शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

पन्नास हजार विद्यार्थ्यांना लाभ

By admin | Updated: August 26, 2014 01:59 IST

प्रसाद आर्वीकर , परभणी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना

प्रसाद आर्वीकर , परभणीदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीइतका पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात पावसाळ्यातील अडीच महिने उलटून गेल्यानंतरही केवळ १६ टक्के पाऊस झाला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी केली. परंतु तरीही पिकांची उगवण झाली नाही. पाणीटंचाईनेही जिल्हा होरपळत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीने जोर धरला. अनेक आंदोलने झाली. शासनाने ५० टक्क्यापेक्षा कमी पाऊस असलेल्या तालुक्यांमध्ये टंचाई जाहीर केली असून या अंतर्गत कृषीपंपाच्या वीजबिलात ३० टक्के सवलत, शेतसारा माफ आणि विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात नऊ तालुके टंचाईमध्ये मोडतात. परीक्षा शुल्काचा विचार करता जवळपास ५० ते ६० हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ५१३ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आहेत. दहावी परीक्षेसाठी २४ हजार ७३३ विद्यार्थी तर बारावीच्या परीक्षेसाठी १४ हजार ६७० विद्यार्थी पात्र आहेत. त्यामुळे ३९ हजार ४०३ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. परभणी (शहर)108 68065070परभणी (ग्रा.)56 25621510पूर्णा52 22331284पाथरी34 1413527जिंतूर74 32291604गंगाखेड54 29801754मानवत32 1146905पालम42 14841155सेलू37 19251366सोनपेठ25 959495एकूण513 2473314670दहावी परीक्षेसाठी ३३० रुपये एवढे परीक्षा शुल्क गतवर्षी होते. तर बारावी परीक्षेसाठी प्रात्याक्षिकांसह ४०० रुपये परीक्षा शुल्क होते. याच परीक्षा शुल्काचा आधार घेतला तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे ८१ लाख ६१ हजार ८९० रुपयांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांचे ५८ लाख ६८ हजार रुपयांचे शुल्क माफ होईल.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत परभणी जिल्ह्यात ८० महाविद्यालाये असून या महाविद्यालयांमधून पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते. शासनाच्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाचा फायदा पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना देखील होणार आहे.४शासनाच्या निकषात परभणी जिल्ह्यातील सर्व तालुके बसत असल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांने परीक्षा शुल्क माफ होत असून कृषीपंपाच्या वीज बिलात ३० टक्के सवलत दिली आहे.