शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या दुरवस्थेच्या वृत्ताची खंडपीठाने घेतली स्वत:हून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:54 IST

प्रतिवादी केंद्र आणि राज्याचे पर्यटन खाते, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणासह एकूण बारा प्रतिवाद्यांना नोटीस; पुढील सुनावणी १४ आॅगस्टला

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची खंडपीठाने घेतली दखल

प्रतिवादी केंद्र आणि राज्याचे पर्यटन खाते, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणासह एकूण बारा प्रतिवाद्यांना नोटीस; पुढील सुनावणी १४ आॅगस्टलाऔरंगाबाद : ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी सुमोटो याचिकेच्या अनुषंगाने प्रतिवादी केंद्र आणि राज्याचे पर्यटन खाते, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणासह एकूण १२ प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश बुधवारी (दि.३ जुलै) दिला. याचिकेची पुढील सुनावणी १४ आॅगस्ट रोजी होणार आहे.चौपदरीकरणासाठी रस्ता खोदून ठेवल्यामुळे या रस्त्याची झालेली दुरवस्था, वाहतुकीला होणारा अडथळा, परिणामी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या पर्यटकांची रोडावलेली संख्या आदींवर प्रकाश टाकणारे ‘जळगाव महामार्ग बनला मृत्यूचा सापळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारच्या (दि.३) अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.याच आशयाच्या स्थानिक वृत्तपत्राच्या बातमीची स्वत:हून दखल घेत खंडपीठाने यापूर्वी सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. ही याचिका चालविण्यासाठी न्यायालयाचे मित्र (अमिकस क्युरी) म्हणून खंडपीठाने अ‍ॅड. चैतन्य धारूरकर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी जळगाव महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून याचिका दाखल करण्याचा आदेश यापूर्वी खंडपीठाने दिला होता. त्यानुसार अ‍ॅड. धारूरकर यांनी याचिका तयार करून सदर रस्त्याचा पाहणी अहवाल, रस्त्याच्या दुरवस्थेची छायाचित्रे आणि अपेक्षित सुधारणांचे परिशिष्ट, तसेच ‘लोकमत’चा ३ जुलैचा अंक सादर केला असता खंडपीठाने केंद्र आणि राज्याचे पर्यटन खाते, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, एमटीडीसी, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, केंद्रीय राष्टÑीय महामार्ग आणि वाहतूक मंत्रालय, विमान पत्तन प्राधिकरण आणि नागरी उड्डयन मंत्रालय, औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कंत्राटदारासह एकूण बारा प्रतिवाद्यांना नोटिसा बजाविण्याचा आदेश दिला.अ‍ॅड. धारूरकर यांनी औरंगाबादला देशातील महत्त्वाच्या शहरांशी जोडणारी हवाई वाहतूक (जेटची) सेवा बंद झाल्यामुळे पर्यटन व्यवसायावर झालेल्या परिणामासह इतर मुद्दे सादर केले आहेत. रेल्वेद्वारे ‘दुरान्तो’सारखी ‘सुपरफास्ट’ रेल्वेने औरंगाबाद शहर देशातील मुख्य शहरांशी जोडता येईल. औरंगाबादला ‘पीटलाईन’ मंजूर करावी. कोकणाप्रमाणे मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे विभाग मंजूर करावा, सिल्लोड आणि फुलंब्री शहरालगत ‘बायपास’ किंवा उड्डाणपुल’ तयार करावा आदी सुधारणांचे परिशिष्ट अ‍ॅड. धारूरकर यांनी खंडपीठात सादर केले. केंद्र सरकारतर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे आणि राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकिल अर्चना गोंधळेकर काम पाहत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय