावले.सायंकाळच्या वेळी कॅनॉट मार्केटमध्येही दुकाने (पान २ वर)१५ बसेस फोडल्याऔरंगाबादसह विविध ठिकाणी सोमवारी एसटी महामंडळाच्या १५ बसेसची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या. आमखास मैदानाजवळ जळगाव - वैजापूर बसच्या काचा फोडण्यात आल्या. यामध्ये वाहकाला मार लागला. टाऊन हॉल येथे तीन बसच्या तर हर्सूल येथे दोन बसच्या काचा फोडण्याचे प्रकार झाले. याबरोबरच क्रांतीचौक, अंबेलोहळ, सिल्लोड, डोंगरगाव फाटा याठिकाणी बसेसच्या काचा फोडण्याच्या घटना घडल्या. रात्री उशिरा कांचनवाडी येथे दोन मालवाहतूक ट्रक फोडले..अफवांवर विश्वास ठेवू नका -ढाकणेनागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी केले. शहराचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, एसआरपीएफची एक तुकडी शहरात तैनात करण्यात आली. सर्व पोलीस अधिकारी-कर्मचाºयांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहे.आंबेडकरी जनतेने संयम बाळगावाभीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी समाजावर झालेल्या दगडफेकीची घटना ही निषेधार्ह आहे. भीमा-कोरेगावपासून अहमदनगरपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी गाड्यांवर दगडफेक व जाळपोळ केली जात असताना पोलिसांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली. या घटनेचा रिपाइंच्या वतीने निषेध करतो. या घटनेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातही पडसाद उमटले. आंबेडकरी समाजाने संयम बाळगावा. शांततेच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेने या घटनेचा निषेध करावा, असे आवाहन रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी केले आहे.भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रा. अविनाश डोळस यांनी आंबेडकरी जनतेने संयम बाळगून या घटनेचा शांततेने निषेध करावा, असे आवाहन केले.माजी मंत्री गंगाधर गाडे यांनीही पीरबाजार परिसरात कार्यकर्त्यांसमोर बोलताना शांततेचे आवाहन केले.यासंदर्भात रमेशभाई खंडागळे, रिपाइंचे नेते दौलतदादा खरात, शहराध्यक्ष किशोर थोरात, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ आदींनी शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले.