शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास हजार विद्यार्थ्यांना लाभ

By admin | Updated: August 26, 2014 01:59 IST

प्रसाद आर्वीकर , परभणी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना

प्रसाद आर्वीकर , परभणीदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीइतका पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात पावसाळ्यातील अडीच महिने उलटून गेल्यानंतरही केवळ १६ टक्के पाऊस झाला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी केली. परंतु तरीही पिकांची उगवण झाली नाही. पाणीटंचाईनेही जिल्हा होरपळत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीने जोर धरला. अनेक आंदोलने झाली. शासनाने ५० टक्क्यापेक्षा कमी पाऊस असलेल्या तालुक्यांमध्ये टंचाई जाहीर केली असून या अंतर्गत कृषीपंपाच्या वीजबिलात ३० टक्के सवलत, शेतसारा माफ आणि विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात नऊ तालुके टंचाईमध्ये मोडतात. परीक्षा शुल्काचा विचार करता जवळपास ५० ते ६० हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ५१३ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आहेत. दहावी परीक्षेसाठी २४ हजार ७३३ विद्यार्थी तर बारावीच्या परीक्षेसाठी १४ हजार ६७० विद्यार्थी पात्र आहेत. त्यामुळे ३९ हजार ४०३ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. परभणी (शहर)108 68065070परभणी (ग्रा.)56 25621510पूर्णा52 22331284पाथरी34 1413527जिंतूर74 32291604गंगाखेड54 29801754मानवत32 1146905पालम42 14841155सेलू37 19251366सोनपेठ25 959495एकूण513 2473314670दहावी परीक्षेसाठी ३३० रुपये एवढे परीक्षा शुल्क गतवर्षी होते. तर बारावी परीक्षेसाठी प्रात्याक्षिकांसह ४०० रुपये परीक्षा शुल्क होते. याच परीक्षा शुल्काचा आधार घेतला तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे ८१ लाख ६१ हजार ८९० रुपयांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांचे ५८ लाख ६८ हजार रुपयांचे शुल्क माफ होईल.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत परभणी जिल्ह्यात ८० महाविद्यालाये असून या महाविद्यालयांमधून पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते. शासनाच्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाचा फायदा पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना देखील होणार आहे.४शासनाच्या निकषात परभणी जिल्ह्यातील सर्व तालुके बसत असल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांने परीक्षा शुल्क माफ होत असून कृषीपंपाच्या वीज बिलात ३० टक्के सवलत दिली आहे.