शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

सहा जणांवर कारवाईचा दंडुका

By admin | Updated: January 28, 2015 00:55 IST

अंबड : तालुक्यातील टंचाई निवारणाच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी ग्रामीण पाणीपुरवठा

अंबड : तालुक्यातील टंचाई निवारणाच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या दोन कनिष्ठ अभियंत्यांसह चार ग्रामसेवकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यात एका ग्रामसेवकावर तडकाफडकी निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.मंगळवारी दुपारी येथील गायनाचार्य गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी नायक यांनी अंबड तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. मात्र या उपाययोजनांच्या कामात दिरंगाई तर काही ठिकाणी सावळागोंधळ होत असल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. बैठकीत गटविकास अधिकारी डी.के. पांडव यांच्यासह विविध विभागप्रमूख व ग्रामसेवकांना आपल्या कामाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देता आली नाही. अपुरी व चुकीची माहिती सादर होत असल्याचे चित्र होते. जिल्हाधिकाऱ्यांनी गावनिहाय आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेली आकडेवारी व ग्रामसेवक देत असलेली आकडेवारी यात मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून येत होती. गावनिहाय आढावा घेत असताना अनेक ठिकाणी निधी उपलब्ध असतानाही केवळ लालफितीमुळे, चिरीमिरीच्या आशेने कामे खोळंबून ठेवल्याचे निदर्शनास आले. एकीकडे दुष्काळाने जनता होरपळत असताना अनेक ग्रामसेवक, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी कामामध्ये चाल-ढकल करत असल्याचे यावेळी समोर आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पाच ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. याबरोबरच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या दोन अभियंत्यावर विभागीय चौकशीचे आदेश दिले. यानंतर अनेक प्रश्नासंबधी निरुत्तर असणाऱ्या गटविकास अधिकारी पांडव यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांना दिले. बैठकीस केंद्रे, उपविभागीय अधिकारी डॉ श्रीमंत हारकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तांगडे, तहसिलदार महेश सावंत, जि.प.सदस्य सतीश टोपे, गटविकास अधिकारी डी के पांडव, गटशिक्षणाधिकारी मंगल धुपे आदींसह मोठया संख्येने सरपंच, ग्रामसेवकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)जिल्हाधिकारी रखडलेल्या उपाययोजनांविषयी विचारणा करत असताना ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचारी यांना समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत. हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी पांडव यांना याविषयी विचारणा केली. वेळोवेळी विचारणा करत असताना गटविकास अधिकाऱ्यांकडेच अपुरी माहिती असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हस्तपोखरी येथील ग्रामसेवक आर.बी. वाभळे यांच्यावर निलंबन कारवाई, गोंदी येथील ग्रामसेवक बी.बी. टकले, वडीगोद्री येथील ग्रामसेवक एन.ए. फसाटे व चुरमापुरी येथील कंत्राटी ग्रामसेवक साळवे यांची विभागीय चौकशी तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वामी व महिला अभियंता थिटे यांचीही विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र याबाबतचा अधिकृत दुजोरा मिळाला नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत सरपंचांशी थेट संवाद साधत काही तक्रार असल्यास मांडण्यांच्या सुचना केली. यावेळी मोठया संख्येने सरपंचांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांविषयी आपल्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.