शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

कापूस खरेदीतील गैरव्यवहाराबाबत खंडपीठाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:02 IST

औरंगाबाद : भारतीय कापूस महासंघातर्फे केलेल्या कापूस खरेदीत गेल्या वर्षी सिल्लोड बाजार समितीमधील झालेल्या गैरव्यवहार व गोंधळाबाबत ...

औरंगाबाद : भारतीय कापूस महासंघातर्फे केलेल्या कापूस खरेदीत गेल्या वर्षी सिल्लोड बाजार समितीमधील झालेल्या गैरव्यवहार व गोंधळाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली असून, न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांनी प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे.

सन २०२० साली सिल्लोड बाजार समितीमधील कापूस खरेदीत झालेल्या गैरव्यवहार व गोंधळाबाबत सिल्लोडच्या उपविभागीय अधिकारी यांनी ८ जून २०२० रोजी पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सिल्लोडच्या तहसीलदारांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तहसीलदारांनी पथकामार्फत चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता.

त्या अहवालाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी २५ जून २०२० रोजी जिल्हा उपनिबंधकांना (सहकारी संस्था) मूळ अहवाल पाठवून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या प्रकरणात काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे तक्रारदार महेश शंकरलाल शंकरपेल्ली व इतर शेतकऱ्यांनी ॲड. विशांत कदम यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल करून जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार सिल्लोड बाजार समितीवर योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती केली आहे. याचिकेवर १२ ऑक्टोबर २०२१ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

चौकट -१

..असा झाला होता गैरव्यवहार व गोंधळ

शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यासाठी भारतीय कापूस महासंघातर्फे (सीसीआय) ऑनलाइन नोंदणी करून शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले होते; परंतु तपासणीत असे उघड झाले की, त्यावेळी व्यापाऱ्यांनीच १०३५ शेतकऱ्यांच्या नावावर नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या १८४८ पैकी केवळ ८१३ शेतकऱ्यांच्या घरात कापूस आढळला होता. विशेष म्हणजे नोंदणीसाठी बाजार समितीत वाहने आणण्याची गरज नव्हती. केवळ सातबारा आणि बँकेचे पासबुक जोडल्यानंतर नोंदणी होत होती. याचा फायदा उचलत व्यापाऱ्यांनी प्रत्येकी ३० ते ४० वाहनांची नोंद केल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यावरून सिल्लोडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली होती.

चौकट - २

खंडपीठाने यांना बजावल्या आहेत नोटिसा

या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने औरंगाबादचे जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), सिल्लोडचे तहसीलदार, सिल्लोड बाजार समिती आणि भारतीय कापूस महासंघ (सीसीआय) यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे.