शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पैठण तालुक्यात विहिरी, बोअर घेण्याचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:12 IST

यंदाच्या दुष्काळाने पैठण तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. फळ बागांना पाणी कमी पडू नये, यासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी विहीर खोदकामांसह बोअर घेण्याचा जणू धडाका सुरू झाल्याने आहे ती पाणीपातळीही खालावत असल्याने चिंता वाढली आहे.

अंकुश वाघपैठण : यंदाच्या दुष्काळाने पैठण तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. फळ बागांना पाणी कमी पडू नये, यासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी विहीर खोदकामांसह बोअर घेण्याचा जणू धडाका सुरू झाल्याने आहे ती पाणीपातळीही खालावत असल्याने चिंता वाढली आहे.तालुक्यात ४०० ते ५०० फुटापर्यंत बोअर खोदले जात असल्याने जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे. तसेच नवीन विहीर खोदकामासह जुन्या विहिरीतसुध्दा आडवे बोअर मारण्यात येत आहेत. मोजक्या शिल्लक राहिलेल्या फळबागा वाचविण्साठी शेतकरी जीवाचे रान करत असल्याचे तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तालुक्यात मागील सलग बारा वर्षांपासून कमी प्रमाणात पाऊस पडू लागल्यामुळे म्हणावे तसे पाणी जमिनीत मुरले नाही. यंदा तर पावसाचे प्रमाण फारच नगण्य राहिल्याने याचा फटका खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकालाही बसला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे.पाणीपुरवठा योजनेवरही परिणामहिवाळ्यात जमिनीत ओलावा राहिला नाही तर आगामी उन्हाळ्याचा विचार न केलेला बरा. ऊस लागवड करणारे शेतकरी पुन्हा संकटात सापडून लागवड केलेला ऊस जगविण्यासाठी धडपड करत आहेत. गतवर्षी जेमतेम पाऊस झाल्यामुळे ऊस पिकासह, मोसंबी, डाळींबाची मोठ्या प्रमाणात लागवड वाढ झाली. जलयुक्त शिवाराचा मोठा गाजावाजा झाला अन् यशही आले. यावर उसाची लागवड शेतकऱ्यांनी केली. सलग पडलेल्या दुष्काळामुळे पाणीपातळीत प्रचंड घट झाल्याने ती झिजच भरून निघाली नाही. यावर्षी तर पावसाळा कधी आला, कधी संपला, हे कळलेच नाही. बागा सुकू लागल्याने त्यांना जगविण्यासाठी पुन्हा शेतकरी धडपड करत नवीन बोअर घेण्यासह विहिरी खोदण्याचा सपाटा लावत आहेत. परंतु चारशे ते पाचशे फूट खोल बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने दुहेरी खर्च करून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. बोअरवेलधारक खोलीची मर्यादा असलेले नियम धाब्यावर बसवून चार पाचशे फूट खोल बोअर बिनधास्त घालत असून यामुळे जमिनीची चाळणी होऊन धरणीचा समतोल बिघडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.आर्थिक सुबत्ता मिळवून देणारी पिके पावसाअभावी शेतकºयाच्या हातातून गेल्याने त्यांची आतापासूनच आर्थिक ओढाताण होण्यास सुरूवात झाली आहे. जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने याचा परिणाम पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे. तालुक्यातील आडूळ, बालानगर, चितेगाव, कडेठाण, पारुंडी येथील ग्रामस्थांना बाराही महिने पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. बागायती शेतींना पाण्याचे नियोजन करता करता नाकीनऊ येत आहे. तालुक्यात दरवर्षी पावसाच्या लहरीपणाचा फाटका बसत असल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाण्याची टंचाई जाणवत असते.भूजल अधिनियमानुसार कोणतीही व्यक्ती अथवा संस्था विनापरवाना पाण्याचा उपसा करु शकत नाही. बोअर खोदणाºया मशीन व्यावसायिकांना जिल्हाधिकारी भूजल सर्वेक्षण विभागाकडे नोंद करणे बंधनकारक केले आहे. मात्र हा नियम कुणीही पाळत नसल्याने जमिनीची चाळणी होत आहे.

टॅग्स :Natureनिसर्गweatherहवामान