शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

व्यवहार ठप्प; १०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा

By admin | Updated: November 10, 2016 00:06 IST

लातूर : ५००, १००० हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय झाल्याने बुधवारी बाजारातील व्यवहार ठप्प झाले.

लातूर : ५००, १००० हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय झाल्याने बुधवारी बाजारातील व्यवहार ठप्प झाले. अनेकजण पाचशे-हजारांच्या नोटा घेऊन येत असल्याने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली. भाजीपाल्यापासून सोन्या-चांदीच्या व्यवहारातही पाचशे-हजारांच्या नोटा घेण्यास नकार दिल्याने ही अडचण होती. दवाखाने, मेडिकल दुकान वगळता अन्य ठिकाणी ५००, १००० रुपयांच्या नोटा व्यवहारात चालू शकल्या नाहीत.गांधी मार्केट, गंजगोलाई, बार्शी रोडवरील रयतू बाजार एरवी ग्राहकांनी फुललेला असायचा. मात्र बुधवारी या बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी होती. जे काही ग्राहक आले त्यांनी ५००, १००० रुपयांची नोट व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, विक्रेत्यांकडून त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे सामान्य विक्रेत्याचा ५०० ते ७०० रुपयांचा होणारा गल्ला १५० ते २०० रुपयांचा झाला. विशेष म्हणजे काही विक्रेत्यांची बोहनीही होऊ शकली नाही. कपडा बाजारातही अशीच परिस्थिती होती. नुकतीच दिवाळी झाली असून, अद्यापही दुकानदारांकडून वेगवेगळ्या आॅफर आहेत. त्यामुळे खरेदीचा कल असला तरी व्यवहारातून या नोटा बंद झाल्याने १०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा येथेही जाणवला. एटीएम कार्डवरून व्यवहार करता येतो. परंतु, काल सायंकाळपासून एटीएमही बंद असल्याने या कार्डद्वारे ग्राहकांना मॉल्स अथवा मोठ्या दुकानांतून खरेदी करता येऊ शकली नाही. किराणा दुकान, दूध विक्रेते, जनरल स्टोअर्स, पानटपरी, बेकरी आदी दुकानांतून होणारा व्यवहार चिल्लर नसल्यामुळे ठप्प राहिला. सुटे पैसे नसल्याने सकाळी ब्रेड घेण्यासाठी अनेकांना अडचणी आल्या. (प्रतिनिधी)