शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या दुरवस्थेच्या वृत्ताची खंडपीठाने घेतली स्वत:हून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:54 IST

प्रतिवादी केंद्र आणि राज्याचे पर्यटन खाते, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणासह एकूण बारा प्रतिवाद्यांना नोटीस; पुढील सुनावणी १४ आॅगस्टला

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची खंडपीठाने घेतली दखल

प्रतिवादी केंद्र आणि राज्याचे पर्यटन खाते, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणासह एकूण बारा प्रतिवाद्यांना नोटीस; पुढील सुनावणी १४ आॅगस्टलाऔरंगाबाद : ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी सुमोटो याचिकेच्या अनुषंगाने प्रतिवादी केंद्र आणि राज्याचे पर्यटन खाते, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणासह एकूण १२ प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश बुधवारी (दि.३ जुलै) दिला. याचिकेची पुढील सुनावणी १४ आॅगस्ट रोजी होणार आहे.चौपदरीकरणासाठी रस्ता खोदून ठेवल्यामुळे या रस्त्याची झालेली दुरवस्था, वाहतुकीला होणारा अडथळा, परिणामी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या पर्यटकांची रोडावलेली संख्या आदींवर प्रकाश टाकणारे ‘जळगाव महामार्ग बनला मृत्यूचा सापळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारच्या (दि.३) अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.याच आशयाच्या स्थानिक वृत्तपत्राच्या बातमीची स्वत:हून दखल घेत खंडपीठाने यापूर्वी सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. ही याचिका चालविण्यासाठी न्यायालयाचे मित्र (अमिकस क्युरी) म्हणून खंडपीठाने अ‍ॅड. चैतन्य धारूरकर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी जळगाव महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून याचिका दाखल करण्याचा आदेश यापूर्वी खंडपीठाने दिला होता. त्यानुसार अ‍ॅड. धारूरकर यांनी याचिका तयार करून सदर रस्त्याचा पाहणी अहवाल, रस्त्याच्या दुरवस्थेची छायाचित्रे आणि अपेक्षित सुधारणांचे परिशिष्ट, तसेच ‘लोकमत’चा ३ जुलैचा अंक सादर केला असता खंडपीठाने केंद्र आणि राज्याचे पर्यटन खाते, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, एमटीडीसी, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, केंद्रीय राष्टÑीय महामार्ग आणि वाहतूक मंत्रालय, विमान पत्तन प्राधिकरण आणि नागरी उड्डयन मंत्रालय, औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कंत्राटदारासह एकूण बारा प्रतिवाद्यांना नोटिसा बजाविण्याचा आदेश दिला.अ‍ॅड. धारूरकर यांनी औरंगाबादला देशातील महत्त्वाच्या शहरांशी जोडणारी हवाई वाहतूक (जेटची) सेवा बंद झाल्यामुळे पर्यटन व्यवसायावर झालेल्या परिणामासह इतर मुद्दे सादर केले आहेत. रेल्वेद्वारे ‘दुरान्तो’सारखी ‘सुपरफास्ट’ रेल्वेने औरंगाबाद शहर देशातील मुख्य शहरांशी जोडता येईल. औरंगाबादला ‘पीटलाईन’ मंजूर करावी. कोकणाप्रमाणे मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे विभाग मंजूर करावा, सिल्लोड आणि फुलंब्री शहरालगत ‘बायपास’ किंवा उड्डाणपुल’ तयार करावा आदी सुधारणांचे परिशिष्ट अ‍ॅड. धारूरकर यांनी खंडपीठात सादर केले. केंद्र सरकारतर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे आणि राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकिल अर्चना गोंधळेकर काम पाहत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय