शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

गृह विभागाच्या प्रधान सचिवांना खंडपीठाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:11 IST

वक्फ बोर्डातील साहित्य खरेदीत झालेल्या कोट्यवधींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून यासाठी ‘अ’ वर्ग दर्जाच्या अधिका-याची नेमणूक करावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वक्फ बोर्डातील साहित्य खरेदीत झालेल्या कोट्यवधींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून यासाठी ‘अ’ वर्ग दर्जाच्या अधिका-याची नेमणूक करावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.खंडपीठाने राज्याच्या अल्पसंख्याक आयोग व गृह विभागाच्या प्रधान सचिवांसह,औरंगाबादचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व वक्फ बोर्डाच्या तत्कालीन सीईओ नसिमबानो पटेल यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.सातारा (औरंगाबाद) येथील मुस्तफा दिलावर खान पठाण व अंबाजोगाई (जि. बीड) येथील शेख अनिसोद्दीन मझबोद्दीन यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या मार्फत याचिका दाखल करून वक्फ बोर्डाच्या कामकाजासंबंधी विशेष पथक नेमून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. वक्फ बोर्डाने २०१२ पासून केलेल्या साहित्य खरेदीची सविस्तर चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.संगणक खरेदीसाठी ४८ लाख ९० हजार ७१७ रुपये, झेरॉक्स मशीनसाठी ७५ लाख ७३ हजार ८३९ रुपये, झेरॉक्स मशीनसाठी ६ लाख ६ हजार ६९० रुपये, आॅनलाईन यूपीएससाठी ४४ लाख ८४ हजार २२० रुपये, फ्रॅकिंग मशीनसाठी ४४ लाख ८४ हजार २२० रुपये, प्रिंटर खरेदीसाठी ७ लाख २९ हजार ४९५ रुपये, कार्यालयातील फर्निचरसाठी २९ लाख २५ हजार रुपये, कार्यालयीन स्टेशनरीसाठी १९ लाख ५० हजार रुपये, कार्यालयीन वीज देयके व टेलिफोन बिलासाठी २६ लाख ८ हजार २४९ रुपये मंजूर करण्यात आले होते.प्रत्यक्षात खरेदी न करताच बोगस बिले व व्हाऊचर्स दाखविण्यात आल्याचा आरोप संबंधितांनी केला. सदर प्रकरणी बोर्डाच्या तत्कालीन सीईओ नसिमबानो पटेल यांनी चौकशी समिती नेमली. त्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सीईओ पटेल यांच्यावर आरोप असताना त्यांनी आपल्या खालचे अधिकारी अजिज अहमद सहायक सीईओ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. दोषींची चौकशी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ‘अ ’ वर्ग अधिकाºयाकडून करण्यात यावी यासाठी शासनास २३ फेब्रुवारी २०१६ मध्ये पत्र देण्यात आले होते; परंतु चौकशी न झाल्याने त्यांनी खंडपीठात अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे मार्फत याचिका दाखल केली आहे.