शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पर्यटनासोबत भक्तीही; वेरुळातील कैलास लेणीत संपूर्ण रामायणाचे दर्शन

By संतोष हिरेमठ | Updated: January 22, 2024 14:15 IST

‘सियावर रामचंद्र की जय’!रामायणातील विविध प्रसंग कैलास लेणीत कोरण्यात आलेले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत श्रीरामांचे दर्शन घडते. हो... हो... भगवान श्रीरामांचे दर्शन, तेही हजारो वर्षे जुन्या वेरूळ लेणीत. कदाचित अनेकांना हे माहीत नसेल. वेरूळ लेणीत श्रीरामांच्या दर्शनाबरोबरच रामायणातील अनेक प्रसंग कोरण्यात आले आहेत. पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांची भक्तीही साधली जाते.

वेरूळची कैलास लेणी हे संपूर्ण जगाला पडलेले कोडे आहे. एकसंध खडकातून कोरण्यात आलेली ही लेणी पाहण्यासाठी देश- विदेशांतून दररोज हजारो पर्यटक लेणीत भेट देतात. कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे. वेरूळ लेणीमधील विविध प्रकारची शिल्पे पाहता या लेणीमध्ये संपूर्ण रामायण कोरलेले आहे. याठिकाणी भगवान श्रीरामांचे दर्शन घडते. कैलास मंदिरात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला रामायणातील विविध प्रसंग कोरण्यात आलेले आहेत.

रामायणातील कोणकोणते प्रसंग?राजा दशरथांच्या पाया पडून वनवासात जाण्याची परवानगी घेताना श्रीराम, लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापलेला प्रसंग, सीतेकडे भिक्षा मागताना रावण, सीता हरणाचा प्रसंग, जटायू आणि रावणातील युद्धाचा प्रसंग, वाली आणि सुग्रीव यांच्यातील युद्धाचा प्रसंग, लंकेकडे जाणारे हनुमान, रावणासमोर बसलेले हनुमान, अशोक वाटिकेत बसलेल्या सीतामाता, रावणाने उचललेला कैलास पर्वत इ. प्रसंग कैलास लेणीत कोरण्यात आलेले आहेत.

वेळ पडतो कमीरामायणातील विविध प्रसंग कैलास लेणीत कोरण्यात आलेले आहेत. हे प्रसंग जाणून घेण्यास पर्यटक जेवढा वेळ देतील, तेवढा कमीच आहे. त्याबरोबर लेणी क्र. १६ मध्ये शिवाची प्रार्थना करताना श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत.-विवेक पाठक, गाइड, वेरूळ लेणी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAyodhyaअयोध्याtourismपर्यटन