शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

कापूस खरेदीतील गैरव्यवहाराबाबत खंडपीठाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:02 IST

औरंगाबाद : भारतीय कापूस महासंघातर्फे केलेल्या कापूस खरेदीत गेल्या वर्षी सिल्लोड बाजार समितीमधील झालेल्या गैरव्यवहार व गोंधळाबाबत ...

औरंगाबाद : भारतीय कापूस महासंघातर्फे केलेल्या कापूस खरेदीत गेल्या वर्षी सिल्लोड बाजार समितीमधील झालेल्या गैरव्यवहार व गोंधळाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली असून, न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांनी प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे.

सन २०२० साली सिल्लोड बाजार समितीमधील कापूस खरेदीत झालेल्या गैरव्यवहार व गोंधळाबाबत सिल्लोडच्या उपविभागीय अधिकारी यांनी ८ जून २०२० रोजी पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सिल्लोडच्या तहसीलदारांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तहसीलदारांनी पथकामार्फत चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता.

त्या अहवालाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी २५ जून २०२० रोजी जिल्हा उपनिबंधकांना (सहकारी संस्था) मूळ अहवाल पाठवून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या प्रकरणात काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे तक्रारदार महेश शंकरलाल शंकरपेल्ली व इतर शेतकऱ्यांनी ॲड. विशांत कदम यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल करून जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार सिल्लोड बाजार समितीवर योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती केली आहे. याचिकेवर १२ ऑक्टोबर २०२१ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

चौकट -१

..असा झाला होता गैरव्यवहार व गोंधळ

शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यासाठी भारतीय कापूस महासंघातर्फे (सीसीआय) ऑनलाइन नोंदणी करून शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले होते; परंतु तपासणीत असे उघड झाले की, त्यावेळी व्यापाऱ्यांनीच १०३५ शेतकऱ्यांच्या नावावर नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या १८४८ पैकी केवळ ८१३ शेतकऱ्यांच्या घरात कापूस आढळला होता. विशेष म्हणजे नोंदणीसाठी बाजार समितीत वाहने आणण्याची गरज नव्हती. केवळ सातबारा आणि बँकेचे पासबुक जोडल्यानंतर नोंदणी होत होती. याचा फायदा उचलत व्यापाऱ्यांनी प्रत्येकी ३० ते ४० वाहनांची नोंद केल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यावरून सिल्लोडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली होती.

चौकट - २

खंडपीठाने यांना बजावल्या आहेत नोटिसा

या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने औरंगाबादचे जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), सिल्लोडचे तहसीलदार, सिल्लोड बाजार समिती आणि भारतीय कापूस महासंघ (सीसीआय) यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे.