शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पैठण तालुक्यात विहिरी, बोअर घेण्याचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:12 IST

यंदाच्या दुष्काळाने पैठण तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. फळ बागांना पाणी कमी पडू नये, यासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी विहीर खोदकामांसह बोअर घेण्याचा जणू धडाका सुरू झाल्याने आहे ती पाणीपातळीही खालावत असल्याने चिंता वाढली आहे.

अंकुश वाघपैठण : यंदाच्या दुष्काळाने पैठण तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. फळ बागांना पाणी कमी पडू नये, यासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी विहीर खोदकामांसह बोअर घेण्याचा जणू धडाका सुरू झाल्याने आहे ती पाणीपातळीही खालावत असल्याने चिंता वाढली आहे.तालुक्यात ४०० ते ५०० फुटापर्यंत बोअर खोदले जात असल्याने जमिनीची अक्षरश: चाळणी होत आहे. तसेच नवीन विहीर खोदकामासह जुन्या विहिरीतसुध्दा आडवे बोअर मारण्यात येत आहेत. मोजक्या शिल्लक राहिलेल्या फळबागा वाचविण्साठी शेतकरी जीवाचे रान करत असल्याचे तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तालुक्यात मागील सलग बारा वर्षांपासून कमी प्रमाणात पाऊस पडू लागल्यामुळे म्हणावे तसे पाणी जमिनीत मुरले नाही. यंदा तर पावसाचे प्रमाण फारच नगण्य राहिल्याने याचा फटका खरीप हंगामापाठोपाठ रबी पिकालाही बसला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे.पाणीपुरवठा योजनेवरही परिणामहिवाळ्यात जमिनीत ओलावा राहिला नाही तर आगामी उन्हाळ्याचा विचार न केलेला बरा. ऊस लागवड करणारे शेतकरी पुन्हा संकटात सापडून लागवड केलेला ऊस जगविण्यासाठी धडपड करत आहेत. गतवर्षी जेमतेम पाऊस झाल्यामुळे ऊस पिकासह, मोसंबी, डाळींबाची मोठ्या प्रमाणात लागवड वाढ झाली. जलयुक्त शिवाराचा मोठा गाजावाजा झाला अन् यशही आले. यावर उसाची लागवड शेतकऱ्यांनी केली. सलग पडलेल्या दुष्काळामुळे पाणीपातळीत प्रचंड घट झाल्याने ती झिजच भरून निघाली नाही. यावर्षी तर पावसाळा कधी आला, कधी संपला, हे कळलेच नाही. बागा सुकू लागल्याने त्यांना जगविण्यासाठी पुन्हा शेतकरी धडपड करत नवीन बोअर घेण्यासह विहिरी खोदण्याचा सपाटा लावत आहेत. परंतु चारशे ते पाचशे फूट खोल बोअर घेऊनही पाणी लागत नसल्याने दुहेरी खर्च करून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. बोअरवेलधारक खोलीची मर्यादा असलेले नियम धाब्यावर बसवून चार पाचशे फूट खोल बोअर बिनधास्त घालत असून यामुळे जमिनीची चाळणी होऊन धरणीचा समतोल बिघडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.आर्थिक सुबत्ता मिळवून देणारी पिके पावसाअभावी शेतकºयाच्या हातातून गेल्याने त्यांची आतापासूनच आर्थिक ओढाताण होण्यास सुरूवात झाली आहे. जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने याचा परिणाम पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे. तालुक्यातील आडूळ, बालानगर, चितेगाव, कडेठाण, पारुंडी येथील ग्रामस्थांना बाराही महिने पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. बागायती शेतींना पाण्याचे नियोजन करता करता नाकीनऊ येत आहे. तालुक्यात दरवर्षी पावसाच्या लहरीपणाचा फाटका बसत असल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाण्याची टंचाई जाणवत असते.भूजल अधिनियमानुसार कोणतीही व्यक्ती अथवा संस्था विनापरवाना पाण्याचा उपसा करु शकत नाही. बोअर खोदणाºया मशीन व्यावसायिकांना जिल्हाधिकारी भूजल सर्वेक्षण विभागाकडे नोंद करणे बंधनकारक केले आहे. मात्र हा नियम कुणीही पाळत नसल्याने जमिनीची चाळणी होत आहे.

टॅग्स :Natureनिसर्गweatherहवामान